शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

धरण भरले; अर्धवट पाटचºयांअभावी पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:37 IST

यंदाच्या पावसाळ्यात तुलनेत पाऊस कमी आला. पण आलेल्या पावसामुळे काही धरणे ओसंडून वाहली. यात मदन उन्नईचा सहभाग आहे.

ठळक मुद्देपाण्याचा अपव्यय होण्याची शक्यता : अर्धवट असलेले काम पूर्ण करण्याची मागणी

अरविंद काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : यंदाच्या पावसाळ्यात तुलनेत पाऊस कमी आला. पण आलेल्या पावसामुळे काही धरणे ओसंडून वाहली. यात मदन उन्नईचा सहभाग आहे. हे धरण १०० टक्के भरल्याने रबी हंगामात शेत पिकांना पाणी देता येईल, अशी आशा या भागातील शेतकºयांमध्ये पल्लवीत झाली आहे. परंतु शेतकºयांच्या शेतापर्यंत असलेल्या पाटचºया दुरवस्थेत असल्याने धरणातील पाण्याचा उपयोग कमी आणि अपव्यय अधिक अशी अवस्था होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे पाटबंधारे विभागाने वेळीच लक्ष देत कार्यवाही करण्याची मागणी या भागातील शेतकºयांची आहे.रबी पिकाला सिंचनासाठी पाणी मिळेल व शेती हिरवीगार होईल असे हिरवे स्वप्न शेतकरी रंगवत असले तरी या भागातील एक कंपनी पाण्याचा अमर्याद वापर करीत असल्याने शेतीला पुरेसे पाणी मिळेल की नाही अशी सध्या परिसरात ठिकठिकाणी चर्चा होताना दिसते. सेलू तालुक्यातील मदन उन्नई धरणाचे सिंचनाचे कार्यक्षेत्र १५०० हेक्टर आहे; पण प्रत्यक्षात ५०० हेक्टर शेतीलाच सिंचनासाठी पाणी मिळते. उरलेली शेती अजुनही सिंचनाखाली आलेली नाही. १३ कि़मी. लांबीच्या उजव्या व डाव्या कालव्याला जागो जागी भगदाड पडले आहेत. त्यामुळे पाणी रस्त्याने पळते.धरण निर्मितीपासून कालव्याच्या देखभाल दुरूस्तीचे काम झालेले नाही. त्यामुळे डावा व उजवा हे दोन्ही कालवे शेवटपर्यंत पाणी पोहोचविण्यात असमर्थ ठरत आहे. कालवा समतल नाही. चढ उतार असल्याने पाणी पुढे सरकत नाही. त्यातच मोठा प्रमाणावर लिकेज असल्याने साधे सुरगावपर्यंत पाणी पोहचत नाही. शेतकºयांची समस्या लक्षात घेता तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.धरणाच्या पाटचºयांची स्वच्छता करण्यात आली नसल्याने ठिकठिकाणी पाणी अडून त्याचा अपव्यय होत आहे. यामुळे असलेल्या पाण्याचा लाभ या शेतकºयांना मिळेल अथवा नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पाणी सोडण्यापूर्वी पाटचºयांची स्वच्छता करून पाण्याचा लाभ शेतकºयांना होईल याची व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे.पाटचºयांची दुरूस्ती गरजेचीमदन उन्नई धरणाचा डावा व उजवा कालवा १३ कि़ मी. लांबीचा आहे. १५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणे हे क्रमप्राप्त असताना सध्या ५०० हेक्टरलाच पाणी मिळत आहे.सदर धरणाच्या निर्मितीपासून दोन्ही कालव्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे जागो जागी लिकेज आहेत. परिणामी, सोडण्यात आलेले पाणी इतर ठिकाणी वाहून जाते. याचा कालव्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या शेतकºयांना ऐन हंगामात फटका सहन करावा लागतो.कालवे समतल असायला हवे; पण कुठे चढ तर कुठे उतार असल्याने पाणी नियोजित वेळेत नियोजित ठिकाणी पोहोचत नाही. त्यामुळे सिंचनाासाठी धरणाचे पाणी मिळेल अशी आशा असणाºया शेतकºयांची आशा केवळ आशाच राहते. वेळीच शेतपिकांना पाणी देणे येत नाही. नादुरूस्त पाटचºया दुरूस्तीची मागणी आहे.या भागातील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे तसेच परिसरातील पाणी समस्या निकाली निधावी या हेतूने मदन उन्नई धरणाची निर्मिती करण्यात आली. परंतु, या धरणाच्या अर्धवट असलेल्या पाटचºया नेहमीच या भागातील शेतकºयांच्या अडचणी वाढवतात. बहुता शेतात पाणी घुसत असल्याने उभ्या पिकांची नासडी होते. शेतकºयांची समस्या लक्षात घेता नादुरूस्त आणि अर्धवट पाटचºयाची कामे त्वरित पूर्ण करणे गरजेचे आहे.