शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

कोरोनाच्या धास्तीमुळे मोक्षधामात ‘स्मशानशांतता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

अनेकदा परराज्य, परजिल्ह्यातून येणाºया नातेवाइकांमुळे अंत्यविधीही काही वेळ थांबवला जातो. परंतु, आता कोरोना संसर्गाच्या भीतीने या ठिकाणची गर्दीही ओसरली आहे. शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये दररोज ४ ते ५ अंत्यविधी होतात. परंतु, आता हे अंत्यविधी केवळ ५ ते १० लोकांच्या उपस्थितीत उरकण्यासोबतच पवनार येथील धामनदी पात्रावर होणारे दशक्रिया विधीही गावातच करावे लागत आहेत.

ठळक मुद्देसंडे अँकर । दीडशे ते दोनशेच्या गर्दीत होणाऱ्या अंत्यविधीला उपस्थित राहतात नाममात्र व्यक्ती

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागरिकांची गर्दी कोरोनाचा प्रसार होण्यासाठी पोषक ठरते. त्यामुळे गर्दी होणाºया कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. सध्या गर्दीच्या ठिकाणी जाणे नागरिक टाळू लागले आहेत. एखाद्याच्या अंत्यविधीसाठी ऐरवी नातेवाइकांसह निकटवर्तीय गर्दी करायचे. सुमारे दीडशे ते दोनशे व्यक्ती अंत्यसंस्काराच्यावेळी उपस्थित रहायचे. परंतु, सध्या जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने तसेच कोरोनाच्या भीतीमुळे केवळ मोजकेच व्यक्ती स्मशानभूमीत उपस्थित राहत आहेत. एकूणच स्मशानभूमीत ‘स्मशान’ शांतता राहत असल्याचे बघावयास मिळत आहे.अनेकदा परराज्य, परजिल्ह्यातून येणाऱ्या नातेवाइकांमुळे अंत्यविधीही काही वेळ थांबवला जातो. परंतु, आता कोरोना संसर्गाच्या भीतीने या ठिकाणची गर्दीही ओसरली आहे. शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये दररोज ४ ते ५ अंत्यविधी होतात. परंतु, आता हे अंत्यविधी केवळ ५ ते १० लोकांच्या उपस्थितीत उरकण्यासोबतच पवनार येथील धामनदी पात्रावर होणारे दशक्रिया विधीही गावातच करावे लागत आहेत. कोरोना विषाणूची लागण व संक्रमण रोखण्यासाठी शासनाकडून ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनानुसार जिल्ह्यातील कंपन्या, शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी घरूनच काम करू लागले आहेत. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठीही मदत होऊ लागली आहे. तर बस, रेल्वे, खासगी वाहनांची प्रवासी सेवा बंद आहे. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यात जाणे तसेच इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात नागरिकांचे लोंढे येणे बंद आहेत.प्रत्येक जण हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करून विषाणूपासून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. पूर्वी एखादी व्यक्ती दगावल्यास त्याच्यावर अंत्यविधी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नातेवाईक, आप्तेष्ट मोठ्या प्रमाणात गोळा होत होते. परंतु, आता गर्दी होऊ नये म्हणून बोटावर मोजण्या इतक्याच निकटवर्तीयांच्या उपस्थितीत आणि लवकर अंत्यविधी उरकून घेतला जात आहे. तर काही गावांमध्ये दशक्रिया विधी कार्यक्रमही बंद करण्यात आले आहेत. वर्धा शहरात दोन मोठ्या स्मशानभूमी आहेत. या स्मशानभूमीमध्ये दररोज ४ ते ६ अंत्यविधी होत असतात. एखादा राजकीय, प्रतिष्ठित व्यक्ती असेल तर २५० ते ३०० पर्यंत जनसमुदाय उपस्थित राहायचा. परंतु, आता केवळ मोजकेच व्यक्तींना अंत्यविधी आटोपून घ्यावा लागत आहे.वर्ध्यात बाराच्या जवळपास स्मशानभूमीवर्धा शहरात सर्वधमीर्यांच्या सुमारे १२ स्मशानभूमी आहेत. या विविध स्मशानभूमींमध्ये दररोज धर्मानुसार अंत्यविधी पार पाडले जातात. परंतु, आता कोरोनाच्या धास्तीने अंत्यविधीही कमी वेळात आटोपून गर्दी टाळावी लागत आहे.दहा ते बारा दिवसांपूर्वीच अंत्यविधीत मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती दिसायची. परंतु, कोरोनाच्या भीतीने आणि प्रशासनाने दिलेल्या आदेशामुळे आता खूप कमी प्रमाणात नागरिक अंत्यविधीला येताना दिसत आहेत. बोटावर मोजण्या इतक्याच व्यक्तींच्या उपस्थितीतच अंत्यविधी होत आहेत.- मुरलीधर महत्त्वाने, स्मशानभूमी व्यवस्थापक, वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस