शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

डीएड होणार कालबाह्य; बीएडला येणार नवी झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2023 08:00 IST

Wardha News बारावी उत्तीर्ण झाल्यावर डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करून अनेक युवक प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले आहेत. आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार डीएड महाविद्यालये बंद होणार असल्याची चर्चा आहे.

पुरुषोत्तम नागपुरे

वर्धा : बारावी उत्तीर्ण झाल्यावर डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करून अनेक युवक प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले आहेत. आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार डीएड महाविद्यालये बंद होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे डीएड महाविद्यालय कालबाह्य होणार असल्याने डीएड झालेल्यांना मोठा धक्का बसला आहे. आता बीएड पदवी अभ्यासक्रम नव्याने तयार होणार असून, तो चार वर्षांचा राहणार असल्याने याचा शिक्षणावर दूरगामी परिणाम होणार, असे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्यात शिक्षक-प्रशिक्षणाचे टप्पे बदलणार आहेत. याची महाराष्ट्र राज्यात लवकरच प्रभावी अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानुसार आता डीएड अभ्यासक्रम कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर चार वर्षांचा बीएड इंटिग्रेटेड अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तसेच तीन वर्षांची बॅचलर डिग्री पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना २ वर्षांचा बीएड इंटिग्रेटेड अभ्यासक्रम करता येईल. यानंतर मात्र त्यालाच शिक्षक होता येणार आहे. अध्यापनशास्त्रातील नवनव्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच नव्या शैक्षणिक बाबींचा या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमात समावेश केला जाणार असल्याने शैक्षणिक क्षमतेत वैविध्यपूर्णता आणि नावीन्यपूर्णता येणार आहेत. अर्थात या सर्वसमावेशक अभ्यासक्रमात विशेषत: शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणतज्ज्ञांनी दिली.

डीएडधारकांचा प्रश्न सोडवावा

नवे शिक्षक प्रशिक्षण टप्पे कधी सुरू होणार यासंदर्भात महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने अधिकृतरीत्या जाहीर केले नाही याचे आश्चर्य वाटत आहे. येत्या २०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षापासून त्यांची अंमलबजावणी करण्याबाबत चाचपणी सुरू झाल्याची माहिती पुढे येत आहे. असे असले तरी पूर्वी डीएड अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांचा प्रश्न सोडविण्याकरिता सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी डीएडधारकांनी केली आहे.

 

नवीन शैक्षणिक धोरणात सर्वसमावेशकपणा गृहीत धरला असता, शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक घटकाला, विद्यार्थ्यांना, डिप्लोमाधारकांना न्याय मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे जुन्या डीएडधारकांवर अजिबात अन्याय होता कामा नये. महाराष्ट्रातील जुने डीएडधारक लाखोंच्या वर असल्याने शिक्षक म्हणून त्यांची वर्णी लागावी. कारण उमेदीच्या शेवटच्या वयात या जुन्या डीएडधारकांची शिक्षक म्हणून निवड झाल्यास बेरोजगारीचा प्रश्न मिटेल.

अविनाश टाके, शिक्षक

महाराष्ट्र राज्यात येत्या शैक्षणिक सत्रापासून नवीन शैक्षणिक धोरण राबविण्याचा शासनाचा निर्णय स्तुत्य असला तरीही डीएड झालेल्या बांधवांना शिक्षकांची नोकरी लागावी म्हणून शासनाने पर्यायी व्यवस्था करून या बेरोजगार युवकांना न्याय मिळवून द्यावा. टीईटीची अट जुन्या शिक्षकांना शिथिल करून त्यांना शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात काही हरकत नाही. आजही हे शिक्षक बीएड झाले असतानासुध्दा त्यांना हाताला धड काम नाही. शासनाने उचित व क्रांतिकारक शैक्षणिक निर्णय घेऊन जुन्या डीएडधारकांना न्याय मिळवून द्यावा.

मंगेश कोल्हे, शिक्षक

----------------------------------------------

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र