शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
2
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
3
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
4
बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला 
5
रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपोर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!
6
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम
7
Crime: मुलीला तरुणासोबत 'नको त्या अवस्थेत' पाहिलं; संतापलेल्या वडिलांनी जे केलं, त्याची गावभर चर्चा!
8
बॉस असावा तर असा! सलग तिसऱ्या वर्षी दिवाळीला कर्मचाऱ्यांना गिफ्ट केल्या ५१ आलिशान कार
9
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
10
‎‘भूपती-रुपेश गद्दार!', माओवाद्यांच्या‎ केंद्रीय समितीची आगपाखड; २७० नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर चळवळीत खदखद
11
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
12
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
13
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
14
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये का घालतंय मीठ? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
15
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
16
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लक्झरी इलेक्ट्रिक कार देते ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
17
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
18
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
19
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
20
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  

कोरोनाच्या धास्तीमुळे मोक्षधामात ‘स्मशानशांतता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

अनेकदा परराज्य, परजिल्ह्यातून येणाºया नातेवाइकांमुळे अंत्यविधीही काही वेळ थांबवला जातो. परंतु, आता कोरोना संसर्गाच्या भीतीने या ठिकाणची गर्दीही ओसरली आहे. शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये दररोज ४ ते ५ अंत्यविधी होतात. परंतु, आता हे अंत्यविधी केवळ ५ ते १० लोकांच्या उपस्थितीत उरकण्यासोबतच पवनार येथील धामनदी पात्रावर होणारे दशक्रिया विधीही गावातच करावे लागत आहेत.

ठळक मुद्देसंडे अँकर । दीडशे ते दोनशेच्या गर्दीत होणाऱ्या अंत्यविधीला उपस्थित राहतात नाममात्र व्यक्ती

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागरिकांची गर्दी कोरोनाचा प्रसार होण्यासाठी पोषक ठरते. त्यामुळे गर्दी होणाºया कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. सध्या गर्दीच्या ठिकाणी जाणे नागरिक टाळू लागले आहेत. एखाद्याच्या अंत्यविधीसाठी ऐरवी नातेवाइकांसह निकटवर्तीय गर्दी करायचे. सुमारे दीडशे ते दोनशे व्यक्ती अंत्यसंस्काराच्यावेळी उपस्थित रहायचे. परंतु, सध्या जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने तसेच कोरोनाच्या भीतीमुळे केवळ मोजकेच व्यक्ती स्मशानभूमीत उपस्थित राहत आहेत. एकूणच स्मशानभूमीत ‘स्मशान’ शांतता राहत असल्याचे बघावयास मिळत आहे.अनेकदा परराज्य, परजिल्ह्यातून येणाऱ्या नातेवाइकांमुळे अंत्यविधीही काही वेळ थांबवला जातो. परंतु, आता कोरोना संसर्गाच्या भीतीने या ठिकाणची गर्दीही ओसरली आहे. शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये दररोज ४ ते ५ अंत्यविधी होतात. परंतु, आता हे अंत्यविधी केवळ ५ ते १० लोकांच्या उपस्थितीत उरकण्यासोबतच पवनार येथील धामनदी पात्रावर होणारे दशक्रिया विधीही गावातच करावे लागत आहेत. कोरोना विषाणूची लागण व संक्रमण रोखण्यासाठी शासनाकडून ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनानुसार जिल्ह्यातील कंपन्या, शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी घरूनच काम करू लागले आहेत. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठीही मदत होऊ लागली आहे. तर बस, रेल्वे, खासगी वाहनांची प्रवासी सेवा बंद आहे. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यात जाणे तसेच इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात नागरिकांचे लोंढे येणे बंद आहेत.प्रत्येक जण हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करून विषाणूपासून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. पूर्वी एखादी व्यक्ती दगावल्यास त्याच्यावर अंत्यविधी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नातेवाईक, आप्तेष्ट मोठ्या प्रमाणात गोळा होत होते. परंतु, आता गर्दी होऊ नये म्हणून बोटावर मोजण्या इतक्याच निकटवर्तीयांच्या उपस्थितीत आणि लवकर अंत्यविधी उरकून घेतला जात आहे. तर काही गावांमध्ये दशक्रिया विधी कार्यक्रमही बंद करण्यात आले आहेत. वर्धा शहरात दोन मोठ्या स्मशानभूमी आहेत. या स्मशानभूमीमध्ये दररोज ४ ते ६ अंत्यविधी होत असतात. एखादा राजकीय, प्रतिष्ठित व्यक्ती असेल तर २५० ते ३०० पर्यंत जनसमुदाय उपस्थित राहायचा. परंतु, आता केवळ मोजकेच व्यक्तींना अंत्यविधी आटोपून घ्यावा लागत आहे.वर्ध्यात बाराच्या जवळपास स्मशानभूमीवर्धा शहरात सर्वधमीर्यांच्या सुमारे १२ स्मशानभूमी आहेत. या विविध स्मशानभूमींमध्ये दररोज धर्मानुसार अंत्यविधी पार पाडले जातात. परंतु, आता कोरोनाच्या धास्तीने अंत्यविधीही कमी वेळात आटोपून गर्दी टाळावी लागत आहे.दहा ते बारा दिवसांपूर्वीच अंत्यविधीत मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती दिसायची. परंतु, कोरोनाच्या भीतीने आणि प्रशासनाने दिलेल्या आदेशामुळे आता खूप कमी प्रमाणात नागरिक अंत्यविधीला येताना दिसत आहेत. बोटावर मोजण्या इतक्याच व्यक्तींच्या उपस्थितीतच अंत्यविधी होत आहेत.- मुरलीधर महत्त्वाने, स्मशानभूमी व्यवस्थापक, वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस