शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

दव गेल्याने पिकांचे नुकसान

By admin | Updated: December 30, 2014 23:42 IST

आर्थिकदृष्टया, कंठत जीवन जगत असलेला शेतकरी यातून कधीतरी मार्ग निघेल, अशी आशा वारंवार उराशी बाळगत असतो. मात्र शेतकऱ्याच्या मागे लागलेले अस्मानी संकट पाठ सोडत नसल्याने

साहूर : आर्थिकदृष्टया, कंठत जीवन जगत असलेला शेतकरी यातून कधीतरी मार्ग निघेल, अशी आशा वारंवार उराशी बाळगत असतो. मात्र शेतकऱ्याच्या मागे लागलेले अस्मानी संकट पाठ सोडत नसल्याने ही स्थिती पालटण्याचे चिन्ह दिसत नाही. थंडीचा कडाका वाढल्याने दव कमी झाले आहे. यामुळे पीक करपण्याच्या मार्गावर आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे यात आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने याची पाहणी करून शासनाला अहवाल पाठवाव, तसेच आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.यावर्षींचा हंगाम सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांसाठी साडेसाती घेवुन आला होता. दीड महिना पाऊसच उशीरा आल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या उशीराने झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे ५० टक्के उत्पादन तेव्हाच घटले. त्यातही पाऊस अपुरा आल्याने व लवकरच निघुन गेल्याने शेतकऱ्याच्या उत्पादनात पुन्हा घट झाली. यावर्षी पाऊसच कमी आल्याने विहिरींना पाणी कमी आहे. संकटाचा सामना करूनही उत्पन्न घेण्याच्या प्रयत्नात शेतकरी असतांना साहूर व परिसरात शीतलहर आल्याने दव गेले आहे. त्यामुळे हजारो हेक्टर शेतीतील कापूस, तूर, मिरची व बागायची पीक धोक्यात आले आहे. पिकांचे रक्षण करून त्यांना वाढवतात. मात्र अस्मानी संकटामुळे हातचे पीक गमावण्याची वेळ आली आहे. पिकांवरील रोगराई, मजूर, कृषी केंद्र संचालक व व्यापारी यांचा सामना करून शेतकरी पिचला आहे. यातही उरले सुरले पीक निसर्ग कोपून शेतकऱ्याला उध्दवस्त करतो. शेतकरी मरणासन्न अवस्थेत असून आर्थिक मदत देणे अनिवार्य झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत पाच वर्षापासून हुकमी व कमी खर्चाचे समजल्या जाणारे सोयाबीन पीक शेतकऱ्यांना दगा देत आहे. यावर्षी कापसानेही दगा दिला आहे. दुष्काळाचे सावट पसरल्याने स्पष्ट चित्र आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नापिकी व दवाच्या चक्रव्युहात सापडलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी आहे. या भागातील पाहणी करून याचा अहवाल तयार करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)