शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

दव गेल्याने पिकांचे नुकसान

By admin | Updated: December 30, 2014 23:42 IST

आर्थिकदृष्टया, कंठत जीवन जगत असलेला शेतकरी यातून कधीतरी मार्ग निघेल, अशी आशा वारंवार उराशी बाळगत असतो. मात्र शेतकऱ्याच्या मागे लागलेले अस्मानी संकट पाठ सोडत नसल्याने

साहूर : आर्थिकदृष्टया, कंठत जीवन जगत असलेला शेतकरी यातून कधीतरी मार्ग निघेल, अशी आशा वारंवार उराशी बाळगत असतो. मात्र शेतकऱ्याच्या मागे लागलेले अस्मानी संकट पाठ सोडत नसल्याने ही स्थिती पालटण्याचे चिन्ह दिसत नाही. थंडीचा कडाका वाढल्याने दव कमी झाले आहे. यामुळे पीक करपण्याच्या मार्गावर आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे यात आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने याची पाहणी करून शासनाला अहवाल पाठवाव, तसेच आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.यावर्षींचा हंगाम सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांसाठी साडेसाती घेवुन आला होता. दीड महिना पाऊसच उशीरा आल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या उशीराने झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे ५० टक्के उत्पादन तेव्हाच घटले. त्यातही पाऊस अपुरा आल्याने व लवकरच निघुन गेल्याने शेतकऱ्याच्या उत्पादनात पुन्हा घट झाली. यावर्षी पाऊसच कमी आल्याने विहिरींना पाणी कमी आहे. संकटाचा सामना करूनही उत्पन्न घेण्याच्या प्रयत्नात शेतकरी असतांना साहूर व परिसरात शीतलहर आल्याने दव गेले आहे. त्यामुळे हजारो हेक्टर शेतीतील कापूस, तूर, मिरची व बागायची पीक धोक्यात आले आहे. पिकांचे रक्षण करून त्यांना वाढवतात. मात्र अस्मानी संकटामुळे हातचे पीक गमावण्याची वेळ आली आहे. पिकांवरील रोगराई, मजूर, कृषी केंद्र संचालक व व्यापारी यांचा सामना करून शेतकरी पिचला आहे. यातही उरले सुरले पीक निसर्ग कोपून शेतकऱ्याला उध्दवस्त करतो. शेतकरी मरणासन्न अवस्थेत असून आर्थिक मदत देणे अनिवार्य झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत पाच वर्षापासून हुकमी व कमी खर्चाचे समजल्या जाणारे सोयाबीन पीक शेतकऱ्यांना दगा देत आहे. यावर्षी कापसानेही दगा दिला आहे. दुष्काळाचे सावट पसरल्याने स्पष्ट चित्र आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नापिकी व दवाच्या चक्रव्युहात सापडलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी आहे. या भागातील पाहणी करून याचा अहवाल तयार करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)