शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

पीक विमा योजना कंपनीच्या नव्हे, शेतकरी हिताची हवी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:00 IST

नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी करिता विमा योजना राबविली जाते. कंपन्यांचे हित जोपासत शेतकºयांचे अहित साधणारी पीकविमा पद्धती नेहमीच वादात राहिली आहे. पिकविम्याच्या माध्यमातून औद्योगिक समूहांच्या खात्यात खरीपासाठी शेतकऱ्यांच्या सहभागाची दोन टक्के व शासनाच्या सहभागाची ९८ टक्के रक्कम थेट वळती करून त्यांना लाभान्वित करणारी ही योजना आहे.

ठळक मुद्देसुचविल्या नव्या सुधारणा। दोन वर्षांत कंपन्यांच्या घशात गेले ४९ हजार कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सरकारी यंत्रणांनी राज्यातील एक कोटी सहा लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांचा पीक विमा उतरविण्यासाठी २०१६ मध्ये शेतकऱ्यांच्या नावाने १९,४२५ कोटी रूपये विमा कंपन्यांना दिले. तर २०१८ मध्ये जवळपास ३०, ००० कोटी देण्यात आले आहेत. या पीक विमा योजनेत कंपन्या मालामाल झाल्या असून शेतकऱ्यांच्या पदरात मात्र तुटपुंजी मदत पडली आहे. त्यामुळे या योजनेत एकच मिशन शेतकरी आरक्षणाने काही सुधारणा विद्यमान राज्य सरकारकडे सुचविल्या आहेत. ज्यामुळे नुकसानग्रस्त जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळणे सुलभ होईल असा दावा मिशनचे संस्थापक शैलेश अग्रवाल यांनी केला आहे.नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी करिता विमा योजना राबविली जाते. कंपन्यांचे हित जोपासत शेतकºयांचे अहित साधणारी पीकविमा पद्धती नेहमीच वादात राहिली आहे. पिकविम्याच्या माध्यमातून औद्योगिक समूहांच्या खात्यात खरीपासाठी शेतकऱ्यांच्या सहभागाची दोन टक्के व शासनाच्या सहभागाची ९८ टक्के रक्कम थेट वळती करून त्यांना लाभान्वित करणारी ही योजना आहे. नफा कमवणारे व्यावसायिक उद्योग समूह कायम तोट्यात जाणाऱ्या शेती पिकांचे विमे काढण्याचा व्यवसाय का करताहेत ? आजपर्यंत प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळाला ? विमाधारक शेतकऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर करून जास्तीत जास्त पीकविमा काढण्याचा आग्रह कशासाठी ? असे अनेक प्रश्न या योजनेच्या अंमलबजावणीबाबत उपस्थित केले जात आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेचा प्रचार शासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांच्या नव्हे तर कंपन्यांच्या हित जोपासनेचा भाग आहे.नफाखोर कंपन्यांकडून शेतकºयांच्या नुकसान भरपाईची अपेक्षा निरर्थक आहे. विमा प्रीमिअम म्हणून खरीपाच्या पिकासाठी जर दोन रूपये शेतकऱ्यांकडून घेण्यात आले असतील तर ९८ रूपये केंद्र शासन व राज्य शासनाने दिले आहेत, रब्बीच्या पिकांसाठी दीड रूपया शेतकऱ्यांचा घेतला असेल तर साडे १८ रूपयाचा शासनाचा वाटा आहे. हजारो कोटी रूपये आजवर कृषीसाठी केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून व देशातील ३ कोटी ६६ लाख ६३ हजार ७०० शेतकऱ्यांकडून पीकविमा प्रीमियमच्या नावाखाली रिलायन्स, एचडीएफसी, आयसीआयसीआय, इफ्को टोकि यो व इतर समुहांना देण्यात आले आहेत. या पैशांवर अर्थसंकल्पीय तरतुदीत नाव गरीब शेतकऱ्यांचे चंगळ मात्र विमा कंपन्यांचीच असे चित्र आहे.२ हजारांपैकी ४७३ शेतकऱ्यांनाच सेलूत लाभप्रधानमंत्री पिक विमा योजनेकरीता जिल्हयात खरीप हंगाम २०१९ करीता अ‍ॅग्रीकल्चर इंशुरन्स कंपनी आॅफ इंडिया या कंपनीची नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार मागील वर्षी वर्धा उपविभागातील वर्धा, सेलू व देवळी तालुक्यातील प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचा विमा मंजूर करण्यात आला. यामध्ये सोयाबिन पिकासाठी ३ हजार ७८९ शेतकरी सहभागी झाले असून या सर्वच शेतकऱ्यांचा विमा मंजूर करण्यात आला. तर कापूस पिकासाठी केवळ सेलू तालुक्यातील २ हजार २८२ शेतकºयांनी विमा भरला होता. यापैकी ४७३ शेतकºयांंचा विमा मंजूर करण्यात आला.अशा सुचविल्या नव्या सुधारणाशेतकऱ्यांच्या आश्वस्त रक्षणासाठी सुचविलेल्या दीर्घकालीन विकासात्मक उपाय योजना शेतकरी आरक्षणातील पीक उत्पन्न किमतीच्या संरक्षणाचा मार्ग अवलंबून ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असतील त्यांना त्यांच्या शेतांचे उपग्रह प्रक्षेपण प्रणाली, कृषी विभाग व महसुल विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण करून पीक उत्पन्न किंमतीची नुकसान भरपाई लगेच द्यावी. उत्पन्न किमतीचा मोबदला विनाविलंब मिळाल्याने वेळेवर कर्जाची परतफेड होऊन उर्वरीत रकमेतून शेतकरी आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करू शकतील.अधिसूचित पिकांसाठी विमा हफ्ताज्वारी पिकासाठीप्रति हेक्टर क्षेत्रासाठी २५ हजार रुपये करिता ५०० रुपये विमा हप्ता, भुईमुग- ३५ हजारु रुपये करीता ७०० रुपये, सोयाबिन ४५ हजार रुपये करिता ९०० रुपये, मुग व उडिद २० हजार रुपये करीता ४०० रुपये, तुर ३५ हजार रुपये करीता ७०० रुपये व कापूस पिकासाठी ४५ हजार रुपये करीता २ हजार २५० रुपये विमा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागेल

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेती