शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या महिलांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:39 IST

नगर पंचायतच्या निवडणुकीत तीन महिन्यांत भालकर वॉर्डाची पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढू, असे सुतोवाच केले होते. आज तीन वर्षांचा कालावधी लोटूनही नगर पंचायतीने समस्या निकाली काढली नाही.

ठळक मुद्देन.पं. प्रशासनाची तक्रार : समस्या निवारणाकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : नगर पंचायतच्या निवडणुकीत तीन महिन्यांत भालकर वॉर्डाची पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढू, असे सुतोवाच केले होते. आज तीन वर्षांचा कालावधी लोटूनही नगर पंचायतीने समस्या निकाली काढली नाही. उलट मंगळवारी पाण्याची समस्या घेऊन नगर पंचायतीवर धडकलेल्या महिलांवरच गुन्हे दाखल करण्यात आलेत.नगर पंचायतीमध्ये आ. कुणावार यांची सत्ता असताना तीन वर्षांपासून पाण्याची समस्या सुटली नाही. पाण्याच्या समस्येकरिता केलेल्या आंदोलकांवर भादंविच्या कलम ३४१, ३४३, १८६ अन्वये तथा मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले. मंदा रमेश ठावरे, निर्मला अनिल आलम, वच्छला सदाशिव कुमरे, कुसूम बावणे यांच्यासह २१ महिलांवर गुन्हे दाखल आहे. याबाबत नगर पंचायतचे मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे, नगराध्यक्ष शीला सोनारे यासह सर्व नगरसेवकांनी तक्रार केली. आंदोलक महिला दुपारी १२ वाजतापासून रात्री ११ वाजेपर्यंत चिमुकल्यांसह उपाशी पोलीस ठाण्यात ताटकळत होत्या.पाणी टंचाईसारख्या गंभीर प्रश्नाला महिलांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन करून ठिय्या मांडला. त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करणे म्हणजे सत्ताधाºयांच्या विरोधात कुणीही आंदोलन करू नये, समस्या मांडू नये, अशाच प्रकारे जनतेची मुसकदाबी करणे होय.- अशोक शिंदे, माजी आमदार, हिंगणघाट.