शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

१२ गावांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 27, 2016 00:07 IST

तालुक्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने बारा गावांतील १०० हेक्टरवरील शेतजमिनीवर

त्वरित मदतीची गरज : अतिवृष्टीच्या सर्वेक्षणासाठी तहसीलदारांना निवेदनातून साकडे आर्वी : तालुक्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने बारा गावांतील १०० हेक्टरवरील शेतजमिनीवर पेरलेले बियाणे वाहून गेले. यात पंधरवाडा उलटूनही महसूल विभागाने अतिवृष्टीग्रस्त भागाचा सर्व्हे केला नाही. यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सदर शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत तहसीलदार मनोहर चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यात ८ व ९ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील लाडेगाव, टाकरखेडा, नांदपूर, देऊरवाडा, निंबोली (शेंडे), कर्माबाद, माटोडा, एकलारा, धनोडी, नांदपूर, अहिरवाडा, राजापूर या गावांना अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला. यात शेतात नुकतीच पेरणी केलेले कपाशी, तूर, सोयाबीन बियाणे या अतिवृष्टीच्या पावसाने वाहून गेले. या सर्व शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत. १५ दिवसांचा कालावधी लोटूनही नुकसानग्रस्त शेतांचा सर्व्हे करण्यात आला नाही. यावर त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपा तालुका सरचिटणीस मनीष उभाड व शेतकऱ्यांनी केली आहे. पहिल्याच पावसात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, कपाशी, तूर, बियाणे, खते आणि पेरणीवर झालेला खर्च पूर्णत: बुडाला. आता पेरणीसाठी दुबार खर्च कसा करावा, या विवंचनेत शेतकरी आहेत. या सर्व बाबींची दखल तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती व महसूल विभागाने घेणे गरजेचे आहे; पण अद्याप सर्वेक्षण न झाल्याने मदत मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बॅकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज देताना पीक विम्यासाठी दोन टक्के रक्कम कापून घेतली. आता शेतकऱ्यांची पेरणीच व्यर्थ ठरल्याने नुकसानीची रक्कम बँका देणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील पूर्णत: शेती बुडालेल्या भागात त्वरित सर्वेक्षण करावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. यावेळी सुरेंद्र संकलेचा, धनराज इंगळे, सचिन घोडमारे, सुनील जगताप व शेतकरी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी) पिके समाधानकारक; पण पर्जन्यमान अपर्याप्तच रोहणा : परिसरात १५ जूनपासून पाहिजे तेवढा व पाहिजे तेव्हा पाऊस आल्याने परिसरातील कापूस, सोयाबीन, तूर, मुंग, उडीत आदी पिके समाधानकारक आहेत; पण अर्धा पावसाळा संपत असताना नदी, नाल्यांना पूर येऊन ते प्रवाहित झाले नाहीत. शेतातील अनेक विहिरींची पातळी उन्हाळ्यात होती तेवढीच आहे. काही दिवस अशीच स्थिती राहिल्यास भविष्यात ओलित कसे होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रोहणा परिसरातील पिके सध्या समाधानकारक दिसत असली तरी जमिनीतील खोल गेलेली पाण्याची पातळी वर येण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. नदी, नाल्यांना पूर येऊन ते वाहते झाल्याशिवाय जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होणार नाही. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. भोलेश्वरी नदी व नाले अद्याप वाहते झाले नाही. मागील दोन वर्षे झालेल्या कमी पावसाने अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. नदी, नाले कोरडे असल्याने त्यावर चालणारे मोटारपंप बंद असल्याचे दिसते. ओलित बंद झाल्याने शेतात विहीर आहे; पण ओलित नाही, अशी अवस्था आहे. राज्यातील इतर भागात बरसणारा पाऊस रोहणा परिसरावर रूष्ट झाल्याचे जाणवत आहे. पावसातील खंडामुळे पिकाच्या आंतर मशागतीची कामे गतिमान झालीत. यांत्रिकीकरणाच्या युगात बैलजोड्यांची संख्या कमी झाली. बैलजोडी असलेले शेतकरी प्रथम स्वत:च्या शेतात डवरणी करण्यात व्यस्त असल्याने किरायाने जोडी सांगणाऱ्या शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. निंदणासाठी मजूरही गावात कमी असल्याने अन्य गावांतून त्यांना आणावे लागते. मजुरीसह वाहनाचा खर्च सोसावा लागत आहे. यात वाहन मालकांचे फावत आहे. पावसाचे प्रमाण असेच राहून मान्सून परत फिरला तर भविष्यात अडचण निर्माण होणार, ही भीती शेतकऱ्यांना त्रस्त करीत असल्याचे दिसते.(वार्ताहर)