शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

दिवसानुरूप लग्नाचे स्वरूप बदलले

By admin | Updated: May 18, 2014 23:50 IST

सध्या लग्नसराईला चांगलाच जोर आलाय; परंतु दिवसागणिक लग्नाचा ‘लूक’ पूर्वीपेक्षा बदलत चाललाय. प्रत्येक बाबतीत कमालिची भिन्नता दिसून येते.

 ंवर्धा : सध्या लग्नसराईला चांगलाच जोर आलाय; परंतु दिवसागणिक लग्नाचा ‘लूक’ पूर्वीपेक्षा बदलत चाललाय. प्रत्येक बाबतीत कमालिची भिन्नता दिसून येते. लग्न सोहळा म्हटला की मित्र, नातलग व गावकर्‍यांना संदेश पोहोचविण्यासाठी लग्नपत्रिका बहूतेक टपालाद्वारेच पाठवित होते. परंतु आज एका पत्रिकेला पाच-दहा रुपयांचे टिकीट लावावे लागत असल्याने केवळ लांब पल्ल्याच्या पत्रिकाच टपालाद्वारे पाठविल्या जाते. किंवा स्वत: दुचकीद्वारे, लग्नमंडपात भेटीत दिल्या जात आहे. लग्नाचे बंधन जोडले की, साखरपुडा लग्नासारखा साजरा करीत आहे. त्यातूनही अनिवार्य खर्च होताना दिसतो. लग्नसराईला जुने महत्त्व अजूनही शिल्लक आहे. यात लग्नाच्या आदल्या दिवशी नांदमुखाचा कार्यक्रम, देवकुंडी, लग्नमंडप टाकण्याची प्रथा अद्याप आहे. परंतु सध्यातरी बॅडबाजा हा कमी प्रमाणात दिसतोय. तरुणाई डीजेच्या तालावर नाचत असल्याचे चित्र आहे. पूर्वी बँडवाल्यास दोन दिवसासाठी सांगितले जायचे. गावात मिरवणूक काढून दुसर्‍या दिवशी नववधू घरी येईपर्यंत हा बँडबाजा दिसायचा. आता गावात मिरवणूकीसाठी डीजे अन् लग्नाच्या ठिकाणावर बँडबाजा दिसून येतो. विशेष बाब म्हणजे हूंडा नको ग बाई, अशी म्हणणारी वराकडील मंडळी चुप्पी साधत गुप्तपणे हूंडा घेत आहे. आज लग्नात पगंतीऐवजी बुफे पद्धत असून वर-वधू पक्षातील मंडळीकडून अन्नाची नासाडी होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)