शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

२४,८०० ग्राहकांची एकाच केंद्रावर गर्दी

By admin | Updated: March 15, 2015 01:54 IST

तालुक्यात असलेल्या ग्राहक संख्येच्या तुलनेत वीज बिल भरण्याकरिता केवळ एकच केंद्र असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

अरुण फाळके कारंजा (घाडगे)तालुक्यात असलेल्या ग्राहक संख्येच्या तुलनेत वीज बिल भरण्याकरिता केवळ एकच केंद्र असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वीज बिल भरण्याकरिता आलेल्या नागरिकांना यात दिवस वाया घालावा लागतो. शहरात आणखी चार केंद्र उभारण्याची मागणी स्थानिक विभागाच्यावतीने वरिष्ठ कार्यालयाकडे केली असली तरी त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे.१०१ गावातील एक लाख २० हजार लोकसंख्या असलेल्या या तालुक्यात विद्युत ग्राहकांची संख्या २४ हजार ८०० आहे. या संपूर्ण विद्युत ग्राहकांना बील भरण्यासाठी तालुका स्थळी कारंजाला यावे लागते. हे एकमेव विद्युत संकलन केंद्र असल्यामुळे सर्वांना येथे येवून वीज बिल भरावे लागते. यात ग्राहकांचा संपूर्ण दिवस वाया जातो. ज्येष्ठ नागरिकांनाही तासनतास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. अनेक ग्राहकांना चक्कर येवून खाली पडल्याच्या घटनाही येथे घडल्या आहेत. तालुक्यातील ग्राहकांनी आणखी किमान चार संकलन केंद्र मिळावे, यासाठी वीजवितरण कंपनीकडे मागणी केली. मात्र या मागणीकडे कंपनी दुर्लक्ष करीत असून ग्राहकांची फटफजिती होत आहे.कारंजा तालुक्यात ७ हजार ५०० कृषी पंप ग्राहक, १६ हजार ६५० घरगुती व वाणिज्य ग्राहक, ३३० औद्योगिक व वॉटर सप्लाय असे एकूण २४ हजार ८०० ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांकडून कोट्यवधी रुपये वितरण कंपनी विद्युत बिलापोटी वसुली करते. दोन वर्षांपूर्वी ठाणेगाव, कन्नमवारग्राम, सारवाडी येथील सहकारी बँकात वीज देयक भरण्याची सुविधा होती. कारंजा वीजवितरण कंपनीच्या कार्यालयातही वीजबिले स्वीकारली जायची. आता हे सर्व केंद्र बंद झाल्यामुळे नागरिकांना ४० कि़मी. लांबून ग्राहकांना बिल भरण्याकरिता कारंजाला येथे यावे लागत आहे. पूर्ण दिवस, श्रम व येण्याजाण्याचा पैसा वाया जातो. ज्येष्ठ नागरिकांनाही रांगेत उभे राहावे लागते. पाऊस, ऊन्ह, थंडीचा मारा सहन करावा लागतो.