शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

शाळा फुलविण्यासाठी ‘सूर नवा, ध्यास नवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:10 IST

इंग्रजी शाळांकडे विद्यार्थ्यांची धाव असल्याने मराठी शाळा ओस पडत आहे. त्यामुळे यावर्षी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ‘सूर नवा, ध्यास नवा; जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश हवा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक शाळांनी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितीच्या सभापती जयश्री सुनिल गफाट यांनी केले आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचे अभियान : शाळापूर्व तयारीचे केले नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : इंग्रजी शाळांकडे विद्यार्थ्यांची धाव असल्याने मराठी शाळा ओस पडत आहे. त्यामुळे यावर्षी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ‘सूर नवा, ध्यास नवा; जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश हवा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक शाळांनी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितीच्या सभापती जयश्री सुनिल गफाट यांनी केले आहे.जिल्हा परिषदेच्या सभागृहात शाळापूर्व तयारी नियोजन सभा पार पडली. या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, समाजकल्याण समितीच्या सभापती नीता गजाम, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. एस. एन. पटवे, उपशिक्षणाधिकारी डॉ. वाल्मिक इंगोले, ज्येष्ठ अधिव्याख्याता मंजुषा औंढेकर, जिल्हा समन्वयक प्रशांत पवार यांची उपस्थिती होती. पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी कोणकोणते नवोपक्रम राबवावे व शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांची माहिती पालकांपर्यंत कशी पोहोचवावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.सोबतच नविन सत्र सुरु होण्याच्यापूर्वीच्या दिवशी कारावयाच्या कार्यवाहिबाबत पावर पॉर्इंट प्रेजेंटेशन करण्यात आले. प्राथमिक शिक्षण विभागाला नवीन बांधकामाकरिता ५ कोटी व दुरुस्तीकरता १ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच शाळांमध्ये पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. सर्व शाळांना भौमिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरु असून शाळांचे रुप बदलविण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही सभापती गफाट यांनी यावेळी सांगितले. या नियोजन सभेला सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आता २६ जूनच्या पहिल्या ठोक्याला शाळा काय कार्यक्रम घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.