शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

शेतात माकडांचा हैदोस

By admin | Updated: September 1, 2016 02:21 IST

पावसाची वाट पाहत काहीशा चिंतित वातावरणात शेतकरी पोळा सण साजरा करीत आहे.

पिकांचे नुकसान : भरपाई देण्याची मागणीवर्धा : पावसाची वाट पाहत काहीशा चिंतित वातावरणात शेतकरी पोळा सण साजरा करीत आहे. पावसाचे संकट नैसर्गिक असले तरी माकडांचा शेतात शिरकाव हे मानवनिर्मित आणखी एक नवे संकट शेतकरी वर्गाला त्रस्त करीत आहेत. त्यामुळे पोळ्यासाठी बैलांना सजवून त्यांची आधी सेवा करावी की शेतात माकडांना हाकलून लावण्यासाठी जावे असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. गावांमध्ये धुडगूस घालत असलेल्या माकडांनी सध्या आपला मोर्चा शिवारांकडे वळविला आहे. शेतात तूर, सोयाबीन, कापूस आदी पिके फुलावर येत आहे. ओलिताची सोय असलेल्या शेतांमध्ये काकडी, ढेमस, भेंडी आदी भाज्याही पिकावर यायला सुरुवात झाली आहे. हीच संधी साधून माकडांनी शेतांमध्ये धुडगूस घालून पिकांवर ताव मारून नुकसान करण्याचा सपाटा सुरू केला आहे. विशेष म्हणजे सकाळी शेतात कुणी नसल्याची संधी साधून ही माकडे कळपाने शेतात शिरून फुलांवर व कोवळ्या पानांवर ताव मारत आहे. आलेला नवीन बारच तोडल्या जात असल्याने नुकसान होत आहे. वारंवार हाकलूनही माकडे शेतात येतच असल्याचे दिसते.(शहर प्रतिनिधी) शेतकरी वर्गापुढे पेचपोळा सण असल्याने शेतकरी सध्या बैलांची सजावट आणि त्याची सेवा करण्यात व्यस्त आहे. बैलांची खांद शेकली जात असल्याने शेतकरी पूर्ण वेळ शेतात राहू शकत नाही. त्यातच पाऊस नसल्याने शेतातील कामेही थांबली आहे. नेमका याचाच फायदा घेत माकडांनी शेतात घर करणे सुरू केले आहे. फुलावर आलेली पिके खुडून ते खाण्याचा सपाटाच माकडांनी लावला आहे. माकडांच्या जीवितासही धोकाशेतात आलेल्या माकडांचा बंदोवस्त करण्यासाठी शेतकरी मिळेत तो मार्ग अवलंबितात. परंतु माकडे पळ काढत असल्याना अनेकदा झाडांवर किंवा रस्ता ओलांडून इतर शेतात जातात. अशावेळी रस्ता ओलांडताना मोठे वाहन आल्यास त्यांचा जीव जाऊ शकतो. तसेच माकडे ही खोडकर असल्याने ती अनेकदा विजेच्या खांबावार जाऊन बसतात. विजेचा धक्का लागून माकड मरण पावल्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे माकडांचा बंदोबस्त कसा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणीवनविभागाने माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. काही शेतकरी माकडांना हाकलून लावण्यासाठी फटाके फोडतात. तसेच छर्ऱ्याची बंदूक वापरूनही माकडांना हाकलून लावले जाते. पण हा उपाय फारसा प्रभावी ठरत नाही. त्यासाठी नेम धरू न माकडांना मारणारा मजूरच नेमावा लागतो. त्यालाही वेगळी मजुरी द्यावी लागते. महिला मजुरांमध्ये भीतीचे वातावरणमहिलांवर माकड जास्त हल्ले करीत असल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे महिला मजुरांमध्ये नेहमीच भीतीचे वातावरण असते. ज्या शेतात माकडांचा हैदोस असतो अशा शेतात शेतमजूर महिला कामास जाण्यास टाळाटाळ करतात. परिणामी कुठला उपाय करावा असा प्रश्न शेतकरी वर्गास पडतो.