शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहनचालकांना लगाम लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:11 IST

शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यावर बेताल वाहतुकीचे दर्शन घडते. वर्दळीच्या रस्त्यावर दुचाकी भरधाव दामटविणाऱ्या तरूणांना लगाम लावण्याची गरज......

ठळक मुद्देनागरिकांची मागणी: बसस्टँड ते शिवाजी चौक रस्ता झाला धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यावर बेताल वाहतुकीचे दर्शन घडते. वर्दळीच्या रस्त्यावर दुचाकी भरधाव दामटविणाऱ्या तरूणांना लगाम लावण्याची गरज नागरिकातून व्यक्त होत आहे. शहरातील रस्त्यावर अपघाताच्या संख्येत वाढ झाली असून पादचाºयांनाही रस्त्याने जाताना सुरक्षेची हमी राहिली नाही.रस्त्यावर दिवसेंदिवस वाहनांची गर्दी वाढत आहे. या वाहतुकीसाठी रस्ते अपुरे पडत आहे. वाहतुकीची कोंडी ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शहरात रस्ता बांधकाम सुरू असल्याने वाहतूक प्रभावीत होते. यात काही रस्त्यावर बेताल वाहतूक असल्याने येथून आवागमन करणे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. अल्पवयीन चालकांची वाढती संख्या पाहता पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचे दिसते. अरूंद रस्ते, पार्किंगचा अभाव, वाहनांची वाढती संख्या, वाहनांची वाढलेली गती आणि वाहतूक पोलिसांची कमतरता आदी कारणाने शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.भरधाव वाहनांमुळे पादचाºयांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडणे कठीण होते. पोलिसांकडून कारवाई होत असली तरी येथील वाहतुकीची स्थिती जैसे थे होते. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. रस्त्याने वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, दुचाकी वाहनावर ट्रिपल सीट जाणे अशा वाहतुकीच्या नियमांचे येथे उल्लंघन होत असताना पोलीस दुर्लक्ष करताना दिसतात. येथील प्रमुख चौकात अतिक्रमण आहे. ही बाब वाहतुकीची कोंडी करणारी ठरत आहे. तसेच फेरीवाल्यामुळेही वाहन चालविण्यासाठी जागा नसते. अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही झाली तरी त्यावर पुन्हा अतिक्रमण झालेले दिसते. वर्दळीच्या रस्त्यातून दुचाकी भरधाव घेऊन जाणे ही तर फॅशनच झाली आहे. यातून मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकाराला वेळीच आवर घालणे गरजेचे झाले आहे. वर्दळीच्या रस्त्यावरून जडवाहनासह प्रवासी वाहतूक होत असते. अरूंद रस्त्यावरून दुचाकी भरधाव घेऊन जाणाºया चालकांमुळे अपघात झाले आहे. या मार्गावरील दुकानदार जडवाहन रस्त्यावर उभी करून मालाची लोडिंग करतात. यामुळे वाहतूक खोळंबते. पोलीस प्रशासनाने यावर त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी आहे.वाहतूक पोलिसांचे दुर्लक्षबस स्टँड ते शिवाजी चौक, गांधी चौक ते पद्मावती चौक या मुख्य चौकात सध्या वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. बसस्थानक ते शिवाजी चौकापर्यंत वाहनतळाची व्यवस्था नसल्याने वाहने व्यापारी प्रतिष्ठानासमोरच ठेवतात. यामुळे आवागमन करायला निमुळता रस्ता असतो. अनेकदा या मार्गावर वाहतूक विस्कळीत होते. शिवाजी ते पद्मावतीकडे चौकापर्यंतची वाहतूक सुरळीत करण्याची मागणी आहे.