शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गांधी विचार जनमानसात पोहचविणारा बिहारमधील अवलिया सेवाग्राममध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 10:36 IST

सेवाग्राम येथे सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या परिसरात शुक्रवार २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या सर्व सेवासंघाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनासाठी बिहारातील एक गांधी विचारांनी भारलेला कार्यकर्ता गुरुवारी रात्री दाखल झाला.

ठळक मुद्देआयुष्यभर गांधीविचारांसाठी केली पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: सेवाग्राम येथे सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या परिसरात शुक्रवार २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या सर्व सेवासंघाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनासाठी बिहारातील एक गांधी विचारांनी भारलेला कार्यकर्ता गुरुवारी रात्री दाखल झाला. भागलपूर बिहार येथील ५१ वर्षीय गांधी विजय कुमार सिंग धावक हा अविलया पारंपरिक वेषात आणि भारताचा राष्ट्रध्वज घेऊन सर्वोदय समाज संमेलनात सहभागी होण्यासाठी आश्रमात आला आहे.हा अवलिया गेल्या ३५ वर्षापासून गांधीजीचे विचार, कार्य आणि भारत मातेचा जयघोष करीत राष्ट्रध्वजाचा सन्मान करा, देशाला राष्ट्रभक्तांच्या त्यागातून स्वराज्य मिळाले त्याचे स्मरण करून देशाच्या एकता, अखंडता, विकास आणि स्वच्छतेसाठी झटा असे देशात फिरून प्रबोधनाचे कार्य करीत आहे. ते स्वत:ला सर्वोदयी आणि गांधी भक्त मानतात. म्हणून त्यांनी स्वत:चे नाव गांधी विजय कुमार यादव धावक असे ठेवले. धावक हे नाव पण त्यांनी जोडले. त्या मागील कारण सांगितले ते असे की, ते शाळा, महाविद्यालयात धाव स्पर्धेत सहभागी होत असत. त्यांनी मॅरेथॉन स्पर्धेत पण भाग घेतला होता. १९९० मध्ये राजीव गांधी भागलपूरला सदभावना यात्रेसाठी आले होते. त्यात मी ही सहभागी होऊन धावलो. राजीव गांधीनी मला पाहिले व गाडीवर बोलावून गळयात हार टाकून सन्मानित केले, असे विजय कुमार यांनी सांगितले.ते म्हणाले मी नॅशनल युथ प्रोजेक्टचे प्रमुख डॉ. सुब्बारावजी यांना खूप मानतो. त्यांच्या आणि सर्वोदयाच्या प्रत्येक शिबिरे आणि संमेलनात सहभागी होतो.अरूणाचल प्रदेशातील दुर्गम भागात त्यांनी प्रवास केला. चंपारण्यमध्ये फिरलो आहे. भीती हा शब्द त्यांना माहित नाही.ते म्हणाले गांधीवाद्यांनी युवकांना संधी दिली पाहिजे. गांधीवाद गावागावात पोहचला पाहिजे. तेव्हाच हा देश खऱ्या अर्थाने विकास पावेल. मी जगतो देश व तिरंग्यासाठी. म्हणूनच तिरंगा फडकवत सन्मानाने देशभर फिरत आहे.संमेलन संपल्यानंतर ते हरियाणासाठी रवाना होणार आहे. ते अविवाहित असून जनता त्यांना आर्थिक मदत करत असते. ते एल.एल.बी झाले असून पैसा व नोकरीसाठी कधीच धडपड केली नाही.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSewagramसेवाग्राम