शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
4
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
5
सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
6
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
9
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
10
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
11
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
12
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
13
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
14
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
15
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
16
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
17
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
18
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
19
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
20
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?

वादळी पावसाच्या तडाख्याने पिकांचे नुकसान

By admin | Updated: September 20, 2015 02:32 IST

गत चार दिवसांपासून तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे. पावसाच्या तडाख्याने तालुक्यातील कापूस व सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.

शेतकरी हतबल : हातात आलेले पीक जाण्याची भीतीसमुद्रपूर : गत चार दिवसांपासून तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे. पावसाच्या तडाख्याने तालुक्यातील कापूस व सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. हातात येणारे पीक भूईसपाट होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.यावर्षी निसर्गाने साथ दिल्याने पिके बऱ्यापैकी बहरली होती; पण अचानक वादळी पावसाने थैमान घालून पिकांची धुळधान केली आहे. तालुक्यात कपाशी पिकांच्या पात्या गळाल्या असून वादळामुळे पऱ्हाटी पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. सोयाबीन पीक नुकतेच सवंगण्यावर आले होते. शेंगा भरलेल्या सोयाबीन पिकाला कोंब फुटल्याचेही दिसून येत आहे. यामुळे सोयाबीनही हातचे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. यंदाही शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढणार तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनानी शेतकऱ्यांच्या नुकसानीची बाब गंभीरतेने घेणे गरजेचे झाले आहे. काही दिवसांत कपाशीचे हमीभाव जाहीर होतील. यात गतवर्षी -प्रमाणेच ५० रुपये वाढ देऊन थट्टा केल्यास शेतकऱ्यांना जगणेच कठीण होणार आहे. यामुळे कापसाला पाच ते सहा हजार रुपये क्विंटल भाव देत शासनानेच खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)हमीभाव वाढल्यास कमी होणार कर्जाचा भारकृषिप्रधान देशात शेतकरीविरोधी व व्यापारी हिताचे धोरण राबवित कापसाचा हमीभाव जाहीर केला जातो. यात प्रत्येक वर्षी ५० ते १०० रुपये वाढ करीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जातात. यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईतून बाहेर निघत नसल्याचा आरोप होत आहे. गतवर्षी ५० रुपयेच वाढ करीत ४०५० रुपये हमीभाव जाहीर केला. यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे. शेतकऱ्यांना तारायचे असेल तर शेतकऱ्यांना हमीभावात भरीव वाढ देणेच गरजेचे झाले आहे.‘शेतकरी सुखी तर जग सुखी’ अशी म्हण प्रचलित होती; पण या म्हणीला अर्थच राहिला नाही. शेतकऱ्यांची फसवणूक करीत अल्प भावात पांढरे सोने खरेदी करण्याचा घाट घातला जात आहे. सोयाबीनलाही विशेष भाव मिळत नाही. यामुळे शेतमालाचे हमीभाव वाढविणे गरजेचे आहे.