शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दप्तराचे नियम धाब्यावर

By admin | Updated: July 12, 2017 01:58 IST

दर्जेदार शिक्षणाच्या नावावर शिक्षणाचा व्यापार करणाऱ्या अनेक संस्था आज उदयास आल्या आहेत.

वजनाकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष : पालकांनी सतर्क राहून तक्रार करावी लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : दर्जेदार शिक्षणाच्या नावावर शिक्षणाचा व्यापार करणाऱ्या अनेक संस्था आज उदयास आल्या आहेत. त्यांच्या भव्यतेत आणि दिव्यतेने पालक भारावून जातात. त्यांच्या याच भारात शाळांकडून सक्ती करीत मुलांच्या पाठीवर दप्तराचा भार देत आहेत. उत्तम शिक्षणाच्या नावावर या संस्थांकडून चिमुकल्यांच्या पाठीवर दप्तराचा भार देताना मात्र नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसून आले आहे. यावर कार्यवाही करण्याकडे येथील शिक्षण विभाग मात्र दुर्लक्ष करीत असून या बाबत पालकांनीही जागरूक राहणे गरजेचे झाले आहे. आज कॉन्व्हेंटच्या सर्वच शाळातून पुस्तकांची विक्री होत आहे. सर्वच पुस्तके आवश्यक असल्याचे सांगण्यात येते. या पुस्तकांसोबत तेवढ्याच वह्याही विद्यार्थ्यांना देण्यात येतात. ही पुस्तके आणि वह्या या चिमुकल्यांच्या वयानुसार जास्तच असल्याचे दिसून येते. शासनाने विद्यार्थ्यांच्या पाठीवर देण्यात येत असलेल्या दप्तराच्या वजनाबाबत काही मापदंड दिले आहेत. येथे मात्र या मापदंडाची पुरती वाट लावल्याचे दिसून आले आहे. यावर कार्यवाही करण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून एक पथक तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्यांच्याकडून जिल्ह्यात अद्यापही कार्यवाही झालेली नाही. जिल्ह्यात ११६ कॉन्व्हेंट सध्या प्रत्येक पालकांना आपला मुलगा कॉन्व्हेंटमध्ये शिकावा असे वाटत असल्याने जिल्ह्यात कॉन्व्हेंटची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज स्थितीत जिल्ह्यात ११६ कॉन्व्हेंट असल्याची नोंद शिक्षण विभागात आहे. या व्यतिरिक्त ५०३ खासगी शाळा आहेत. या शाळांत दप्तराच्या नियमांचे उलंघन होत आहे. विद्यार्थ्यांच्या वजनाच्या तीन टक्केच वजन दप्तराचे असावे शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार साधाणत: विद्यार्थ्यांच्या वजनाच्या तीन टक्के वजन त्याच्या दप्तराचे असणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात बऱ्याच शाळांत या नियमाला बगल देण्यात येत आहे. यावर कार्यवाही करण्यासंदर्भात सर्वांच्या नजरा शिक्षण विभागाकडे आहेत. मात्र या संदर्भात कोणत्याही पालकाने तक्रार केली नसल्याचे समोर आले आहे. काही शाळांत निम्मी पुस्तके घरीच जिल्ह्यातील काही शाळांत विद्यार्थ्यांच्या पाठीवर असलेले ओझे कमी करण्याची सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांकडे असलेली निम्मी पुस्तके शाळेतच ठेवण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. हा उपक्रम इतर शाळांनीही राबविण्याची आवश्यकता आहे. तपासणी पथकाची कार्यवाही शून्यच दप्तराच्या वजनासंदर्भात शासनचा नियम येताच शिक्षण विभागाच्यावतीने एक पथक तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. या पथकाकडून प्रत्येक शाळेत जात दप्तराचे वजन करण्यात येणार आहे. ज्या शाळेत नियमाच उल्लंघण होत असल्याचे दिसून आले. त्या शाळेवर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार होती. यात शाळेची परवानगी रद्द करण्यासंदर्भातही कार्यवाही करण्यात येणार होती. मात्र जिल्ह्यात अशी कुठलीही कार्यवाही झाली नाही. यामुळे पथक निर्मितीवरही संशय निर्माण होत आाहे.