शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

९८० गावात उघड्यावर होतात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 21:42 IST

गाव तेथे स्मशानभूमी, असा निर्णय घेत शासनाने स्मशानभूमिच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. असे असताना वर्धा जिल्ह्यात तब्बल ९०८ गावांत स्मशानभूमिची समस्या डोके वर काढून आहे.

ठळक मुद्दे१७७ गावातून स्मशानभूमीच्या शेडची मागणी

रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गाव तेथे स्मशानभूमी, असा निर्णय घेत शासनाने स्मशानभूमिच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. असे असताना वर्धा जिल्ह्यात तब्बल ९०८ गावांत स्मशानभूमिची समस्या डोके वर काढून आहे. जिल्हा प्रशासनाकडे नोंद असलेल्या स्मशानभूमिपैकी १७७ गावांत उघड्यावर मृतदेहावर अंत्यसंस्कार होत आहे.स्मशानभूमी विकासाच्या शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्याला या वर्षात स्मशानभूमी विकासाकरिता ५ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून स्मशानभूमिचा विकास साधण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत. या निधीतून जिल्ह्यातील २०४ स्मशानभूमिचा विकास साधण्यात येत आहे. यात विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत; पण अनेक गावांत यातील एक छदामही पोहोचला नसल्याचे दिसून आले आहे.१३६१ गावांच्या या जिल्ह्यात होत असलेल्या कामांवरून आणि शासनाकडे असलेल्या नोंदीवरून केवळ ३८१ गावांत स्मशानभूमी असल्याचे दिसून आले आहे. यातील केवळ २०४ गावांतील स्मशानभूमिचे सौदर्यीकरण करण्यात येत आहे. याच गावांतील कामांवर आलेला निधी खर्च करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. इतर गावांत मात्र असा कुठलाही निधी देण्यात आला नसल्याचे दिसून आले आहे.ज्या गावातील व्यक्ती आहे, त्याच गावांत मृत्यूनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार व्हावे, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. गावातील व्यक्तीच्या या अपेक्षेनुसार शहरी असो वा ग्रामीण भाग, प्रत्येक ठिकाणी एक स्मशानभूमी असणे अनिवार्य झाले आहे. असे असताना जिल्ह्यात स्मशानभूमिची समस्या डोके वर काढत आहे. अनेक गावांत स्मशानभूमिच्या जमिनीवरून वाद झाल्याचे दिसून आले आहे. काही गावांत तर गावाची शिव ओलांडून दुसऱ्या गावात जाऊन तेथे अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. यामुळे शासनाने प्रत्येक गावात अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमिची सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता जागेची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. काही गावांमध्ये स्मशानभूमिच्या जागेवरून वाद झाल्याचे समोर आले आहे. गावांत निर्माण होणारे हे तंटे सोडविण्याकरिता जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.अनेक गावात जमिनीची समस्यागाव तेथे स्मशानभूमी संकल्पनेला जागेचे ग्रहण लागल्याचे दिसून आले आहे. पूर्वी काही दानशूर व्यक्तींनी त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेतून स्मशानभूमिकरिता मोठ्या जमिनी दान दिल्या आहेत. तत्सम पत्रही ग्रामपंचायतीला दिले आहे. आता मात्र तसे होताना दिसत नाही. गावांची लोकसंख्या वाढत आहे. यामुळे गावांत स्मशानभूमी गरजेची असताना आता याकरिता कुणी जमिनी देण्याकरिता तयार नाहीत. शिवाय अशा भागातील ग्रामपंचायतीही याकरिता पुढाकार घेत नसल्याने बहुतांश गावांत जागा मिळेल तिथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.स्मशानभूमीला रस्त्यासह इतर सुविधाही पुरविण्याच्या सूचनास्मशानभूमी विकासाकरिता वर्धा जिल्ह्याला सुमारे सहा कोटी रुपये मिळाले आहेत. या निधीतून स्मशानभूमिकडे जाणारा रस्ता, शेड, पाण्याची व्यवस्था, येणाऱ्या व्यक्तींकरिता बसण्याची व्यवस्था आदी कामे करावयाची आहेत. या सूचनेनुसार जिल्ह्यातील २०४ गावांत कामे सुरू असल्याची माहिती आहे.एका स्मशानभूमिकरिता पूर्वी १० लाख रुपये देण्याच्या शासनाच्या सूचना होत्या. यात आता बदल करण्यात आला असून हा निधी वाढवून २० लाख रुपये करण्यात आला आहे. या निधीतून प्रत्येक गावातील स्मशानभूमीचे सौदर्यीकरण होणे अपेक्षित आहे.