शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

दव गेल्याने पिकांचे नुकसान

By admin | Updated: December 30, 2014 23:42 IST

आर्थिकदृष्टया, कंठत जीवन जगत असलेला शेतकरी यातून कधीतरी मार्ग निघेल, अशी आशा वारंवार उराशी बाळगत असतो. मात्र शेतकऱ्याच्या मागे लागलेले अस्मानी संकट पाठ सोडत नसल्याने

साहूर : आर्थिकदृष्टया, कंठत जीवन जगत असलेला शेतकरी यातून कधीतरी मार्ग निघेल, अशी आशा वारंवार उराशी बाळगत असतो. मात्र शेतकऱ्याच्या मागे लागलेले अस्मानी संकट पाठ सोडत नसल्याने ही स्थिती पालटण्याचे चिन्ह दिसत नाही. थंडीचा कडाका वाढल्याने दव कमी झाले आहे. यामुळे पीक करपण्याच्या मार्गावर आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे यात आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने याची पाहणी करून शासनाला अहवाल पाठवाव, तसेच आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.यावर्षींचा हंगाम सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांसाठी साडेसाती घेवुन आला होता. दीड महिना पाऊसच उशीरा आल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या उशीराने झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे ५० टक्के उत्पादन तेव्हाच घटले. त्यातही पाऊस अपुरा आल्याने व लवकरच निघुन गेल्याने शेतकऱ्याच्या उत्पादनात पुन्हा घट झाली. यावर्षी पाऊसच कमी आल्याने विहिरींना पाणी कमी आहे. संकटाचा सामना करूनही उत्पन्न घेण्याच्या प्रयत्नात शेतकरी असतांना साहूर व परिसरात शीतलहर आल्याने दव गेले आहे. त्यामुळे हजारो हेक्टर शेतीतील कापूस, तूर, मिरची व बागायची पीक धोक्यात आले आहे. पिकांचे रक्षण करून त्यांना वाढवतात. मात्र अस्मानी संकटामुळे हातचे पीक गमावण्याची वेळ आली आहे. पिकांवरील रोगराई, मजूर, कृषी केंद्र संचालक व व्यापारी यांचा सामना करून शेतकरी पिचला आहे. यातही उरले सुरले पीक निसर्ग कोपून शेतकऱ्याला उध्दवस्त करतो. शेतकरी मरणासन्न अवस्थेत असून आर्थिक मदत देणे अनिवार्य झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत पाच वर्षापासून हुकमी व कमी खर्चाचे समजल्या जाणारे सोयाबीन पीक शेतकऱ्यांना दगा देत आहे. यावर्षी कापसानेही दगा दिला आहे. दुष्काळाचे सावट पसरल्याने स्पष्ट चित्र आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नापिकी व दवाच्या चक्रव्युहात सापडलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी आहे. या भागातील पाहणी करून याचा अहवाल तयार करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)