शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

मेंढपाळांना आले सुगीचे दिवस

By admin | Updated: May 15, 2014 01:42 IST

जिल्ह्यात राजस्थानी मेंढपाळ अवतरले आहेत. आंजी (मोठी) परिसरातही शेतीची सुपिकता वाढण्यासाठी शेतकरी विविध युक्त्या शोधत असल्याचे दिसते.

४0 टक्के शेतकर्‍यांची कामे आटोपलीजमिनीची सुपिकता वाढविण्याचा प्रयत्न : मेंढय़ा बसविण्याचे एका रात्रीचे दर दीड हजार रुपयेवर्धा : जिल्ह्यात राजस्थानी मेंढपाळ अवतरले आहेत. आंजी (मोठी) परिसरातही शेतीची सुपिकता वाढण्यासाठी शेतकरी विविध युक्त्या शोधत असल्याचे दिसते. नापिकीवर मात करण्यासाठी शेतात राजस्थानी शेळ्या, मेंढय़ा बसवून शेतीची सुपिकता वाढविण्यासाठी शेतकरी प्राधान्य देत असल्याचे दिसते. शेतात मेंढय़ा बसविण्यासाठी शेतकर्‍यांना एका दिवसाचे दीड हजार रुपये मोजावे लागत आहेत.परिसरातील ७0 टक्के शेतकर्‍यांकडे दोन बैलांच्या वर जनावरे नाही. यामुळे त्यांना पूरेशा प्रमाणात शेणखत उपलब्ध होत नाही. दिवसेंदिवस रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची पोत खालावत आहे. शेती नापिक होण्याच्या मार्गावर आहे. रासायनिक खताचे भाव गगनाला भिडल्याने ते खरेदी करणे कठीण जात आहे. शेतकर्‍यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे. पर्यायाने शेतकरी कर्जबाजारी झाला असून अनेकांनी आत्महत्या केल्यात. यामुळे बरेच शेतकरी आता रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खताकडे वळले आहेत; पण त्यासाठी शेणखत वापरणे आवश्यक आहे. शेतकरी शेणखताकडे वळल्याने शेणखताचेही दर चांगलेच वधारलेत. उन्हाळ्यात अनेक शेतकरी शेणखत बैलबंडी वा ट्रॅक्टरच्या हिशेबाप्रमाणे खरेदी करतात; पण लहान शेतकर्‍यांना ते अशक्य आहे. यामुळे शेतकरी आपल्या शेतात शेळ्या, मेंढय़ा बसविण्यास प्राधान्य देत आहे. यामुळे शेतीची सुपिकता वाढण्यास मदत होते. शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. काहींच्या शेतात ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, वखरणी सुरू असल्याचे दिसते.(स्थानिक प्रतिनिधी)

४0 टक्के शेतकर्‍यांची कामे आटोपली

■ जवळपास ४0 टक्के शेतकर्‍यांची नांगरणीची कामे झाली आहेत. दरवर्षी एप्रिल महिन्यात राजस्थानी मेंढपाळ परिसरात डेरेदाखल होतात.■ शेतकर्‍यांच्या शेतात मेंढय़ांचा कळप बसवितात. मेंढय़ांना चारा व मालकांना पैसेही मिळतात.■ एका रात्री मेंढय़ा बसविल्यास त्यांना दीड हजार रुपये मिळतात. सुपिकता वाढविण्यासाठी शेतात मेंढय़ा बसविण्यासच शेतकरी पसंती देताना दिसतात.