शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शाळा फुलविण्यासाठी ‘सूर नवा, ध्यास नवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:10 IST

इंग्रजी शाळांकडे विद्यार्थ्यांची धाव असल्याने मराठी शाळा ओस पडत आहे. त्यामुळे यावर्षी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ‘सूर नवा, ध्यास नवा; जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश हवा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक शाळांनी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितीच्या सभापती जयश्री सुनिल गफाट यांनी केले आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचे अभियान : शाळापूर्व तयारीचे केले नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : इंग्रजी शाळांकडे विद्यार्थ्यांची धाव असल्याने मराठी शाळा ओस पडत आहे. त्यामुळे यावर्षी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ‘सूर नवा, ध्यास नवा; जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश हवा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक शाळांनी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितीच्या सभापती जयश्री सुनिल गफाट यांनी केले आहे.जिल्हा परिषदेच्या सभागृहात शाळापूर्व तयारी नियोजन सभा पार पडली. या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, समाजकल्याण समितीच्या सभापती नीता गजाम, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. एस. एन. पटवे, उपशिक्षणाधिकारी डॉ. वाल्मिक इंगोले, ज्येष्ठ अधिव्याख्याता मंजुषा औंढेकर, जिल्हा समन्वयक प्रशांत पवार यांची उपस्थिती होती. पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी कोणकोणते नवोपक्रम राबवावे व शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांची माहिती पालकांपर्यंत कशी पोहोचवावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.सोबतच नविन सत्र सुरु होण्याच्यापूर्वीच्या दिवशी कारावयाच्या कार्यवाहिबाबत पावर पॉर्इंट प्रेजेंटेशन करण्यात आले. प्राथमिक शिक्षण विभागाला नवीन बांधकामाकरिता ५ कोटी व दुरुस्तीकरता १ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच शाळांमध्ये पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. सर्व शाळांना भौमिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरु असून शाळांचे रुप बदलविण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही सभापती गफाट यांनी यावेळी सांगितले. या नियोजन सभेला सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आता २६ जूनच्या पहिल्या ठोक्याला शाळा काय कार्यक्रम घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.