शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बंद पथदिव्यांमुळे पुलावर काळोख

By admin | Updated: June 11, 2017 00:52 IST

शहरातील उडाणपुलावर तसेच महामार्गावर लावण्यात आलेले पथदिवे मागील काही महिन्यांपासून बंद आहेत.

नगर पालिका प्रशासनाचा कानाडोळा : युथ फाऊंडेशनची उपविभागीय कार्यालयावर धडक लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : शहरातील उडाणपुलावर तसेच महामार्गावर लावण्यात आलेले पथदिवे मागील काही महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी, उड्डाणपुलावर काळोखाचे साम्राज्य असते. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा अजय मडावी युथ फाऊंडेशनद्वारे देण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत निवेदन सादर करण्यात आले. शहरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना प्रशासन उड्डाणपूल तसेच अन्य मार्गावरील बंद पथदिव्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. येत्या काही दिवसांत उड्डाणपुलावर तसेच महामार्ग क्र. ७ वरील पथदिव्यांची व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी फाऊंडेशनचे लिलाधर मडावी यांनी केली आहे. शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर लावण्यात आलेले पथदिवे बंद पडलेले आहेत. या परिसरात तथा उडाणपुलावर दररोज नागरिक पहाटे तसेच रात्री फिरायला जातात; पण पथदिवे बंद असल्यामुळे काळोख पसरलेला असतो. परिणामी, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फिरायला येणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश असतो. पुरुष तसेच महिला सायंकाळी जेवण झाल्यानंतरही फिरायला जातात. यात भरधाव वाहने चालविणाऱ्यांचा वा गुन्हेगारांचा धोका संभवतो. वेगात वाहन चालविणाऱ्यांमुळे या परिसरात सातत्याने अपघात झाले आहेत. यामुळे परिसरातील पथदिवे सुरू करणे गरजेचे झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी रात्री ९ वाजताच्या सुमारास याच महामार्गावर बहिणीला दुचाकीवर बसवून रुग्णालयात नेत असताना अतुल गजभीये याच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली होती. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही पथदिवे सुरू करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या पथदिव्यांचे वीज देयक भरण्याची जबाबदारी टोल वसूल करणाऱ्या कंत्राटदाराची आहे. एका कंपनीकडून वडनेर लगत टोलनाक्यवर टोल वसूल केला जातो; पण पथदिव्यांची देखभाल केली जात नाही. वीज बिलाची रक्कम न भरता पथदिवे बंद ठेवत नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा हा प्रकार त्वरित थांबवावा. पथदिवे सुरू करावे अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शहरातील त्रस्त नागरिक व फाउंडेशनने दिला. निवेदन देताना लिलाधर मडावी, पंकज वानखेडे, भिशांत कोल्हे, भरत शिंदे, अनिकेत सहारे, शुभम ठाकरे, गोलू शिंदे, सौरव वानखेडे, सागर मुडे, विक्की जुमडे, संतोष येनोरकर, गौरव नंदागवळी, प्रज्वल भगत, साहिल भगत, गोपाल जाखोटिया, अजय मंगेकर, प्रसाद धनवटे, धीरज चौधरी आदी उपस्थित होते. टोल वसुली करूनही पथदिव्यांच्या देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्ष राष्ट्रीय महामार्गावर पथदिवे लावण्यात आले. हे पथदिवे विद्युत देयक अदा न केल्याने बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. वास्तविक, या पथदिव्यांच्या देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी टोल नाक्याकडे देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर वडनेर लगत एका कंपनीद्वारे वाहन धारकांकडून टोल वसूल केला जातो; पण पथदिव्यांची देखभाल, दुरूस्ती केली जात नसल्योचच दिसून येत आहे. परिणामी, राष्ट्रीय महामार्गासह उड्डाणपुलावर काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. नगर पालिका, जिल्हा प्रशासन व टोल कंपनीने याकडे लक्ष देत उड्डाणपुलावरील तसेच महामार्गावरील पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे. पथदिवे देतात पुलाखाली प्रकाश सेवाग्राम : शहरातून सेवाग्रामकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या इंदिरा गांधी उड्डाणपुलावर पथदिवे लावण्यात आलेले आहेत. यातील काही पथदिवे उड्डाणपुलावर तर काही पथदिवे पुलाच्या खालील भाग प्रकाशमान करीत असल्याचे दिसते. बहुतांश पथदिव्यांचे तोंड विरूद्ध दिशेने झाल्याने त्यांच्या प्रकाशाचा उपयोग कुणाला, हा प्रश्नच आहे. याच पुलाजवळ हायमास्ट असून काही महिन्यांपासून तो बंद आहे. यातीलही अर्धे दिवे आकाशाच्या दिशेने झाले आहे. या प्रकारामुळे उड्डाणपुलावर मात्र काळोखाचेच साम्राज्य असल्याचे दिसून येत आहे.