शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

डीएड होणार कालबाह्य; बीएडला येणार नवी झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2023 08:00 IST

Wardha News बारावी उत्तीर्ण झाल्यावर डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करून अनेक युवक प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले आहेत. आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार डीएड महाविद्यालये बंद होणार असल्याची चर्चा आहे.

पुरुषोत्तम नागपुरे

वर्धा : बारावी उत्तीर्ण झाल्यावर डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करून अनेक युवक प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले आहेत. आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार डीएड महाविद्यालये बंद होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे डीएड महाविद्यालय कालबाह्य होणार असल्याने डीएड झालेल्यांना मोठा धक्का बसला आहे. आता बीएड पदवी अभ्यासक्रम नव्याने तयार होणार असून, तो चार वर्षांचा राहणार असल्याने याचा शिक्षणावर दूरगामी परिणाम होणार, असे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्यात शिक्षक-प्रशिक्षणाचे टप्पे बदलणार आहेत. याची महाराष्ट्र राज्यात लवकरच प्रभावी अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानुसार आता डीएड अभ्यासक्रम कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर चार वर्षांचा बीएड इंटिग्रेटेड अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तसेच तीन वर्षांची बॅचलर डिग्री पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना २ वर्षांचा बीएड इंटिग्रेटेड अभ्यासक्रम करता येईल. यानंतर मात्र त्यालाच शिक्षक होता येणार आहे. अध्यापनशास्त्रातील नवनव्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच नव्या शैक्षणिक बाबींचा या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमात समावेश केला जाणार असल्याने शैक्षणिक क्षमतेत वैविध्यपूर्णता आणि नावीन्यपूर्णता येणार आहेत. अर्थात या सर्वसमावेशक अभ्यासक्रमात विशेषत: शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणतज्ज्ञांनी दिली.

डीएडधारकांचा प्रश्न सोडवावा

नवे शिक्षक प्रशिक्षण टप्पे कधी सुरू होणार यासंदर्भात महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने अधिकृतरीत्या जाहीर केले नाही याचे आश्चर्य वाटत आहे. येत्या २०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षापासून त्यांची अंमलबजावणी करण्याबाबत चाचपणी सुरू झाल्याची माहिती पुढे येत आहे. असे असले तरी पूर्वी डीएड अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांचा प्रश्न सोडविण्याकरिता सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी डीएडधारकांनी केली आहे.

 

नवीन शैक्षणिक धोरणात सर्वसमावेशकपणा गृहीत धरला असता, शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक घटकाला, विद्यार्थ्यांना, डिप्लोमाधारकांना न्याय मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे जुन्या डीएडधारकांवर अजिबात अन्याय होता कामा नये. महाराष्ट्रातील जुने डीएडधारक लाखोंच्या वर असल्याने शिक्षक म्हणून त्यांची वर्णी लागावी. कारण उमेदीच्या शेवटच्या वयात या जुन्या डीएडधारकांची शिक्षक म्हणून निवड झाल्यास बेरोजगारीचा प्रश्न मिटेल.

अविनाश टाके, शिक्षक

महाराष्ट्र राज्यात येत्या शैक्षणिक सत्रापासून नवीन शैक्षणिक धोरण राबविण्याचा शासनाचा निर्णय स्तुत्य असला तरीही डीएड झालेल्या बांधवांना शिक्षकांची नोकरी लागावी म्हणून शासनाने पर्यायी व्यवस्था करून या बेरोजगार युवकांना न्याय मिळवून द्यावा. टीईटीची अट जुन्या शिक्षकांना शिथिल करून त्यांना शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात काही हरकत नाही. आजही हे शिक्षक बीएड झाले असतानासुध्दा त्यांना हाताला धड काम नाही. शासनाने उचित व क्रांतिकारक शैक्षणिक निर्णय घेऊन जुन्या डीएडधारकांना न्याय मिळवून द्यावा.

मंगेश कोल्हे, शिक्षक

----------------------------------------------

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र