शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
3
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
4
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
5
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
6
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
7
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
8
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
9
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
10
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
11
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!
12
Radhika Yadav : "भावाला बाहेर पाठवलं, पिटबुलला बांधलं अन् राधिकाला मारलं"; हिमांशिकाचा धक्कादायक खुलासा
13
पती-पत्नी वादात कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून ग्राह्य धरणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
“प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला, कडक कारवाई करावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
16
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
17
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
18
शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंगची थिअरी आणि समर्थ रामदास यांच्या स्तोत्रात आहे एक साम्य!
19
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
20
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था

शेतकऱ्यांसमोर पीक बदलाचे संकट

By admin | Updated: July 2, 2014 23:24 IST

बी-बियाणे खते इत्यादींची खरेदी करून शेती पेरणी योग्य तयार केल्यावर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर पीक बदलाचे संकट निर्माण झाले आहे. येत्या ५-६ दिवसात पाऊस न आल्यास कोणते

पिंपळखुटा: बी-बियाणे खते इत्यादींची खरेदी करून शेती पेरणी योग्य तयार केल्यावर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर पीक बदलाचे संकट निर्माण झाले आहे. येत्या ५-६ दिवसात पाऊस न आल्यास कोणते पीक पेरावे याचा विचार शेतकरी करीत असून दिवसेंदिवस त्यांची चिंता वाढत आहे.गत वर्षी २५ मे ते २५ जून या काळात १८ दिवस सतत पाऊस आला. मात्र यावर्षी यारदम्यान केवळ २ दिवस पाऊस आला. त्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण आता त्यांच्यावर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. मागील वर्षी अतिवृष्टी व गारपीटीच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांची यंदाही आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. पाऊस येणार या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे आता शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. सोयाबीनची वेळ निघून गेली असून कपाशीची वेळही निघून जात आहे. त्यामुळे आता कोणते पीक पेरावे या विवंचनेत शेतकरी आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे त्यांनी पिकाला जीवदान दिले. मात्र इतरांचे बियाणे अजूनही माती आड आहे. किमान ६५ मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे कृषी विभाग सांगत असला तरी आधीच लांबलेली पेरणी शेतकऱ्यांनी पावसाची वाट न पाहता केली. यंदा सोयाबीन बियाण्यांचे वाढलेले भाव व बियाण्यांच्या उगवण क्षमतेची खात्री नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाचे क्षेत्र वाढविले होते. मात्र पाऊस लांबल्याने पुन्हा काय पेरावे या विचारात शेतकरी आहे.गत वर्षी पावसामुळे खराब झालेल्या जनावरांचा चारा शेतकऱ्यांनी साठवून ठेवला होता. नाईलाजाने जनावरांना तो चारा खावा लागला. परंतु पावसाच्या विलंबामुळे नवीन चारा उगवण्या आधीच गोठ्यातील चारा संपल्याने शेतकऱ्यांसमोर चाऱ्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. जनावरांना कसे जगावावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच आर्थिक टंचाईत असलेला शेतकरी जनावरांकरिता चारा विकत घेवू शकत नाही. त्याकरिता शासनाने शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे आहे. पावसाच्या विलंबाचा मजुरांनाही फटका बसला आहे. शेतीचे काम बंद असल्यामुळे मजूर सध्या घरीच असल्याचे दिसत आहे.(वार्ताहर)