शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

मशागत संपली; पावसाची वाट

By admin | Updated: June 9, 2014 23:47 IST

शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतातील मशागत आटोपली असून त्याला आता पावसाच्या सरींची प्रतीक्षा लागली आहे. मृग नक्षत्र प्रारंभ झाले असून येत्या दिवसात केव्हाही पाऊस येण्याची शक्यता बळावली आहे.

वर्धा  : शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतातील मशागत आटोपली असून त्याला आता पावसाच्या सरींची प्रतीक्षा लागली आहे. मृग नक्षत्र प्रारंभ झाले असून येत्या दिवसात केव्हाही पाऊस येण्याची शक्यता बळावली आहे. मान्सून केरळात दाखल झाला आहे. तो महाराष्ट्राच्या वाटेवर आहे. शेतकर्‍यांनी पेरणीकरिता आवश्यक सर्व साहित्याची जुळवाजुळव करणे सुरू केले असून त्यांना आर्थिकतेचा फटका बसत आहे. पारा ४७ अंशावर पोहोचल्याने केवळ बळीराजा नाही तर सर्वानाच मृगाच्या सरींची प्रतीक्षा लागली आहे. गत इखरीप हंगामासोबतच रब्बी                                हंगामही शेतकर्‍यांचा हातचा गेला. या दोन्ही हंगामात निसर्गाने दगा दिल्याने उत्पन्न  झाले नाही. हाता, तोंडाशी आलेला घास  हिरावल्या गेला, तरी निराश न होता सन २0१४-१५ या खरीप हंगामाची  तयारी  जिल्ह्यातील  शेतकर्‍यांनी केली आहे. बँकेच्या कर्जाची थकबाकी असतानाही पैशाची जुळवाजुळव करून बळीराजा  बाजारपेठेत बी- बियाण्यांच्या खरेदीसाठी  पोहोचला. गत वर्षीच्या  तुलनेत या  वर्षी सोयाबीन बियाण्यांच्या किमती दुप्पट झाल्या. मागील वर्षी सोयाबीनची  ३0 किलोची बॅग  १४00 रुपयात  होती. चांगल्या  प्रतिची बॅग १८0५ रुपयांत  मिळत होती. या वर्षी तीच  चांगल्या  प्रतीची बॅग  २६00 रुपयांची झाली तर  सर्वसाधारण कंपनीचे  बियाणे  २१00 रुपयांवर  पोहोचले.सोयाबीनच्या बियाण्यात ७00 ते एक हजार रुपयांची दरवाढ झाली आहे. परिणामी शेतकर्‍यांनी घरगुती सोयाबीन बियाण्याचा वापर करण्याची मानसिक तयारी सुरू केली आहे. कपाशीचे बियाणे मागील  वर्षीच्याच भावात याहीवर्षी  बाजारपेठेत उपलब्ध  आहे. ४५0 ग्रॅम वजनाची  पिशवी ८00 ते ९३0 रुपये या दरात  मिळत आहे. बियाण्यांमध्ये न झालेली वाढ हेच शेतकर्‍याला तात्पुरते समाधान  देते. तुरीच्या बियाण्यात मागील वर्षीच्या  तुलनेत वाढ झाली तशीच  वाढ मूग, उडीद व तीळ बियाण्यातही झालेली आहे. या बियाण्यांची बाजारपेठेतून  खरेदी करण्याऐवजी घरी असलेल्याच बियाण्यांचा वापर शेतकरी करण्याची शक्यता जास्त प्रमाणात जाणवत असल्याचे कृषी साहित्य विक्रेत्यांकडून सांगण्यात येते. अशात कृषी विभागानेही शेतकर्‍यांना घरचे बियाणे वापरण्याचा सल्ला दिला आहे. मात्र ही बियाणे वापरताना त्याची चाचणी करण्याच्या सूचना देखील विभागाने केल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)