शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

बंद पथदिव्यांमुळे पुलावर काळोख

By admin | Updated: June 11, 2017 00:52 IST

शहरातील उडाणपुलावर तसेच महामार्गावर लावण्यात आलेले पथदिवे मागील काही महिन्यांपासून बंद आहेत.

नगर पालिका प्रशासनाचा कानाडोळा : युथ फाऊंडेशनची उपविभागीय कार्यालयावर धडक लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : शहरातील उडाणपुलावर तसेच महामार्गावर लावण्यात आलेले पथदिवे मागील काही महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी, उड्डाणपुलावर काळोखाचे साम्राज्य असते. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा अजय मडावी युथ फाऊंडेशनद्वारे देण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत निवेदन सादर करण्यात आले. शहरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना प्रशासन उड्डाणपूल तसेच अन्य मार्गावरील बंद पथदिव्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. येत्या काही दिवसांत उड्डाणपुलावर तसेच महामार्ग क्र. ७ वरील पथदिव्यांची व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी फाऊंडेशनचे लिलाधर मडावी यांनी केली आहे. शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर लावण्यात आलेले पथदिवे बंद पडलेले आहेत. या परिसरात तथा उडाणपुलावर दररोज नागरिक पहाटे तसेच रात्री फिरायला जातात; पण पथदिवे बंद असल्यामुळे काळोख पसरलेला असतो. परिणामी, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फिरायला येणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश असतो. पुरुष तसेच महिला सायंकाळी जेवण झाल्यानंतरही फिरायला जातात. यात भरधाव वाहने चालविणाऱ्यांचा वा गुन्हेगारांचा धोका संभवतो. वेगात वाहन चालविणाऱ्यांमुळे या परिसरात सातत्याने अपघात झाले आहेत. यामुळे परिसरातील पथदिवे सुरू करणे गरजेचे झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी रात्री ९ वाजताच्या सुमारास याच महामार्गावर बहिणीला दुचाकीवर बसवून रुग्णालयात नेत असताना अतुल गजभीये याच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली होती. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही पथदिवे सुरू करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या पथदिव्यांचे वीज देयक भरण्याची जबाबदारी टोल वसूल करणाऱ्या कंत्राटदाराची आहे. एका कंपनीकडून वडनेर लगत टोलनाक्यवर टोल वसूल केला जातो; पण पथदिव्यांची देखभाल केली जात नाही. वीज बिलाची रक्कम न भरता पथदिवे बंद ठेवत नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा हा प्रकार त्वरित थांबवावा. पथदिवे सुरू करावे अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शहरातील त्रस्त नागरिक व फाउंडेशनने दिला. निवेदन देताना लिलाधर मडावी, पंकज वानखेडे, भिशांत कोल्हे, भरत शिंदे, अनिकेत सहारे, शुभम ठाकरे, गोलू शिंदे, सौरव वानखेडे, सागर मुडे, विक्की जुमडे, संतोष येनोरकर, गौरव नंदागवळी, प्रज्वल भगत, साहिल भगत, गोपाल जाखोटिया, अजय मंगेकर, प्रसाद धनवटे, धीरज चौधरी आदी उपस्थित होते. टोल वसुली करूनही पथदिव्यांच्या देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्ष राष्ट्रीय महामार्गावर पथदिवे लावण्यात आले. हे पथदिवे विद्युत देयक अदा न केल्याने बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. वास्तविक, या पथदिव्यांच्या देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी टोल नाक्याकडे देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर वडनेर लगत एका कंपनीद्वारे वाहन धारकांकडून टोल वसूल केला जातो; पण पथदिव्यांची देखभाल, दुरूस्ती केली जात नसल्योचच दिसून येत आहे. परिणामी, राष्ट्रीय महामार्गासह उड्डाणपुलावर काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. नगर पालिका, जिल्हा प्रशासन व टोल कंपनीने याकडे लक्ष देत उड्डाणपुलावरील तसेच महामार्गावरील पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे. पथदिवे देतात पुलाखाली प्रकाश सेवाग्राम : शहरातून सेवाग्रामकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या इंदिरा गांधी उड्डाणपुलावर पथदिवे लावण्यात आलेले आहेत. यातील काही पथदिवे उड्डाणपुलावर तर काही पथदिवे पुलाच्या खालील भाग प्रकाशमान करीत असल्याचे दिसते. बहुतांश पथदिव्यांचे तोंड विरूद्ध दिशेने झाल्याने त्यांच्या प्रकाशाचा उपयोग कुणाला, हा प्रश्नच आहे. याच पुलाजवळ हायमास्ट असून काही महिन्यांपासून तो बंद आहे. यातीलही अर्धे दिवे आकाशाच्या दिशेने झाले आहे. या प्रकारामुळे उड्डाणपुलावर मात्र काळोखाचेच साम्राज्य असल्याचे दिसून येत आहे.