शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोनाच्या धास्तीमुळे मोक्षधामात ‘स्मशानशांतता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

अनेकदा परराज्य, परजिल्ह्यातून येणाºया नातेवाइकांमुळे अंत्यविधीही काही वेळ थांबवला जातो. परंतु, आता कोरोना संसर्गाच्या भीतीने या ठिकाणची गर्दीही ओसरली आहे. शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये दररोज ४ ते ५ अंत्यविधी होतात. परंतु, आता हे अंत्यविधी केवळ ५ ते १० लोकांच्या उपस्थितीत उरकण्यासोबतच पवनार येथील धामनदी पात्रावर होणारे दशक्रिया विधीही गावातच करावे लागत आहेत.

ठळक मुद्देसंडे अँकर । दीडशे ते दोनशेच्या गर्दीत होणाऱ्या अंत्यविधीला उपस्थित राहतात नाममात्र व्यक्ती

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागरिकांची गर्दी कोरोनाचा प्रसार होण्यासाठी पोषक ठरते. त्यामुळे गर्दी होणाºया कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. सध्या गर्दीच्या ठिकाणी जाणे नागरिक टाळू लागले आहेत. एखाद्याच्या अंत्यविधीसाठी ऐरवी नातेवाइकांसह निकटवर्तीय गर्दी करायचे. सुमारे दीडशे ते दोनशे व्यक्ती अंत्यसंस्काराच्यावेळी उपस्थित रहायचे. परंतु, सध्या जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने तसेच कोरोनाच्या भीतीमुळे केवळ मोजकेच व्यक्ती स्मशानभूमीत उपस्थित राहत आहेत. एकूणच स्मशानभूमीत ‘स्मशान’ शांतता राहत असल्याचे बघावयास मिळत आहे.अनेकदा परराज्य, परजिल्ह्यातून येणाऱ्या नातेवाइकांमुळे अंत्यविधीही काही वेळ थांबवला जातो. परंतु, आता कोरोना संसर्गाच्या भीतीने या ठिकाणची गर्दीही ओसरली आहे. शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये दररोज ४ ते ५ अंत्यविधी होतात. परंतु, आता हे अंत्यविधी केवळ ५ ते १० लोकांच्या उपस्थितीत उरकण्यासोबतच पवनार येथील धामनदी पात्रावर होणारे दशक्रिया विधीही गावातच करावे लागत आहेत. कोरोना विषाणूची लागण व संक्रमण रोखण्यासाठी शासनाकडून ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनानुसार जिल्ह्यातील कंपन्या, शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी घरूनच काम करू लागले आहेत. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठीही मदत होऊ लागली आहे. तर बस, रेल्वे, खासगी वाहनांची प्रवासी सेवा बंद आहे. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यात जाणे तसेच इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात नागरिकांचे लोंढे येणे बंद आहेत.प्रत्येक जण हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करून विषाणूपासून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. पूर्वी एखादी व्यक्ती दगावल्यास त्याच्यावर अंत्यविधी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नातेवाईक, आप्तेष्ट मोठ्या प्रमाणात गोळा होत होते. परंतु, आता गर्दी होऊ नये म्हणून बोटावर मोजण्या इतक्याच निकटवर्तीयांच्या उपस्थितीत आणि लवकर अंत्यविधी उरकून घेतला जात आहे. तर काही गावांमध्ये दशक्रिया विधी कार्यक्रमही बंद करण्यात आले आहेत. वर्धा शहरात दोन मोठ्या स्मशानभूमी आहेत. या स्मशानभूमीमध्ये दररोज ४ ते ६ अंत्यविधी होत असतात. एखादा राजकीय, प्रतिष्ठित व्यक्ती असेल तर २५० ते ३०० पर्यंत जनसमुदाय उपस्थित राहायचा. परंतु, आता केवळ मोजकेच व्यक्तींना अंत्यविधी आटोपून घ्यावा लागत आहे.वर्ध्यात बाराच्या जवळपास स्मशानभूमीवर्धा शहरात सर्वधमीर्यांच्या सुमारे १२ स्मशानभूमी आहेत. या विविध स्मशानभूमींमध्ये दररोज धर्मानुसार अंत्यविधी पार पाडले जातात. परंतु, आता कोरोनाच्या धास्तीने अंत्यविधीही कमी वेळात आटोपून गर्दी टाळावी लागत आहे.दहा ते बारा दिवसांपूर्वीच अंत्यविधीत मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती दिसायची. परंतु, कोरोनाच्या भीतीने आणि प्रशासनाने दिलेल्या आदेशामुळे आता खूप कमी प्रमाणात नागरिक अंत्यविधीला येताना दिसत आहेत. बोटावर मोजण्या इतक्याच व्यक्तींच्या उपस्थितीतच अंत्यविधी होत आहेत.- मुरलीधर महत्त्वाने, स्मशानभूमी व्यवस्थापक, वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस