शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

बंद पथदिव्यांमुळे पुलावर काळोख

By admin | Updated: June 11, 2017 00:52 IST

शहरातील उडाणपुलावर तसेच महामार्गावर लावण्यात आलेले पथदिवे मागील काही महिन्यांपासून बंद आहेत.

नगर पालिका प्रशासनाचा कानाडोळा : युथ फाऊंडेशनची उपविभागीय कार्यालयावर धडक लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : शहरातील उडाणपुलावर तसेच महामार्गावर लावण्यात आलेले पथदिवे मागील काही महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी, उड्डाणपुलावर काळोखाचे साम्राज्य असते. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा अजय मडावी युथ फाऊंडेशनद्वारे देण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत निवेदन सादर करण्यात आले. शहरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना प्रशासन उड्डाणपूल तसेच अन्य मार्गावरील बंद पथदिव्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. येत्या काही दिवसांत उड्डाणपुलावर तसेच महामार्ग क्र. ७ वरील पथदिव्यांची व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी फाऊंडेशनचे लिलाधर मडावी यांनी केली आहे. शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर लावण्यात आलेले पथदिवे बंद पडलेले आहेत. या परिसरात तथा उडाणपुलावर दररोज नागरिक पहाटे तसेच रात्री फिरायला जातात; पण पथदिवे बंद असल्यामुळे काळोख पसरलेला असतो. परिणामी, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फिरायला येणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश असतो. पुरुष तसेच महिला सायंकाळी जेवण झाल्यानंतरही फिरायला जातात. यात भरधाव वाहने चालविणाऱ्यांचा वा गुन्हेगारांचा धोका संभवतो. वेगात वाहन चालविणाऱ्यांमुळे या परिसरात सातत्याने अपघात झाले आहेत. यामुळे परिसरातील पथदिवे सुरू करणे गरजेचे झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी रात्री ९ वाजताच्या सुमारास याच महामार्गावर बहिणीला दुचाकीवर बसवून रुग्णालयात नेत असताना अतुल गजभीये याच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली होती. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही पथदिवे सुरू करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या पथदिव्यांचे वीज देयक भरण्याची जबाबदारी टोल वसूल करणाऱ्या कंत्राटदाराची आहे. एका कंपनीकडून वडनेर लगत टोलनाक्यवर टोल वसूल केला जातो; पण पथदिव्यांची देखभाल केली जात नाही. वीज बिलाची रक्कम न भरता पथदिवे बंद ठेवत नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा हा प्रकार त्वरित थांबवावा. पथदिवे सुरू करावे अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शहरातील त्रस्त नागरिक व फाउंडेशनने दिला. निवेदन देताना लिलाधर मडावी, पंकज वानखेडे, भिशांत कोल्हे, भरत शिंदे, अनिकेत सहारे, शुभम ठाकरे, गोलू शिंदे, सौरव वानखेडे, सागर मुडे, विक्की जुमडे, संतोष येनोरकर, गौरव नंदागवळी, प्रज्वल भगत, साहिल भगत, गोपाल जाखोटिया, अजय मंगेकर, प्रसाद धनवटे, धीरज चौधरी आदी उपस्थित होते. टोल वसुली करूनही पथदिव्यांच्या देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्ष राष्ट्रीय महामार्गावर पथदिवे लावण्यात आले. हे पथदिवे विद्युत देयक अदा न केल्याने बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. वास्तविक, या पथदिव्यांच्या देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी टोल नाक्याकडे देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर वडनेर लगत एका कंपनीद्वारे वाहन धारकांकडून टोल वसूल केला जातो; पण पथदिव्यांची देखभाल, दुरूस्ती केली जात नसल्योचच दिसून येत आहे. परिणामी, राष्ट्रीय महामार्गासह उड्डाणपुलावर काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. नगर पालिका, जिल्हा प्रशासन व टोल कंपनीने याकडे लक्ष देत उड्डाणपुलावरील तसेच महामार्गावरील पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे. पथदिवे देतात पुलाखाली प्रकाश सेवाग्राम : शहरातून सेवाग्रामकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या इंदिरा गांधी उड्डाणपुलावर पथदिवे लावण्यात आलेले आहेत. यातील काही पथदिवे उड्डाणपुलावर तर काही पथदिवे पुलाच्या खालील भाग प्रकाशमान करीत असल्याचे दिसते. बहुतांश पथदिव्यांचे तोंड विरूद्ध दिशेने झाल्याने त्यांच्या प्रकाशाचा उपयोग कुणाला, हा प्रश्नच आहे. याच पुलाजवळ हायमास्ट असून काही महिन्यांपासून तो बंद आहे. यातीलही अर्धे दिवे आकाशाच्या दिशेने झाले आहे. या प्रकारामुळे उड्डाणपुलावर मात्र काळोखाचेच साम्राज्य असल्याचे दिसून येत आहे.