शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नदी काठावरील ८८ गावांना पुराचा धोका

By admin | Updated: May 1, 2016 02:08 IST

जिल्ह्यात नदी काठावरील ८८ गावांना पावसाळ्यात पुराचा धोका असतो. शिवाय अन्य उपाययोजनाही कराव्या लागतात.

वर्धा : जिल्ह्यात नदी काठावरील ८८ गावांना पावसाळ्यात पुराचा धोका असतो. शिवाय अन्य उपाययोजनाही कराव्या लागतात. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी करायच्या उपाययोजनांबाबत जिल्हा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास जिल्हास्तरीय यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दीपक नलावडे यांनी दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नैसर्गिक आपत्ती तसेच मॉन्सून पूर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी नलावडे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी व पूर परिस्थितीमध्ये करावयाच्या उपाययोजनांबाबत विभागनिहाय जिल्हा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या संकेत स्थळावरही तो उपलब्ध आहे. यात नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी विभागनिहाय अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक तसेच विभागांच्या कार्यप्रणालीबाबत माहिती देण्यात आलेली आहे. तालुकास्तरावर मान्सून पूर्व आढावा बैठकीतून नदी आणि नाल्यांमुळे बाधित होणाऱ्या गावांची माहिती घेऊन पूर परिस्थिती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजनांबाबत आराखडा तयार करावा, अशा सूचना करतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी या आराखड्यात ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसेवक व प्रमुख व्यक्तींची नावे असलेली दूरध्वनीसह यादी तयार करावी, नगर परिषदा व ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांमधून धोकादायक इमारतींच्या मालकांना सूचना देण्यात यावी, नदी व नाल्यातील कचरा व गाळ काढण्याची मोहीम राबवावी, असेही सांगितले.जिल्ह्यात असलेल्या आरोग्य सुविधा आणि त्या अंतर्गत असणाऱ्या गावांची माहिती, मोठे व मध्यम प्रकल्पांमध्ये असलेल्या पाणीसाठा याबाबत तसेच पूर नियंत्रणाबाबत आपतकालीन कृती आराखडा तयार करून जलाशयाची पातळी दररोज जिल्हा नियंत्रण कक्षाकडे उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचनाही करण्यात आली. पोलीस विभाग, जिल्हा दूरसंचार यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, होमगार्ड, जिल्हा परिषद, गटशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, महामंडळ यांच्यातर्फे मान्सूनपूर्व तयारी संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा आढावा यावेळी घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ उपाययोजनांबाबत सादरीकरण केले.(कार्यालय प्रतिनिधी)