शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

सोयाबीनची मळणी धोक्यात

By admin | Updated: October 3, 2016 00:36 IST

जिल्ह्यात गत आठवड्यापासून दररोच पाऊस येत आहे. या पावसामुळे मळणीवर आलेले सोयाबीन धोक्यात आले आहे.

सततच्या पावसाने शेतात चिखल : शेंगा फुटण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेतवर्धा : जिल्ह्यात गत आठवड्यापासून दररोच पाऊस येत आहे. या पावसामुळे मळणीवर आलेले सोयाबीन धोक्यात आले आहे. शेतात चिखल होत असल्याने सोयाबीनची मळणी रखडली आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास उत्पन्नात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. पावसाळ्याच्या मृग नक्षत्रापासून निसर्गाने उत्तरा नक्षत्रापर्यंत शेतकऱ्यांना साथ दिली; पण उत्तरा नक्षत्र सुरू होतात पाऊस लागून पडल्याने सोयाबीन पिकाची मळणी धोक्यात आली. सोयाबीनच्या शेंगा दाण्यांनी भरल्या असून मळणीला विलंब झाल्यास त्या फुटून त्यातील दाणे खाली पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करण्याची भीती त्यांच्या मनात घर करीत असल्याचे दिसत आहे. हातात आलेले पीक पोत्यात जाण्याअगोदर ते खाली तर जाणार नाही ना, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सतत सुरू असलेला पाऊस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढविणारा ठरत आहे. सोयाबीन कापणीचे दिवस येताच २६ सप्टेंबरपासून हस्त नक्षत्राला प्रारंभ झाला अन् मुसळधार पावसाच्या सरी सुरू झाल्या. यामुळे कापणीस आलेले शेतातच उभे असलेल्या सोयाबीनच्या शेंगा उन्ह तापताच फुटण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात असतानाच शेंगांना झाडावरच अंकूर फुटत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)