शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

‘स्वाधार’करिता गर्दी

By admin | Updated: April 12, 2017 00:19 IST

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतीगृहाचा लाभ अत्यल्प मुलांना मिळत आहे.

२१३ जागांकरिता ४४४ अर्ज वर्धा : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतीगृहाचा लाभ अत्यल्प मुलांना मिळत आहे. या लाभापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शासनाच्यातीने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ जाहीर करीत आधार देण्याचा प्रयत्न केला. या योजनेचे हे पहिले वर्ष असून यात जिल्ह्यातील २१३ लाभार्थ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. असे असताना वर्धेत मात्र या योजनेच्या लाभाकरिता चांगलीच गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे. या योजनेकरिता आतापर्यंत तब्बल ४४४ अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात सध्या व्यवसायिक आणि बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमाची गर्दी वाढत आहे. या अभ्याक्रमाकरिता दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. यात अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना निवासी व्यवस्था करणे अवघड जाते. शिवाय उपलब्ध असलेल्या वसतिगृहातही त्यांना जागा मिळणे कठीण जाते. यामुळे त्यांना बाहेरच निवास आणि भोजनाची सोय पुरविण्याकरिता ही योजना अंमलात आणली आहे. विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाशी लिंक असलेल्या या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यातून मिळणार आहे. यातही योजनेचा लाभ घेण्याकरिता अनेक अटी टाकण्यात आल्या आहेत. उपलब्ध जागांपेक्षा अधिक अर्जस्वाधार योजना : शिक्षण पूर्ण होईपर्यंत लाभवर्धा : या योजनेचा लाभ घेण्याकरिता अकराव्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या ८५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या ८५ जागांकरिता वर्धेत तब्बल ९९ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. बारावीनंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता प्रत्येकी ६४ अशा १२८ जागा ठेवण्यात आल्या आहेत. या जागांकरिता २३६ अर्ज प्राप्त झाले आहेत. या व्यतिरिक्त बारावीनंतरच्या शिक्षणाकरिता तब्बल १०९ अर्ज आॅनलाईन प्राप्त झाल्याची माहिती आहे. यातील किती जणांना या योजनेचा लाभ मिळतो, हे निवड यादीनंतरच कळणार आहे. स्वाधार योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध असणे अनिवार्य आहे. शिवाय तो ज्या शहरात शिक्षण घेत आहे, त्या शहराचा नसावा, तसेच त्याचे वार्षिक उत्पन्न २.५० ला रुपयांच्या वर नसावे, या सोबतच त्याला अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळणे अनिवार्य आहे. यासह अन्य अटींसह मिळणाऱ्या या योजनेचा लाभ विद्यार्थ्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत सुरू राहणार आहे.(शहर प्रतिनिधी)एका विद्यार्थ्याला ४३ हजार रुपये या योजनेचा लाभ घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला ४३ हजार रुपये मिळणार आहे. यात भोजन भत्ता २५ हजार, निवास भत्ता १२ हजार व निर्वाह भत्ता सहा हजार रुपये देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दोन्ही पर्याय अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह आणि स्वाधार योजना हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. यात विद्यार्थ्याला कोणता पर्याय निवडायचा याचा निर्णय त्यालाच घ्यावा लागणार आहे. स्वाधार योजनेचा लाभ सर्वच लाभार्थ्यांना मिळावा याकरिता १४ एप्रिल पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज येत असल्याने त्याचा लाभ अटी व नियम पाळून देण्यात येणार आहे. - बाबासाहेब देशमुख, सहा.आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, वर्धा.