शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

‘स्वाधार’करिता गर्दी

By admin | Updated: April 12, 2017 00:19 IST

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतीगृहाचा लाभ अत्यल्प मुलांना मिळत आहे.

२१३ जागांकरिता ४४४ अर्ज वर्धा : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतीगृहाचा लाभ अत्यल्प मुलांना मिळत आहे. या लाभापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शासनाच्यातीने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ जाहीर करीत आधार देण्याचा प्रयत्न केला. या योजनेचे हे पहिले वर्ष असून यात जिल्ह्यातील २१३ लाभार्थ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. असे असताना वर्धेत मात्र या योजनेच्या लाभाकरिता चांगलीच गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे. या योजनेकरिता आतापर्यंत तब्बल ४४४ अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात सध्या व्यवसायिक आणि बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमाची गर्दी वाढत आहे. या अभ्याक्रमाकरिता दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. यात अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना निवासी व्यवस्था करणे अवघड जाते. शिवाय उपलब्ध असलेल्या वसतिगृहातही त्यांना जागा मिळणे कठीण जाते. यामुळे त्यांना बाहेरच निवास आणि भोजनाची सोय पुरविण्याकरिता ही योजना अंमलात आणली आहे. विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाशी लिंक असलेल्या या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यातून मिळणार आहे. यातही योजनेचा लाभ घेण्याकरिता अनेक अटी टाकण्यात आल्या आहेत. उपलब्ध जागांपेक्षा अधिक अर्जस्वाधार योजना : शिक्षण पूर्ण होईपर्यंत लाभवर्धा : या योजनेचा लाभ घेण्याकरिता अकराव्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या ८५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या ८५ जागांकरिता वर्धेत तब्बल ९९ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. बारावीनंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता प्रत्येकी ६४ अशा १२८ जागा ठेवण्यात आल्या आहेत. या जागांकरिता २३६ अर्ज प्राप्त झाले आहेत. या व्यतिरिक्त बारावीनंतरच्या शिक्षणाकरिता तब्बल १०९ अर्ज आॅनलाईन प्राप्त झाल्याची माहिती आहे. यातील किती जणांना या योजनेचा लाभ मिळतो, हे निवड यादीनंतरच कळणार आहे. स्वाधार योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध असणे अनिवार्य आहे. शिवाय तो ज्या शहरात शिक्षण घेत आहे, त्या शहराचा नसावा, तसेच त्याचे वार्षिक उत्पन्न २.५० ला रुपयांच्या वर नसावे, या सोबतच त्याला अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळणे अनिवार्य आहे. यासह अन्य अटींसह मिळणाऱ्या या योजनेचा लाभ विद्यार्थ्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत सुरू राहणार आहे.(शहर प्रतिनिधी)एका विद्यार्थ्याला ४३ हजार रुपये या योजनेचा लाभ घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला ४३ हजार रुपये मिळणार आहे. यात भोजन भत्ता २५ हजार, निवास भत्ता १२ हजार व निर्वाह भत्ता सहा हजार रुपये देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दोन्ही पर्याय अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह आणि स्वाधार योजना हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. यात विद्यार्थ्याला कोणता पर्याय निवडायचा याचा निर्णय त्यालाच घ्यावा लागणार आहे. स्वाधार योजनेचा लाभ सर्वच लाभार्थ्यांना मिळावा याकरिता १४ एप्रिल पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज येत असल्याने त्याचा लाभ अटी व नियम पाळून देण्यात येणार आहे. - बाबासाहेब देशमुख, सहा.आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, वर्धा.