शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

वायफड येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करा

By admin | Updated: August 22, 2016 00:36 IST

वायफड हे गाव जिल्हा परिषद सर्कल आहे. वायफड येथून पुलगाव पोलीस ठाणे १८ ते २० किमी अंतरावर आहे.

१३ गावांचा करता येईल समावेश : शेतकरी कामगार संघर्ष परिषदेचे पोलीस अधीक्षकांना साकडेवर्धा : वायफड हे गाव जिल्हा परिषद सर्कल आहे. वायफड येथून पुलगाव पोलीस ठाणे १८ ते २० किमी अंतरावर आहे. वर्धा पोलीस ठाणेही १८ ते २० किमी अंतरावर आहे. यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. वायफडशी परिसरातील १३ गावांचा संपर्क येत असल्याने येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करावी, अशी मागणी शेतकरी कामगार संघर्ष परिषदेने केली. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनही देण्यात आले.वायफड येथे पोलीस ठाण्याची निर्मिती झाल्यास परिसरातील १३ गावांचा समावेश करता येतो. यासत आमला, धामणगाव, वाठोडा, दहेगाव (मि.), अंबोडा, दहेगाव (स्टेशन), दहेगाव (गावंडे), केळापूर, कुरझडी (फोर्ट), लोनसावळी, शेकापूर, डोरली आदी गावांचा समावेश आहे. ही गावे वायफड पोलीस ठाण्याशी जोडल्यास तेथील नागरिकांना सोईस्कर होणार आहे. एवढ्या गावांसाठी नियमानुसार पोलीस ठाणे देता येत नसेल तर किमान पोलीस चौकी देण्यात यावी. चौकीमध्ये दोन बिट जमादार, दोन शिपाई, दोन महिला शिपाई असे सहा कर्मचाऱ्यांची चौकी द्यावी. यासाठी शासनाने स्वतंत्र इमारत बांधावी. वायफड ग्रा.पं. कडे चार ले-आऊटमध्ये चार ओपन स्पेस आहे. या जागेवर वडाळकर ले-आऊट वॉर्ड क्र. ४ मध्ये पोलीस चौकी वा ठाण्याचे बांधकाम होऊ शकते. वायफड ते कुरझडी या मार्गावर महिन्याकाठी एक ते दोन अपघात होतात. शिवाय दारूविक्री व अन्य अवैध व्यवसायही वाढलेले आहेत. त्यावर नियंत्रणाकरिताही पोलीस ठाणे वा चौकी निर्माण होणे गरजेचे आहे. सर्कलमध्ये मोठे गाव वायफड असल्याने पोलीस प्रशासन जनतेला सुरक्षेची हमी देऊ शकते. ही बाब लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देत पोलीस ठाणे वा चौकीची निर्मिती करवी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शेतकरी कामगार संघर्ष परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर निघोट, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर परबत, प्रेमदास शेंदरे, शोभा वानखेडे आणि पदाधिकारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)अवैध व्यवसायांवर आळा घालणे होईल शक्यवायफड पारधी बेडा दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध होता. शिवाय चोऱ्या व अवैध व्यवसायांचे प्रमाणही परिसरातील गावांमध्ये वाढल्याचे दिसून येते. या अवैध व्यवसायांवर आळा घालताना पुलगाव आणि वर्धा पोलीस ठाणे तसेच पोलीस यंत्रणेची दमछाक होते. वायफड येथे पोलीस ठाणे वा चौकीची निर्मिती झाल्यास अवैध व्यवसायांवर आळा घालणे शक्य होणार आहे. यामुळे ही मागणी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.