शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

अवकाळी पावसाचा २,१९८ हेक्टरवर पिकांना फटका

By admin | Updated: March 1, 2016 01:28 IST

जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने चांगलेच थैमान घातले आहे.

सोमवारीही पावसाचा जोर : काही भागात गारपिटीसह पाऊसवर्धा : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. या पावसासोबत गारपीट झाल्याने त्याचा पिकांना मोठा फटका बसला आहे. यात शेतात काढणीच्या प्रतीक्षेत असलेला गहू व चन्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात सुमारे २ हजार १९८ हेक्टरवर पिकांना फटका बसला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. जिल्ह्यात आलेल्या या पावसाचा फटका एकूण ७९ गावांना बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान वर्धा तालुक्यात असून येथील ३२ गावांना त्याचा फटका बसला तर दुसऱ्या क्रमांकावर देवळी तालुका असून यातील २२ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचा महसूल व कृषी विभागाच्यावतीने करण्यात आला. यात ३३ टक्क्यांच्या आत व ३३ टक्क्यांच्यावर अशी दोन श्रेणी करण्यात आली. यात पहिल्या श्रेणीत १ हजार ९६२ हेक्टरवर तर दुसऱ्या श्रेणीत २३६ हेक्टरवर नुकसान दर्शविण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आलेले नुकसान दोन दिवसातील आहे. जिल्ह्यातील पावसामुळे शेतकरी मात्र अडचणीत आला आहे.(प्रतिनिधी) पुलगाव - नाचणगाव परिसरात गारपीटजिल्ह्यात गत दोन दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस सोमवारीही तसाच असल्याचे दिसून आले. यात पुलगाव व नाचणगाव परिसरात सायंकाळी पावसासह गारपीट झाली. तर समुद्रपूर परिसरातील गिरड येथे पावसाने हजेरी लावली. येथेही पावसासह आलेल्या वाऱ्यामुळे काही भागातील झाडे उन्मळून पडली. तर सेवाग्राम येथे रविवारी रात्री आलेल्या पावसामुळे नुकसान झाले. या भागातील आसगाव येथील विद्यूत पुरवठा रात्रीपासून खंडीत झाला तो रात्री उशिराही सुरू झाला नव्हता.