शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनासाठी धरणेही असमर्थ

By admin | Updated: July 16, 2015 00:01 IST

पावसाने दडी मारल्याने पाऊस येईपर्यंत तरी पिके कशीबशी जगावी, यासाठी सिंचनाखाली जमिनी असलेले शेतकरी कालव्यात पाणी सोडण्याची मागणी करीत आहे.

शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव निम्न वर्धा व मदन कालव्यात सोडले पाणी वर्धा : पावसाने दडी मारल्याने पाऊस येईपर्यंत तरी पिके कशीबशी जगावी, यासाठी सिंचनाखाली जमिनी असलेले शेतकरी कालव्यात पाणी सोडण्याची मागणी करीत आहे. बोर प्रकल्प सोडून कोणत्याच प्रकल्पात पाणी नसल्याचे सिंचन विभाग सांगत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने निम्न वर्धा आणि मदन प्रकल्पातून कालव्याद्वारे पिकांसाठी थोडे फार पाणी सोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. कपाशी व सोयाबीनला कसे जगवावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. दुपारी तापत असलेल्या उन्हामुळे जमीन कोरडी पडत चालली आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन वाळू लागले आहे. विहिरीद्वारे सिंचनाची सोय असलेले शेतकरी आपली पिके कशीबशी जगवित असले तरी कोरडवाहू शेतकरी मात्र हतबल झाले आहे. कालव्याद्वारे सिंचनाची सोय असलेले शेतकरी एक तरी पाणी कालव्यात सोडण्याची मागणी करीत आहे. परंतु पिण्यासाठी पाणी राखीव ठेवणे भाग असल्याने सिंचनासाठी सोडता येईल एवढे पाणी बोर सोडून कोणत्याही प्रकल्पात नसल्याचे सिंचन विभागाने स्पष्ट केले होते. परंतु सिंचनासाठी पाण्याची मागणी आणि जिल्हाधिकारी यांचे आदेश यामुळे निम्न वर्धा प्रकल्पात १० क्यूसेक तर मदन धरणातूनही काही प्रमाणात पाणी सोडण्यात आले. असले तरी सिंचनासाठी प्रकल्प सध्या असमर्थ ठरत आहे. (शहर प्रतिनिधी) शेतकरी सिंचनासाठी पाण्याची मागणी करीत आहे. परंतु तितकासा जलसाठा उपलब्ध नाही. परंतु गरज आणि जिल्हाधिकारी यांचा आदेश लक्षात घेता निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्यातून १० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. सोडलेले पाणी वाया जाऊ नये एवढीच सध्या अपेक्षा आहे.- बी. एम. राहाटे, कार्यकारी अभियंता, निम्न वर्धा प्रकल्प(कालवे विभाग)शेतकरी वर्र्गानेही सहकार्य करण्याची गरजजिल्ह्यात कवाडी, सावंगी, लहादेवी, पारगोठाण, अंबाझरी, पांजरा-बोथली, उमरी, टेंभरी, आंजी(बो.), दहेगाव(गोंडी), कुऱ्हा, रोठा-१, रोठा-२, आष्टी, पिलापूर, कन्नमवारग्राम, परसोडी, मलकापूर, हरासी, टाकळी(बो.) असे एकून २० सिंचन तलाव आहेत. यातील केवळ कवाडी तलावातून सिंचनासाठी १० टक्के पर्यंत पाणी सिंचनासाठी सोडले जाऊ शकते, असे अभियंता मेश्राम यांनी सांगितले. शेतकरी सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी करीत आहे. परंतु पाऊस केव्हा येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे साठ्यात असलेले पाणी खूपच मौल्यवान आहे. विशेष म्हणजे शेतकरी आपापसातच पाण्यासाठी वाद घालत आहे. सोडलेले पाणी वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी पाणी सोडलेले नाही. शेतकऱ्यांनीही सिंचन विभागाला सहकार्य करणे गरजेचे असलेचे मेश्राम यांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण १५ लहान मोठे सिंचन प्रकल्प आहे. यातील बहुतेक प्रकल्पांची स्थिती अतिशय दयनिय असून त्यांनी गाठलेला तळ अद्यापही वर आलेला नाही. गतवर्षीच्या या कालावधीतील पाणीसाठ्याशी आताच्या स्थितीची तुलना करता काहीच प्रकल्प सोडता बाकी प्रकल्पात खूपच कमी जलसाठा उपलब्ध आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेला बोर प्रकल्पात आजच्या स्थितीत २६.२२ दलघमी जलसाठा असून गतवर्षी हा साठा ३९.१७ एवढा होता. पोथरा प्रकल्पात सध्या २.६८ दलघमी एवढा साठा असून गतवर्षी तो ३.२२ दलघमी एवढा होता. डोंगरगाव प्रकल्पात सध्या ०.९१ दलघमी साठा आहे. गतवर्षी येथे १.०२ दलघमी जलसाठा उपलब्ध होता. मदन प्रकल्पात सध्या २.५६ दलघमी एवढा साठा असून गतवर्षी तो २.७० दलघमी एवढा होता. लाल नाला प्रकल्पात यंदा १.४८ दलघमी जलसाठा असून गतवर्षी हा जलसाठा ४.६६ दलघमी एवढा होता. नांद प्रकल्पात सध्या ४.६६ दलघमी साठा उपलब्ध असून मागील वर्षी येथे ९.८३ दलघमी जलसाठा होता. निम्न वर्धा प्रकल्पात सध्या ३३.३ दलघमी जलसाठा उपलब्ध असून गतवर्षी हा साठा ५१.९० दलघमी एवढा होता. सुकळी लघु प्रकल्पात ५.३७ दलघमी जलसाठा असून गतवर्षी तो ५.६४ दलघमी एवढा होता.एकीकडे ही स्थिती असताना पंचधारा, मदन उन्नई, वडगाव, अप्पर वर्धा, वर्धा कार नदी, बेंबळा आदी प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत जलसाठा थोडा जास्त आहे. तरी बोर प्रकल्प सोडून कुठल्याही धरणात सिंचनापुरता पाणीसाठा नसल्याचे सिंचन विभाग सांगत आहे. तसेच धाम प्रकल्पात पाणी असले तरी ते पिण्यासाठी राखीव असल्याचेही सांगितले आहे.