शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

‘सामाजिक न्याय’मध्ये ‘कास्ट व्हॅलिडिटी’साठी उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 05:00 IST

शाळा महाविद्यालयाचे लागलेले निकाल आणि ग्रामपंचायतीचा निवडणुकींचे घमासान सुरु झाले आहे. अनेक दिवसांपासून शाळा व महाविद्यालये बंद होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होताच विद्यार्थ्यांनी जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धडपडत आहे. यातच आता जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकींचा बिगुल वाजल्याने इच्छूकांनी ‘कास्ट व्हॅलिडिटी’ मिळविण्याकरिता सामाजिक न्याय विभागात गर्दी केली आहे.

ठळक मुद्देना मास्क, ना अंतर ; दोन अतिरिक्त केंद्रांची सुविधा, केवळ सहा कर्मचारी कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कुणाला शिक्षणासाठी तर कुणाला ग्रामपंचायतींच्या निवडणुकींसाठी जातवैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने साऱ्यांनीच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जातवैधता प्रमाणपत्र कार्यालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या कार्यालयात एकच गर्दी उसळली असून कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सूचनानंतरही विद्यार्थी व उमेदवार कोरोनाच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे.शाळा महाविद्यालयाचे लागलेले निकाल आणि ग्रामपंचायतीचा निवडणुकींचे घमासान सुरु झाले आहे. अनेक दिवसांपासून शाळा व महाविद्यालये बंद होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होताच विद्यार्थ्यांनी जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धडपडत आहे. यातच आता जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकींचा बिगुल वाजल्याने इच्छूकांनी ‘कास्ट व्हॅलिडिटी’ मिळविण्याकरिता सामाजिक न्याय विभागात गर्दी केली आहे. या गर्दीचा अंदाज घेऊन संबंधित विभागाने एक ऐवजी आता तीन केंद्र सुरु केले आहे. वारंवार सूचना दिल्यानंतरही विद्यार्थी व उमेदवार येथे गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सहकार्याची गरज व्यक्त होत आहे.

 ८३ विद्यार्थ्यांचे अर्ज अकरावी उत्तीर्ण होऊन बारावी विज्ञान शाखेत प्रवेश करणारे विद्यार्थी शिक्षणाकरिता जातवैधता प्रमाणपत्राकरिता अर्ज करीत आहे. सोमवारी एकूण ८३ अर्ज या कार्यालयाला प्राप्त झाले होते. या कार्यालयातून सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सध्या विद्यार्थी कमी आहे.

१२२ उमेदवाराचे अर्ज आठही तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीच्या निवडणुका असून सर्वाधिक ग्रामपंचायती समुद्रपूर तालुक्यातील आहे. सर्व ग्रामपंचायतीचे उमेदवार वर्धातील कार्यालयात येत असल्याने सोमवारी तब्बल १२२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. आता दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत.

प्रशासनातर्फे दक्षतासामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात मुख्यव्दारावरच नोंदणी केली जाते. या ठिकाणी गर्दी होत असल्याने बाहेरच केंद्र सुरु केले आहे. येथे आवश्यक ती व्यवस्था केली नसल्याने विद्यार्थी व उमेदवार गर्दी करीत आहे. वारंवार सूचना दिल्यानंतरही सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे.दररोज येतात शंभरावर अर्जबारावीत प्रवेशित विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने विद्यार्थ्यांचे दररोज जवळपास ५० अर्ज येतात पण, आता निवडणूक असल्याने अर्जाची संख्या शंभरावर गेलेली आहे. त्यामुळे कार्यालयात गर्दी वाढली आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवार आणि विद्यार्थ्यांचीही एकाच वेळी गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी एक ऐवजी आता तीन केंद्र सुरु केले असून तेथे सहा कर्मचारी कार्यरत आहे. उमेदवार व विद्यार्थ्यांना वारंवार सूचना दिल्या जात आहे. त्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे.                                - शरद चव्हाण, उपायुक्त, सामाजिक न्याय विभाग, वर्धा.

 

टॅग्स :Caste Certificateजात वैधता प्रमाणपत्र