शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

‘स्वाधार’करिता गर्दी

By admin | Updated: April 12, 2017 00:19 IST

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतीगृहाचा लाभ अत्यल्प मुलांना मिळत आहे.

२१३ जागांकरिता ४४४ अर्ज वर्धा : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतीगृहाचा लाभ अत्यल्प मुलांना मिळत आहे. या लाभापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शासनाच्यातीने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ जाहीर करीत आधार देण्याचा प्रयत्न केला. या योजनेचे हे पहिले वर्ष असून यात जिल्ह्यातील २१३ लाभार्थ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. असे असताना वर्धेत मात्र या योजनेच्या लाभाकरिता चांगलीच गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे. या योजनेकरिता आतापर्यंत तब्बल ४४४ अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात सध्या व्यवसायिक आणि बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमाची गर्दी वाढत आहे. या अभ्याक्रमाकरिता दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. यात अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना निवासी व्यवस्था करणे अवघड जाते. शिवाय उपलब्ध असलेल्या वसतिगृहातही त्यांना जागा मिळणे कठीण जाते. यामुळे त्यांना बाहेरच निवास आणि भोजनाची सोय पुरविण्याकरिता ही योजना अंमलात आणली आहे. विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाशी लिंक असलेल्या या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यातून मिळणार आहे. यातही योजनेचा लाभ घेण्याकरिता अनेक अटी टाकण्यात आल्या आहेत. उपलब्ध जागांपेक्षा अधिक अर्जस्वाधार योजना : शिक्षण पूर्ण होईपर्यंत लाभवर्धा : या योजनेचा लाभ घेण्याकरिता अकराव्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या ८५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या ८५ जागांकरिता वर्धेत तब्बल ९९ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. बारावीनंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता प्रत्येकी ६४ अशा १२८ जागा ठेवण्यात आल्या आहेत. या जागांकरिता २३६ अर्ज प्राप्त झाले आहेत. या व्यतिरिक्त बारावीनंतरच्या शिक्षणाकरिता तब्बल १०९ अर्ज आॅनलाईन प्राप्त झाल्याची माहिती आहे. यातील किती जणांना या योजनेचा लाभ मिळतो, हे निवड यादीनंतरच कळणार आहे. स्वाधार योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध असणे अनिवार्य आहे. शिवाय तो ज्या शहरात शिक्षण घेत आहे, त्या शहराचा नसावा, तसेच त्याचे वार्षिक उत्पन्न २.५० ला रुपयांच्या वर नसावे, या सोबतच त्याला अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळणे अनिवार्य आहे. यासह अन्य अटींसह मिळणाऱ्या या योजनेचा लाभ विद्यार्थ्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत सुरू राहणार आहे.(शहर प्रतिनिधी)एका विद्यार्थ्याला ४३ हजार रुपये या योजनेचा लाभ घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला ४३ हजार रुपये मिळणार आहे. यात भोजन भत्ता २५ हजार, निवास भत्ता १२ हजार व निर्वाह भत्ता सहा हजार रुपये देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दोन्ही पर्याय अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह आणि स्वाधार योजना हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. यात विद्यार्थ्याला कोणता पर्याय निवडायचा याचा निर्णय त्यालाच घ्यावा लागणार आहे. स्वाधार योजनेचा लाभ सर्वच लाभार्थ्यांना मिळावा याकरिता १४ एप्रिल पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज येत असल्याने त्याचा लाभ अटी व नियम पाळून देण्यात येणार आहे. - बाबासाहेब देशमुख, सहा.आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, वर्धा.