शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या महिलांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:39 IST

नगर पंचायतच्या निवडणुकीत तीन महिन्यांत भालकर वॉर्डाची पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढू, असे सुतोवाच केले होते. आज तीन वर्षांचा कालावधी लोटूनही नगर पंचायतीने समस्या निकाली काढली नाही.

ठळक मुद्देन.पं. प्रशासनाची तक्रार : समस्या निवारणाकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : नगर पंचायतच्या निवडणुकीत तीन महिन्यांत भालकर वॉर्डाची पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढू, असे सुतोवाच केले होते. आज तीन वर्षांचा कालावधी लोटूनही नगर पंचायतीने समस्या निकाली काढली नाही. उलट मंगळवारी पाण्याची समस्या घेऊन नगर पंचायतीवर धडकलेल्या महिलांवरच गुन्हे दाखल करण्यात आलेत.नगर पंचायतीमध्ये आ. कुणावार यांची सत्ता असताना तीन वर्षांपासून पाण्याची समस्या सुटली नाही. पाण्याच्या समस्येकरिता केलेल्या आंदोलकांवर भादंविच्या कलम ३४१, ३४३, १८६ अन्वये तथा मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले. मंदा रमेश ठावरे, निर्मला अनिल आलम, वच्छला सदाशिव कुमरे, कुसूम बावणे यांच्यासह २१ महिलांवर गुन्हे दाखल आहे. याबाबत नगर पंचायतचे मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे, नगराध्यक्ष शीला सोनारे यासह सर्व नगरसेवकांनी तक्रार केली. आंदोलक महिला दुपारी १२ वाजतापासून रात्री ११ वाजेपर्यंत चिमुकल्यांसह उपाशी पोलीस ठाण्यात ताटकळत होत्या.पाणी टंचाईसारख्या गंभीर प्रश्नाला महिलांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन करून ठिय्या मांडला. त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करणे म्हणजे सत्ताधाºयांच्या विरोधात कुणीही आंदोलन करू नये, समस्या मांडू नये, अशाच प्रकारे जनतेची मुसकदाबी करणे होय.- अशोक शिंदे, माजी आमदार, हिंगणघाट.