शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
2
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
3
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
4
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
5
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
6
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
8
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
9
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
10
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
11
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
12
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
13
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
14
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
15
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
16
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
17
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
18
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
19
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
20
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती

दगदग संपली, सुविधांचा मात्र अभावच

By admin | Updated: August 15, 2016 00:56 IST

येथील भारतीय स्टेट बँक शाखेत नवीन टोकन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना खिडकीसमोर तासनतास रांगेत ....

टोकण प्रणाली सुरू : रांगा लागत नसल्या तरी जागा अपुरी असल्याने अडचण कारंजा (घा.) : येथील भारतीय स्टेट बँक शाखेत नवीन टोकन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना खिडकीसमोर तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज उरली नाही. मात्र बसण्यासाठीच पुरेशी जागा नसल्याने नागरिकांना अडचण सहन करावी लागते. अनेकांना तर उभे राहूनच टोकन स्क्रिनकडे टक बघत राहावे लागते. बँकिंग क्षेत्र ग्राहकांसाठी अधिकाधिक कसे सोपे व्हावे, रोखीचे व्यावहार करणे सहज शक्य व्हावे याकरिता दररोज नवनवीन तंत्रज्ञान उपयोगात येत आहे. या सुविधा योग्य रितीने ग्राहकांना पुरविताना मात्र बँक प्रशासन कमी पडत असल्याचे कारंजा येथे पाहावयास मिळते. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने येथे सुविधा दिल्या जात असल्या तरी रोखपालांच्या आडमुठेपणाचा सामना ग्राहकांना करावा लागत आहे. सुरू असलेली मशीन खराब असल्याची बतावणी करून नागरिकांना नाहक त्रास दिल्या जात असल्याचा अनुभव ग्राहक नेहमीच घेतात. बँकेत नुकतेच टोकन मशीन लावण्यात आले. याद्वारे स्क्रिनवर टोकन क्रमांक दिसतो. त्यांनतरच ग्राहकाला रोकड जमा अथवा काढण्याकरिता खिडकीवर जावे लागते. परंतु रोखपाल जोपर्यंत या मशीनला नेस्क्ट कमांड देत नाही तोपर्यंत पुढील टोकन नंबर दिसत नाही. त्यामुळे रोखपालाकडुन बोळवण केली जात असल्याचे ग्राहकच सांगत आहेत. या प्रणालीद्वारे रांग लावावी लागणार नाही हा बकेचा एकमेव उद्देश असला तरी शेवटी मशीन आॅपरेट करण्यासाठी बसविलेले कर्मचारी काम व्यवस्थित करीत नसल्याने रांगच बरी होती आता तर त्याही पेक्षा जास्त वेळ थांबावे लागत असल्याचे ग्राहक सांगत आहेत. टोकन मशीन मध्ये क्रमवारीत सुरू असलेला एक टोकन क्रमांक लिहीलेला कागद प्रिंट होतो व त्यावर एक नंबर असतो. समोरील दिलेल्या स्क्रिनवर तो नंबर सतत झळकत असतो. दोन ते तीन प्रकारच्या सिरीज मध्ये टोकन नंबर मिळतो. ज्या नंबरची ओरड झाली त्याने खिडकीवर जावून व्यवहार करावयाचे असतात. त्याच प्रकारे रांगेतपासून मुक्तता व्हावी म्हणून बँकेमध्ये ग्रीन चॅनल काऊंटर सुरू करण्यात आले. यात विशिष्ट मर्यादेपर्यंत एटीएम द्वारेच व्यवहार करण्याची सुविधा आहे. परंतु सदर मशीन महिनाभरापासुन बंद असल्याचे सांगण्यात येते. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतच आहे. कारंजा शहरात दोन एटीएम मशीन आहेत. याम्ध्ये एक मशीन बँक आॅफ इंडियाचे तर दुसरे स्टेट बँकेचे आहे. परंतु दोन्ही मशिन वारंवार बंद असतात. त्यामुळे पसे कसे काढावे हा प्रश्न ग्राहकांना पडतो. या सर्व प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष घालून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी केली जात आहे.(शहर प्रतिनिधी) ग्रीन चॅनल प्रणालीही कुचकामी रांगेतपासून मुक्तता व्हावी म्हणून बँकेमध्ये ग्रीन चॅनल काऊंटर सुरू करण्यात आले. यात विशिष्ट मर्यादेपर्यंत एटीएम द्वारेच व्यवहार करण्याची सुविधा आहे. परंतु सदर मशीन महिनाभरापासुन बंद असल्याचे सांगण्यात येते. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतच आहे. तसेच शहरातील दोन्ही एटीएम वारंवार बंद असतात. त्यामुळे व्यवहार कसे करावे असा प्रश्न ग्राहकांना पडतो. त्यामुळे व्यवहार प्रभावित होत आहे.