शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांचे जिल्हाकचेरीपुढे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 22:32 IST

अप्पर वर्धा धरणग्रस्तांच्या विविध समस्या आहेत. त्या तात्काळ सोडविण्याच्या मागणीसाठी धरणग्रस्तांनी जिल्हाकचेरी समोर २३ फेब्रुवारीपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देसमस्या सोडविण्याची मागणी : अप्पर वर्धा धरणग्रस्त संघर्ष समितीचे आंदोलन

ऑनलाईन लोकमतवर्धा : अप्पर वर्धा धरणग्रस्तांच्या विविध समस्या आहेत. त्या तात्काळ सोडविण्याच्या मागणीसाठी धरणग्रस्तांनी जिल्हाकचेरी समोर २३ फेब्रुवारीपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या मागण्यांवर गत दोन दिवसांपासून सकारात्मक विचार न झाल्याने रविवारी तिसºया दिवशीही आंदोलन सुरूच होते. धरणग्रस्तांच्या विविध समस्या त्वरित निकाली काढा अशी त्यांची मागणी आहे.जिल्ह्यात एकूण ३ हजार ४६६ प्रकल्पग्रस्त असून केवळ ११३ प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरी देण्यात आली आहे. ३ हजार ४२३ प्रकल्पग्रस्त अनुनही सरकारनी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. १८ एप्रिल २०१७ ला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत मुंबई येथे चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी मोबदला देण्याचे कबुल केले. तसेच २१ डिसेंबर २०१७ ला मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांनी आंदोनकर्त्यांची मागणी रास्त असून तो तुमचा हक्क असल्याचे कबुल करीत तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे असा उद्देश ठेवून २१ जानेवारी २०१८ ला आयुक्त नागपुर, आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी अमरावतीसह वर्धा आणि जिल्हाधिकारी नागपूर यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले; पण अद्यापही यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. ६ जानेवारी २०१८ ला ना. नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवित या प्रकरणी तात्काळ बैठक लावून प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा असे सांगितले. मात्र, अद्यापही प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या निकाली काढण्यात आल्या नाही. उपेक्षित प्रकल्पग्रस्तांना शेतजमिनीचे त्वरित वाटप करण्यात यावे. १८ एप्रिल २०१७ ला मुंबईच्या मंत्रालयात ना. चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक झाली असून त्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना वाटपाकरिता निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. न्यायालयाने वाढीव मोबदला दिलेला असून त्याप्रमाणे सरसकट प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देण्यात यावा आदी मागण्यांसाठी अप्पर वर्धा धरणग्रस्त संघर्ष समितीच्या नेतृत्त्वात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मागण्या रेटण्यात आल्या. आंदोलनात वर्षा मनोहरे, नितेश मनोहरे, मंगेश वानखडे, लवकुश माने, किशोर उंदरे, सुभाष दहिवाडे, श्रीकृष्ण कठाणे, श्रीधर खोपे, राजु दहिवाडे, सुनील माहूरे, भास्कर भुजाडे, राजेंद्र बनकर, नाना भुजाडे, नंदकिशोर खरबडे, दीपक पुंड, गजानन मनोहरे आदी सहभागी झाले होते.घंटानाद करून नोंदविला शेतकरीविरोधी धोरणांचा निषेधआंदोलनादरम्यान धरणग्रस्तांना वेळोवेळी लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासने देण्यात आली. धरणग्रस्तांच्या समस्या निकाली काढा कशी मागणी करीत सदर आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण्यांच्या निषेधार्थ जिल्हाकचेरी समोरील आंदोलनादरम्यान घंटानाद केला.