शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

वादळी पावसाच्या तडाख्याने पिकांचे नुकसान

By admin | Updated: September 20, 2015 02:32 IST

गत चार दिवसांपासून तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे. पावसाच्या तडाख्याने तालुक्यातील कापूस व सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.

शेतकरी हतबल : हातात आलेले पीक जाण्याची भीतीसमुद्रपूर : गत चार दिवसांपासून तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे. पावसाच्या तडाख्याने तालुक्यातील कापूस व सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. हातात येणारे पीक भूईसपाट होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.यावर्षी निसर्गाने साथ दिल्याने पिके बऱ्यापैकी बहरली होती; पण अचानक वादळी पावसाने थैमान घालून पिकांची धुळधान केली आहे. तालुक्यात कपाशी पिकांच्या पात्या गळाल्या असून वादळामुळे पऱ्हाटी पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. सोयाबीन पीक नुकतेच सवंगण्यावर आले होते. शेंगा भरलेल्या सोयाबीन पिकाला कोंब फुटल्याचेही दिसून येत आहे. यामुळे सोयाबीनही हातचे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. यंदाही शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढणार तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनानी शेतकऱ्यांच्या नुकसानीची बाब गंभीरतेने घेणे गरजेचे झाले आहे. काही दिवसांत कपाशीचे हमीभाव जाहीर होतील. यात गतवर्षी -प्रमाणेच ५० रुपये वाढ देऊन थट्टा केल्यास शेतकऱ्यांना जगणेच कठीण होणार आहे. यामुळे कापसाला पाच ते सहा हजार रुपये क्विंटल भाव देत शासनानेच खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)हमीभाव वाढल्यास कमी होणार कर्जाचा भारकृषिप्रधान देशात शेतकरीविरोधी व व्यापारी हिताचे धोरण राबवित कापसाचा हमीभाव जाहीर केला जातो. यात प्रत्येक वर्षी ५० ते १०० रुपये वाढ करीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जातात. यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईतून बाहेर निघत नसल्याचा आरोप होत आहे. गतवर्षी ५० रुपयेच वाढ करीत ४०५० रुपये हमीभाव जाहीर केला. यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे. शेतकऱ्यांना तारायचे असेल तर शेतकऱ्यांना हमीभावात भरीव वाढ देणेच गरजेचे झाले आहे.‘शेतकरी सुखी तर जग सुखी’ अशी म्हण प्रचलित होती; पण या म्हणीला अर्थच राहिला नाही. शेतकऱ्यांची फसवणूक करीत अल्प भावात पांढरे सोने खरेदी करण्याचा घाट घातला जात आहे. सोयाबीनलाही विशेष भाव मिळत नाही. यामुळे शेतमालाचे हमीभाव वाढविणे गरजेचे आहे.