शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

राष्ट्रभाषा प्रचार समितीतील श्रेयवादाने गाठला कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:12 IST

देश-विदेशात हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराचे काम करणाऱ्या स्थानिक राष्ट्रभाषा प्रचार समितीतील श्रेयवादाने सध्या कळस गाठल्याचे दिसून येत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार नवीन पदाधिकाºयांची निवड झाली.

ठळक मुद्देतिघांना अटक : कार्यालयाचे कुलूप तोडले, गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देश-विदेशात हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराचे काम करणाऱ्या स्थानिक राष्ट्रभाषा प्रचार समितीतील श्रेयवादाने सध्या कळस गाठल्याचे दिसून येत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार नवीन पदाधिकाºयांची निवड झाली. परंतु, काही जुन्या पदाधिकाऱ्यांनी गैरकायद्याची मंडळी गोळा करून थेट राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या आवारात येत तेथील दोन कार्यालयाचे कुलूप तोडून परिसरात दहशत निर्माण करण्याचे काम केले. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे.राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या नवीन कार्यकारणीचा वाद धर्मदाय आयुक्त कार्यालयासह सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता. त्यावर न्यायालयाकडून सूचना प्राप्त होताच आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया आठवड्यात अविरोध निवडून आलेले नवीन पदाधिकारी वगळता उर्वरित पदाधिकाºयांसाठी मतदान घेण्यात आले होते. त्यावेळी शांततेत पार पडलेल्या निवडणुकीनंतर श्रेयासह खुर्चीचा वाद संपूष्टात आल्याचे बोलले जात होते. परंतु, निवडणूक होऊन केवळ एक महिन्याचाच कालावधी लोटता पुन्हा श्रेयवाद शनिवारी सायंकाळी उफाळून आला. जुन्या पदाधिकाऱ्यांसह सुमारे २५ ते ३० जणांनी शनिवारी सायंकाळी थेट राष्ट्रभाषा प्रचार समितीचे आवार गाठून प्रधानमंत्री कार्यालय व आनंदकुटी अध्यक्ष निवासाचे कुलूप तोडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शिविगाळ करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.सदर प्रकरणी अनंतराम सुरजप्रसाद त्रिपाठी (८५) यांच्या तक्रारीवरून सुर्यवंशी, चौधरी, जईता सेन बराट, नरेश शिखरे, गणेश धमाणे, ढोणे व इतर २० जणांविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ४५४ व १३५ बी.पी. अ‍ॅक्ट. नुसार गुन्हा दाखल करून संजय गुजर रा. सावंगी (मेघे), नरेश शिखरे व गणेशसिंग धमाणे दोन्ही रा. राष्ट्रभाषा प्रचार समिती यांना अटक केली आहे.परिसरात दहशतसुमारे २५ ते ३० जणांनी संगणमत करून एम. एच. ३२ ई. के. ५०१७ क्रमांकाच्या दुचाकीसह इतर वाहनांनी राष्ट्रभाषा प्रचार समिती गाठून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शिविगाळ करण्यात सुरूवात केली. इतकेच नव्हे तर त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही खरेखोटी सुनावल्याने परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली होती.