शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

बंद पथदिव्यांमुळे पुलावर काळोख

By admin | Updated: June 11, 2017 00:52 IST

शहरातील उडाणपुलावर तसेच महामार्गावर लावण्यात आलेले पथदिवे मागील काही महिन्यांपासून बंद आहेत.

नगर पालिका प्रशासनाचा कानाडोळा : युथ फाऊंडेशनची उपविभागीय कार्यालयावर धडक लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : शहरातील उडाणपुलावर तसेच महामार्गावर लावण्यात आलेले पथदिवे मागील काही महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी, उड्डाणपुलावर काळोखाचे साम्राज्य असते. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा अजय मडावी युथ फाऊंडेशनद्वारे देण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत निवेदन सादर करण्यात आले. शहरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना प्रशासन उड्डाणपूल तसेच अन्य मार्गावरील बंद पथदिव्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. येत्या काही दिवसांत उड्डाणपुलावर तसेच महामार्ग क्र. ७ वरील पथदिव्यांची व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी फाऊंडेशनचे लिलाधर मडावी यांनी केली आहे. शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर लावण्यात आलेले पथदिवे बंद पडलेले आहेत. या परिसरात तथा उडाणपुलावर दररोज नागरिक पहाटे तसेच रात्री फिरायला जातात; पण पथदिवे बंद असल्यामुळे काळोख पसरलेला असतो. परिणामी, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फिरायला येणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश असतो. पुरुष तसेच महिला सायंकाळी जेवण झाल्यानंतरही फिरायला जातात. यात भरधाव वाहने चालविणाऱ्यांचा वा गुन्हेगारांचा धोका संभवतो. वेगात वाहन चालविणाऱ्यांमुळे या परिसरात सातत्याने अपघात झाले आहेत. यामुळे परिसरातील पथदिवे सुरू करणे गरजेचे झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी रात्री ९ वाजताच्या सुमारास याच महामार्गावर बहिणीला दुचाकीवर बसवून रुग्णालयात नेत असताना अतुल गजभीये याच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली होती. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही पथदिवे सुरू करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या पथदिव्यांचे वीज देयक भरण्याची जबाबदारी टोल वसूल करणाऱ्या कंत्राटदाराची आहे. एका कंपनीकडून वडनेर लगत टोलनाक्यवर टोल वसूल केला जातो; पण पथदिव्यांची देखभाल केली जात नाही. वीज बिलाची रक्कम न भरता पथदिवे बंद ठेवत नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा हा प्रकार त्वरित थांबवावा. पथदिवे सुरू करावे अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शहरातील त्रस्त नागरिक व फाउंडेशनने दिला. निवेदन देताना लिलाधर मडावी, पंकज वानखेडे, भिशांत कोल्हे, भरत शिंदे, अनिकेत सहारे, शुभम ठाकरे, गोलू शिंदे, सौरव वानखेडे, सागर मुडे, विक्की जुमडे, संतोष येनोरकर, गौरव नंदागवळी, प्रज्वल भगत, साहिल भगत, गोपाल जाखोटिया, अजय मंगेकर, प्रसाद धनवटे, धीरज चौधरी आदी उपस्थित होते. टोल वसुली करूनही पथदिव्यांच्या देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्ष राष्ट्रीय महामार्गावर पथदिवे लावण्यात आले. हे पथदिवे विद्युत देयक अदा न केल्याने बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. वास्तविक, या पथदिव्यांच्या देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी टोल नाक्याकडे देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर वडनेर लगत एका कंपनीद्वारे वाहन धारकांकडून टोल वसूल केला जातो; पण पथदिव्यांची देखभाल, दुरूस्ती केली जात नसल्योचच दिसून येत आहे. परिणामी, राष्ट्रीय महामार्गासह उड्डाणपुलावर काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. नगर पालिका, जिल्हा प्रशासन व टोल कंपनीने याकडे लक्ष देत उड्डाणपुलावरील तसेच महामार्गावरील पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे. पथदिवे देतात पुलाखाली प्रकाश सेवाग्राम : शहरातून सेवाग्रामकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या इंदिरा गांधी उड्डाणपुलावर पथदिवे लावण्यात आलेले आहेत. यातील काही पथदिवे उड्डाणपुलावर तर काही पथदिवे पुलाच्या खालील भाग प्रकाशमान करीत असल्याचे दिसते. बहुतांश पथदिव्यांचे तोंड विरूद्ध दिशेने झाल्याने त्यांच्या प्रकाशाचा उपयोग कुणाला, हा प्रश्नच आहे. याच पुलाजवळ हायमास्ट असून काही महिन्यांपासून तो बंद आहे. यातीलही अर्धे दिवे आकाशाच्या दिशेने झाले आहे. या प्रकारामुळे उड्डाणपुलावर मात्र काळोखाचेच साम्राज्य असल्याचे दिसून येत आहे.