शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

शेतात माकडांचा हैदोस

By admin | Updated: September 1, 2016 02:21 IST

पावसाची वाट पाहत काहीशा चिंतित वातावरणात शेतकरी पोळा सण साजरा करीत आहे.

पिकांचे नुकसान : भरपाई देण्याची मागणीवर्धा : पावसाची वाट पाहत काहीशा चिंतित वातावरणात शेतकरी पोळा सण साजरा करीत आहे. पावसाचे संकट नैसर्गिक असले तरी माकडांचा शेतात शिरकाव हे मानवनिर्मित आणखी एक नवे संकट शेतकरी वर्गाला त्रस्त करीत आहेत. त्यामुळे पोळ्यासाठी बैलांना सजवून त्यांची आधी सेवा करावी की शेतात माकडांना हाकलून लावण्यासाठी जावे असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. गावांमध्ये धुडगूस घालत असलेल्या माकडांनी सध्या आपला मोर्चा शिवारांकडे वळविला आहे. शेतात तूर, सोयाबीन, कापूस आदी पिके फुलावर येत आहे. ओलिताची सोय असलेल्या शेतांमध्ये काकडी, ढेमस, भेंडी आदी भाज्याही पिकावर यायला सुरुवात झाली आहे. हीच संधी साधून माकडांनी शेतांमध्ये धुडगूस घालून पिकांवर ताव मारून नुकसान करण्याचा सपाटा सुरू केला आहे. विशेष म्हणजे सकाळी शेतात कुणी नसल्याची संधी साधून ही माकडे कळपाने शेतात शिरून फुलांवर व कोवळ्या पानांवर ताव मारत आहे. आलेला नवीन बारच तोडल्या जात असल्याने नुकसान होत आहे. वारंवार हाकलूनही माकडे शेतात येतच असल्याचे दिसते.(शहर प्रतिनिधी) शेतकरी वर्गापुढे पेचपोळा सण असल्याने शेतकरी सध्या बैलांची सजावट आणि त्याची सेवा करण्यात व्यस्त आहे. बैलांची खांद शेकली जात असल्याने शेतकरी पूर्ण वेळ शेतात राहू शकत नाही. त्यातच पाऊस नसल्याने शेतातील कामेही थांबली आहे. नेमका याचाच फायदा घेत माकडांनी शेतात घर करणे सुरू केले आहे. फुलावर आलेली पिके खुडून ते खाण्याचा सपाटाच माकडांनी लावला आहे. माकडांच्या जीवितासही धोकाशेतात आलेल्या माकडांचा बंदोवस्त करण्यासाठी शेतकरी मिळेत तो मार्ग अवलंबितात. परंतु माकडे पळ काढत असल्याना अनेकदा झाडांवर किंवा रस्ता ओलांडून इतर शेतात जातात. अशावेळी रस्ता ओलांडताना मोठे वाहन आल्यास त्यांचा जीव जाऊ शकतो. तसेच माकडे ही खोडकर असल्याने ती अनेकदा विजेच्या खांबावार जाऊन बसतात. विजेचा धक्का लागून माकड मरण पावल्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे माकडांचा बंदोबस्त कसा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणीवनविभागाने माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. काही शेतकरी माकडांना हाकलून लावण्यासाठी फटाके फोडतात. तसेच छर्ऱ्याची बंदूक वापरूनही माकडांना हाकलून लावले जाते. पण हा उपाय फारसा प्रभावी ठरत नाही. त्यासाठी नेम धरू न माकडांना मारणारा मजूरच नेमावा लागतो. त्यालाही वेगळी मजुरी द्यावी लागते. महिला मजुरांमध्ये भीतीचे वातावरणमहिलांवर माकड जास्त हल्ले करीत असल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे महिला मजुरांमध्ये नेहमीच भीतीचे वातावरण असते. ज्या शेतात माकडांचा हैदोस असतो अशा शेतात शेतमजूर महिला कामास जाण्यास टाळाटाळ करतात. परिणामी कुठला उपाय करावा असा प्रश्न शेतकरी वर्गास पडतो.