शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राम विकासासाठी कोअर टिम तयार करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:22 IST

जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रम आणि परिसराच्या विकासासाठी शासनाने १४४ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. या आराखड्याची अंमलबजावणी कालबद्धरितीने व दर्जात्मक पद्धतीने होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांची कोअर टीम तयार करावी, अशा सूचना अर्थमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : सह्याद्री अतिथीगृहात पार पडली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रम आणि परिसराच्या विकासासाठी शासनाने १४४ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. या आराखड्याची अंमलबजावणी कालबद्धरितीने व दर्जात्मक पद्धतीने होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांची कोअर टीम तयार करावी, अशा सूचना अर्थमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीला खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सेवाग्राम आश्रमाचे शेख हुसैन, संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. महात्मा गांधी यांच्या २ आॅक्टोबर २०१९ रोजीच्या जयंतीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधीजींच्या विचारांवर आधारित १५० कार्यक्रमांचे आयोजन राज्यात केले जाणार आहे. महात्मा गांधीजी सेवाग्राम मध्ये १०३० ते १९४८ या प्रदीर्घ कालावधीसाठी वास्तव्यास होते. या आश्रमात त्यांनी अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले. त्याच्या १५० व्या जयंती निमित्ताने त्यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सेवाग्रामचा विकास व्हावा, महात्मा गांधीजींच्या विचारांचे पाईक असलेल्या जगभरातील त्यांच्या अनुयायांना मार्गदर्शनाचे एक उत्कृष्ट केंद्र या माध्यमातून विकसित व्हावे, यादृष्टीने सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यात आणखी कोणत्या नावीन्यपूर्ण योजना किंवा उपक्रम राबविता येतील याचा विचार केला जावा, यात लोकांची मते मागविण्यात यावीत, असे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.मंजूर आराखड्यापैकी मार्च २०१८ पर्यंत ८५.१२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. तर सन २०१८-१९ या वर्षात २६.०८ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. या आराखड्यात अनेक उपक्रम समाविष्ट करण्यात आले आहे.यामध्ये सेवाग्राम परिसरामध्ये अंगुरीबागेजवळ १००० व्यक्तींसाठी सभागृह, अभ्यासकेंद्र, सुसज्ज ग्रंथालय, यात्री निवास परिसरात निवासी कॉटेजचे बांधकाम, यात्री निवास येथे ४ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, कस्तुरबा चौक ते आश्रम या रस्त्याची सुधारणा, कंपाऊंड वॉल, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे, माहिती केंद्र, बुटी बोरी जंक्शन ते वर्धा व सेवाग्राम या मार्गावर वृक्ष लागवड, सेवाग्राम, वर्धा आणि पवनार विभागातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांचा विकास, हेरिटेल ट्रेलची उभारणी, पवनार येथील दिल्ली गेट आणि परिसराचे संवर्धन अशा विविध कामांचा यात समावेश असल्याचे याप्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार