शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

धरणाच्या बॅक वॉटरमुळे पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:46 IST

निम्न वर्धा प्रकल्पामुळे तालुक्यातील शेतकºयांना दिलासा कमी आणि त्रास अधिक होत असल्याचे आजवर अनेकदा दिसून आले.

ठळक मुद्देत्रासदायक निम्न वर्धा प्रकल्प : न्यायाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : निम्न वर्धा प्रकल्पामुळे तालुक्यातील शेतकºयांना दिलासा कमी आणि त्रास अधिक होत असल्याचे आजवर अनेकदा दिसून आले. वाठोडा येथील शेतकरी अतुल रामदास ठाकरे यांच्या एक हेक्टर शेतात धरणाचे बॅकवॉटर शिरल्याने कपाशी पीक गमावण्याची वेळ या शेतकºयावर आली आहे. याबाबत पीडित शेतकºयाने संबंधित विभागाकडे तक्रार केली आहे.बॅक वॉटरमुळे सदर शेतकºयाचे दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले असून सदर नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनातून केली आहे. अतुल ठाकरे यांचे मौजा वाठोडा शिवारात शेत आहे. या हंगामात शेतकºयाने कपाशीची लागवड केली. तर दिवाळी दरम्यान शेतात कपाशीची वेचणी करण्यात येणार होती. यातच मागील आठवड्यात झालेल्या पावसाने निम्न वर्धा धरणाच्या बॅकवॉटरची पातळी वाढली. त्यामुळे पाणी सोडण्यात आले. हे पाणी नाल्यामार्गे थेट ठाकरे यांच्या कपाशीच्या शेतात शिरले. त्यामुळे त्यांच्या शेताला सद्यस्थितीत तळ्याचे स्वरूप आले आहे. शेतातील कपाशीचे पीक पिवळे पडून बोंडे सडत आहे. संबंधित विभागाकडून सदर शेतकºयाला पाण्याची पातळी वाढणार असल्याची कुठलीही पुर्वसूचना देण्यात आली नाही. हा प्रकार नित्याचाच असल्याचे सांगण्यात येते. बॅकवॉटर व ओलाव्यामुळे सदर शेतकºयावर हाती आलेले पीक गमावण्याची वेळ आली आहे. शिवाय धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्यास उर्वरीत शेतातही पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे.शासनाने माझे शेत अधिग्रहीत करून या समस्येतून सुटका करावी अशी विनंती निवेदनातून संबंधित शेतकºयाने केली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, पालकमंत्री यांना दिले असून प्रतिलिपी आमदार अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे, मुख्य कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, कृषी अधिकारी यांना दिली आहे.शासनाने जमीन अधिग्रहित करण्याची मागणीशासनाने जमीन अधिग्रहीत केली नसताना शेतात पाणी साचल्याने कपाशी पिकाचे दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे. हा प्रकार नेहमीचाच असल्याने नुकसान सोसावे लागते. त्यापेक्षा शासनाने जमीन अधिग्रहीत करुन घ्यावी अशी मागणी निवेदनातून शेतकºयाने केली आहे. संबंधित विभागाच्या हलगर्जीपणाचा फटका शेतकºयांना बसला. नुकसानीची पाहणी करणे गरजेचे आहे.