शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

मशागत संपली; पावसाची वाट

By admin | Updated: June 9, 2014 23:47 IST

शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतातील मशागत आटोपली असून त्याला आता पावसाच्या सरींची प्रतीक्षा लागली आहे. मृग नक्षत्र प्रारंभ झाले असून येत्या दिवसात केव्हाही पाऊस येण्याची शक्यता बळावली आहे.

वर्धा  : शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतातील मशागत आटोपली असून त्याला आता पावसाच्या सरींची प्रतीक्षा लागली आहे. मृग नक्षत्र प्रारंभ झाले असून येत्या दिवसात केव्हाही पाऊस येण्याची शक्यता बळावली आहे. मान्सून केरळात दाखल झाला आहे. तो महाराष्ट्राच्या वाटेवर आहे. शेतकर्‍यांनी पेरणीकरिता आवश्यक सर्व साहित्याची जुळवाजुळव करणे सुरू केले असून त्यांना आर्थिकतेचा फटका बसत आहे. पारा ४७ अंशावर पोहोचल्याने केवळ बळीराजा नाही तर सर्वानाच मृगाच्या सरींची प्रतीक्षा लागली आहे. गत इखरीप हंगामासोबतच रब्बी                                हंगामही शेतकर्‍यांचा हातचा गेला. या दोन्ही हंगामात निसर्गाने दगा दिल्याने उत्पन्न  झाले नाही. हाता, तोंडाशी आलेला घास  हिरावल्या गेला, तरी निराश न होता सन २0१४-१५ या खरीप हंगामाची  तयारी  जिल्ह्यातील  शेतकर्‍यांनी केली आहे. बँकेच्या कर्जाची थकबाकी असतानाही पैशाची जुळवाजुळव करून बळीराजा  बाजारपेठेत बी- बियाण्यांच्या खरेदीसाठी  पोहोचला. गत वर्षीच्या  तुलनेत या  वर्षी सोयाबीन बियाण्यांच्या किमती दुप्पट झाल्या. मागील वर्षी सोयाबीनची  ३0 किलोची बॅग  १४00 रुपयात  होती. चांगल्या  प्रतिची बॅग १८0५ रुपयांत  मिळत होती. या वर्षी तीच  चांगल्या  प्रतीची बॅग  २६00 रुपयांची झाली तर  सर्वसाधारण कंपनीचे  बियाणे  २१00 रुपयांवर  पोहोचले.सोयाबीनच्या बियाण्यात ७00 ते एक हजार रुपयांची दरवाढ झाली आहे. परिणामी शेतकर्‍यांनी घरगुती सोयाबीन बियाण्याचा वापर करण्याची मानसिक तयारी सुरू केली आहे. कपाशीचे बियाणे मागील  वर्षीच्याच भावात याहीवर्षी  बाजारपेठेत उपलब्ध  आहे. ४५0 ग्रॅम वजनाची  पिशवी ८00 ते ९३0 रुपये या दरात  मिळत आहे. बियाण्यांमध्ये न झालेली वाढ हेच शेतकर्‍याला तात्पुरते समाधान  देते. तुरीच्या बियाण्यात मागील वर्षीच्या  तुलनेत वाढ झाली तशीच  वाढ मूग, उडीद व तीळ बियाण्यातही झालेली आहे. या बियाण्यांची बाजारपेठेतून  खरेदी करण्याऐवजी घरी असलेल्याच बियाण्यांचा वापर शेतकरी करण्याची शक्यता जास्त प्रमाणात जाणवत असल्याचे कृषी साहित्य विक्रेत्यांकडून सांगण्यात येते. अशात कृषी विभागानेही शेतकर्‍यांना घरचे बियाणे वापरण्याचा सल्ला दिला आहे. मात्र ही बियाणे वापरताना त्याची चाचणी करण्याच्या सूचना देखील विभागाने केल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)