शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

कोरोनाच्या धास्तीमुळे मोक्षधामात ‘स्मशानशांतता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

अनेकदा परराज्य, परजिल्ह्यातून येणाºया नातेवाइकांमुळे अंत्यविधीही काही वेळ थांबवला जातो. परंतु, आता कोरोना संसर्गाच्या भीतीने या ठिकाणची गर्दीही ओसरली आहे. शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये दररोज ४ ते ५ अंत्यविधी होतात. परंतु, आता हे अंत्यविधी केवळ ५ ते १० लोकांच्या उपस्थितीत उरकण्यासोबतच पवनार येथील धामनदी पात्रावर होणारे दशक्रिया विधीही गावातच करावे लागत आहेत.

ठळक मुद्देसंडे अँकर । दीडशे ते दोनशेच्या गर्दीत होणाऱ्या अंत्यविधीला उपस्थित राहतात नाममात्र व्यक्ती

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागरिकांची गर्दी कोरोनाचा प्रसार होण्यासाठी पोषक ठरते. त्यामुळे गर्दी होणाºया कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. सध्या गर्दीच्या ठिकाणी जाणे नागरिक टाळू लागले आहेत. एखाद्याच्या अंत्यविधीसाठी ऐरवी नातेवाइकांसह निकटवर्तीय गर्दी करायचे. सुमारे दीडशे ते दोनशे व्यक्ती अंत्यसंस्काराच्यावेळी उपस्थित रहायचे. परंतु, सध्या जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने तसेच कोरोनाच्या भीतीमुळे केवळ मोजकेच व्यक्ती स्मशानभूमीत उपस्थित राहत आहेत. एकूणच स्मशानभूमीत ‘स्मशान’ शांतता राहत असल्याचे बघावयास मिळत आहे.अनेकदा परराज्य, परजिल्ह्यातून येणाऱ्या नातेवाइकांमुळे अंत्यविधीही काही वेळ थांबवला जातो. परंतु, आता कोरोना संसर्गाच्या भीतीने या ठिकाणची गर्दीही ओसरली आहे. शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये दररोज ४ ते ५ अंत्यविधी होतात. परंतु, आता हे अंत्यविधी केवळ ५ ते १० लोकांच्या उपस्थितीत उरकण्यासोबतच पवनार येथील धामनदी पात्रावर होणारे दशक्रिया विधीही गावातच करावे लागत आहेत. कोरोना विषाणूची लागण व संक्रमण रोखण्यासाठी शासनाकडून ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनानुसार जिल्ह्यातील कंपन्या, शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी घरूनच काम करू लागले आहेत. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठीही मदत होऊ लागली आहे. तर बस, रेल्वे, खासगी वाहनांची प्रवासी सेवा बंद आहे. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यात जाणे तसेच इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात नागरिकांचे लोंढे येणे बंद आहेत.प्रत्येक जण हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करून विषाणूपासून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. पूर्वी एखादी व्यक्ती दगावल्यास त्याच्यावर अंत्यविधी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नातेवाईक, आप्तेष्ट मोठ्या प्रमाणात गोळा होत होते. परंतु, आता गर्दी होऊ नये म्हणून बोटावर मोजण्या इतक्याच निकटवर्तीयांच्या उपस्थितीत आणि लवकर अंत्यविधी उरकून घेतला जात आहे. तर काही गावांमध्ये दशक्रिया विधी कार्यक्रमही बंद करण्यात आले आहेत. वर्धा शहरात दोन मोठ्या स्मशानभूमी आहेत. या स्मशानभूमीमध्ये दररोज ४ ते ६ अंत्यविधी होत असतात. एखादा राजकीय, प्रतिष्ठित व्यक्ती असेल तर २५० ते ३०० पर्यंत जनसमुदाय उपस्थित राहायचा. परंतु, आता केवळ मोजकेच व्यक्तींना अंत्यविधी आटोपून घ्यावा लागत आहे.वर्ध्यात बाराच्या जवळपास स्मशानभूमीवर्धा शहरात सर्वधमीर्यांच्या सुमारे १२ स्मशानभूमी आहेत. या विविध स्मशानभूमींमध्ये दररोज धर्मानुसार अंत्यविधी पार पाडले जातात. परंतु, आता कोरोनाच्या धास्तीने अंत्यविधीही कमी वेळात आटोपून गर्दी टाळावी लागत आहे.दहा ते बारा दिवसांपूर्वीच अंत्यविधीत मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती दिसायची. परंतु, कोरोनाच्या भीतीने आणि प्रशासनाने दिलेल्या आदेशामुळे आता खूप कमी प्रमाणात नागरिक अंत्यविधीला येताना दिसत आहेत. बोटावर मोजण्या इतक्याच व्यक्तींच्या उपस्थितीतच अंत्यविधी होत आहेत.- मुरलीधर महत्त्वाने, स्मशानभूमी व्यवस्थापक, वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस