शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राबद्दल आवड निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:18 IST

विश्वाचे स्वरूप, ग्रह, तारे, नक्षत्र राशी आदींबाबत अजूनपर्यंत आपण सज्ञान झालो नाही. यामुळे जीवनात घडणाºया बºया-वाईट घटनांचा संबंध आकाशातील ग्रहताºयांशी जोडतो व आर्थिक, शारीरिक, मानसिक फसगत करून घेतो.

ठळक मुद्देहेमंत धानोरकर : अनेकांत स्वाध्याय मंदिरात नरेंद्र दाभोळकरांची ७१ वी जयंती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विश्वाचे स्वरूप, ग्रह, तारे, नक्षत्र राशी आदींबाबत अजूनपर्यंत आपण सज्ञान झालो नाही. यामुळे जीवनात घडणाºया बºया-वाईट घटनांचा संबंध आकाशातील ग्रहताºयांशी जोडतो व आर्थिक, शारीरिक, मानसिक फसगत करून घेतो. येणाºया पिढीला चिकित्सक आणि वैज्ञानिक बनवायचे असेल तर विद्यार्थ्यांमध्ये पालकांनी शिक्षकांनी, खगोलशास्त्राबद्दल आवड निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे, असे मत महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते तथा खगोल अभ्यासक हेमंत धानोरकर अंबेजोगाई यांनी व्यक्त केले.अनेकांत स्वाध्याय मंदिरात शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या ७१ व्या जयंतीनिमित्त विवेक जागर दिनी आयोजित ‘ग्रहगोल, तारे; समज गैरसमज, खगोलशास्त्र, ज्योतिष्यशास्त्र संबंध’ या विषयावरील पीपीटीद्वारे व्याख्यानात ते बोलत होते. मंचावर महा. अंनिसचे तालुकाध्यक्ष अरुण चवडे, डॉ. सिद्धार्थ बुटले, स्वावलंबीचे मुख्याध्यापक मनोज मोहता, राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार उपस्थित होते. धानोरकर यांनी विश्वाचे स्वरूप याबाबत माहिती देताना पृथ्वीपासून जस-जसे दूर जाऊ, तस-तसे मानवाचे अस्तित्व संपुष्टात येते; पण माणूस आपल्याच अहंकारात वावरतो. हे बदलणे गरजेचे आहे. पोपला ४०० वर्षानंतर जे कळले ते भारतीयांना अजून कळले नाही, असा टोला मारताना विद्यार्थ्यांनी इतर भेटवस्तू न घेता टेलिस्कोप वा दूर्बिनीसाठी आपल्या पालकांकडे आग्रह धरावा, असेही सांगितले. यावेळी त्यांनी ग्रह, तारे, नक्षत्र, राशी आदींचा कोणताही परिणाम मानवी जीवनावर होत नसून आपल्या अज्ञानापोटी ज्योतिषांचा धंदा जोरात चालतो. त्यामुळे आपण चिकित्सक होणे गरजेचे आहे. खगोलशास्त्र हा विषय वैज्ञानिक दृष्टीकोन देणारा आहे; पण त्याला ज्योतिष्यशास्त्राशी जोडून वैज्ञानिक दृष्टीकोन नष्ट केला जात आहे. याबाबत सावध होऊन विवेकी बनण्याचे आवाहन त्यांनी केले. शेवटी दुर्बिनीच्या साह्याने त्यांनी चंद्रावरील खड्डे उपस्थितांना दाखविलेत.भरत कोकावार यांनी अभिवादन गीत सादर केले. प्रास्ताविक गजेंद्र सुरकार यांनी केले तर परिचय सुनील ढाले यांनी करून दिला. संचालन कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी केले तर आभार सारिता डेहनकर यांनी मानले. कार्यक्रमाला अनिल मुर्डीव, राजेंद्र ढोबळे, पंकज इंगोले, प्रकाश जिंदे, सुनील सावध, प्रा. नूतन माळवी, अ‍ॅड. पूजा जाधव, धनंजय नाखले आदींनी सहकार्य केले.

मानवी जीवनाशी ग्रहगोलांचा संबंध जोडणे चुकीचेचमानव जसा पृथ्वीपासून दूर जातो, तसे त्याचे अस्तित्व नष्ट होते; पण मानवाचा अहंकार सुटत नाही. ग्रह, तारे, राशी आदींचा मानवी जीवनावर कधीही परिणाम होत नाही; पण खगोलशास्त्राला जोतिष्यशास्त्राशी जोडून वैज्ञानिक दृष्टीकोण नष्ट केला जात आहे. ग्रहगोलांचा संबंध मानवी जीवनाशी जोडणे चुकीचेच आहे.