शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
12
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
14
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
15
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
16
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
17
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
18
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
19
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
20
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा

आॅनलाईन फसवणुकीच्या तक्रारीकडे ग्राहकांची पाठ

By admin | Updated: March 15, 2016 03:59 IST

आॅनलाईन पद्धतीने शॉपिंग करण्याचा सर्वत्र गाजावाजा होत आहे. यात अनेकांची फसवणूक झाल्याचे अनेकवेळा समोर आले

श्रेया केने ल्ल वर्धाआॅनलाईन पद्धतीने शॉपिंग करण्याचा सर्वत्र गाजावाजा होत आहे. यात अनेकांची फसवणूक झाल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. असे तरी या खरेदी दरम्यान झालेल्या फसवणुकीची तक्रार मात्र एकाही ग्राहकाकडून नोंदविण्यात आलेली नाही. यातून ग्राहकांमध्ये याविषयी असलेल्या जागृतीचा अभाव दिसून येतो. ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करणे, त्यांना न्याय देणे व ग्राहकांना त्यांच्या हक्काविषयी जागरुक करणे हे ग्राहक तक्रार निवारण मंचचे प्रमुख उद्दीष्ट असते. याविषयी जागृती करण्यात येत असली तरी ती तितकीशी प्रभावी ठरत नसल्याचे दिसनू येते. वर्धा येथील ग्राहक तक्रार निवारण मंचकडे यासंदर्भात अद्याप तक्रार प्राप्त झालेली नाही. सध्या आॅनलाईन पद्धतीने खरेदी करण्याचा ‘ट्रेण्ड’ वाढतीवर आहे. हे लोन निमशहरी भागापर्यंत पोहचले आहे. विशेषकरुन मोबाईल खरेदी ही आॅनलाईन केली जाते. शिवाय आॅनलाईन शॉपिंग साईटसकडून ग्राहकांवर विविध आॅफर्स मधून खरेदी करीता प्रलोभने दिली जातात. यात अनेकदा ग्राहकांच्या माथी बनावट वस्तू अथवा तकलादू वस्तू दिल्या जातात. याची तक्रार कुणाकडे करावी हाच प्रश्न ग्राहकांना पडतो. आॅनलाईन खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी वारंवार माहिती दिली जात असली तरी यामुळे झालेल्या फसवणुकीच्या तक्रारीविषयी जागृती करणे गरजेचे झाले आहे. ३ हजार ५३८ तक्रारींचा निपटारा ४मंच स्थापनेपासून जिल्ह्यात आजवर ३,७०३ तक्रारी नोंदविण्यात आल्या. यापैकी ३,५३८ तक्रारींचा आजवर निपटारा झाला. यात १६५ तक्रारी निकालाच्या प्रतीक्षेत आहे. यापैकी काही तक्रारी विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत. तीन सदस्यीय मंचाकडून यातक्रारींचा निपटारा करण्यात येतो. जिल्ह्यातील या समितीचे अध्यक्ष पी.एस. जाधव हे आहेत. तर सदस्यपदी मिलिंद केदार व स्मिता चांदेकर आहेत.ई-फोरम पोर्टल प्रस्तावित४शासन स्तरावर ई- फोरम असे पोर्टल तयार करण्यात येणार असून या माध्यमातून ग्राहकांच्या तक्रारी आॅनलाईन पद्धतीने नोंदविणे तसेच तक्रारीच निपटरा होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रियेची नोंद केली जाणार आहे. एका क्लिकवर तक्रारकर्त्यास संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडें असून काही महिन्यात हे पोर्टल सुरू होईल. यानंतर तक्रारकर्त्यास प्रत्यक्ष येवून तक्रार नोंदविण्याची गरज भासणार नाही. यातून तक्रारकर्त्यांना मंचकडे तक्रार नोंदविणे अधिक सहज होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी हे पोर्टल सुरु करणार असल्याची माहिती वर्धा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे सहायक अधीक्षक राजेश मुक्तेश्वर यांनी दिली. ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्राधान्यक्रम४ज्येष्ठ नागरिक व विधवा महिला यांच्याकरिता ग्राहक तक्रार निवारण मंचने विशेष तरतूद केली असून या तक्रारी प्राधान्यक्रमाने सोडविल्या जातात. मंचकडे दाखल तक्रारींचा निपटारा करण्याची १० दिवसांची कालावधी असतो. या कालावधीत तक्रारी निकाली काढणे अगत्याचे असते. असे निर्देश आहे. यातही विधवा महिलेने अथवा ज्येष्ठ नागरिकांनी तक्रारीकरिता अर्ज केल्यास या तक्रारींना प्राधान्यक्रम देत सोडविण्याची तरतूद केली आहे. जिल्ह्यात या अंतर्गत १७० तक्रारी दाखल असून १३८ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. ५२ तक्रारी प्रक्रियेत आहेत.