शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
2
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
3
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
4
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
5
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
6
कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
7
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
9
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
10
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
11
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!
12
एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?
13
Formal ED Chief Karnal Singh: नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
14
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग बदलून राहा सेफ
15
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
16
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
17
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
18
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
19
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
20
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?

धरणाच्या बॅक वॉटरमुळे पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:46 IST

निम्न वर्धा प्रकल्पामुळे तालुक्यातील शेतकºयांना दिलासा कमी आणि त्रास अधिक होत असल्याचे आजवर अनेकदा दिसून आले.

ठळक मुद्देत्रासदायक निम्न वर्धा प्रकल्प : न्यायाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : निम्न वर्धा प्रकल्पामुळे तालुक्यातील शेतकºयांना दिलासा कमी आणि त्रास अधिक होत असल्याचे आजवर अनेकदा दिसून आले. वाठोडा येथील शेतकरी अतुल रामदास ठाकरे यांच्या एक हेक्टर शेतात धरणाचे बॅकवॉटर शिरल्याने कपाशी पीक गमावण्याची वेळ या शेतकºयावर आली आहे. याबाबत पीडित शेतकºयाने संबंधित विभागाकडे तक्रार केली आहे.बॅक वॉटरमुळे सदर शेतकºयाचे दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले असून सदर नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनातून केली आहे. अतुल ठाकरे यांचे मौजा वाठोडा शिवारात शेत आहे. या हंगामात शेतकºयाने कपाशीची लागवड केली. तर दिवाळी दरम्यान शेतात कपाशीची वेचणी करण्यात येणार होती. यातच मागील आठवड्यात झालेल्या पावसाने निम्न वर्धा धरणाच्या बॅकवॉटरची पातळी वाढली. त्यामुळे पाणी सोडण्यात आले. हे पाणी नाल्यामार्गे थेट ठाकरे यांच्या कपाशीच्या शेतात शिरले. त्यामुळे त्यांच्या शेताला सद्यस्थितीत तळ्याचे स्वरूप आले आहे. शेतातील कपाशीचे पीक पिवळे पडून बोंडे सडत आहे. संबंधित विभागाकडून सदर शेतकºयाला पाण्याची पातळी वाढणार असल्याची कुठलीही पुर्वसूचना देण्यात आली नाही. हा प्रकार नित्याचाच असल्याचे सांगण्यात येते. बॅकवॉटर व ओलाव्यामुळे सदर शेतकºयावर हाती आलेले पीक गमावण्याची वेळ आली आहे. शिवाय धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्यास उर्वरीत शेतातही पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे.शासनाने माझे शेत अधिग्रहीत करून या समस्येतून सुटका करावी अशी विनंती निवेदनातून संबंधित शेतकºयाने केली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, पालकमंत्री यांना दिले असून प्रतिलिपी आमदार अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे, मुख्य कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, कृषी अधिकारी यांना दिली आहे.शासनाने जमीन अधिग्रहित करण्याची मागणीशासनाने जमीन अधिग्रहीत केली नसताना शेतात पाणी साचल्याने कपाशी पिकाचे दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे. हा प्रकार नेहमीचाच असल्याने नुकसान सोसावे लागते. त्यापेक्षा शासनाने जमीन अधिग्रहीत करुन घ्यावी अशी मागणी निवेदनातून शेतकºयाने केली आहे. संबंधित विभागाच्या हलगर्जीपणाचा फटका शेतकºयांना बसला. नुकसानीची पाहणी करणे गरजेचे आहे.