शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

नैसर्गिकरीत्या उगविलेल्या रोपट्यांना जगविण्याचा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:14 IST

जिभेचे चोचले भागविण्यासाठी आपण ऋृतूमानाप्रमाणे आंबा, जांभूळ, बोर, सिताफळ, दाळींब,पपई, पेरु, चिकू व बदाम आदी फळांचा आस्वाद घेतो. त्यानंतर त्या फळांमधील घुया (बिया/कोय) इतरत्र फेकून देतो. त्यामुळे गावातील रस्ता-नाल्याच्या कडेला तसेच खतांच्या ढिगाºयावर त्या घुयांपासून विविध रोपटे नैसर्गिकरित्या उगवितात.

ठळक मुद्देवृक्षमित्रांचा अनोखा उपक्रम : खतांच्या ढिगाऱ्यावरुन गोळा केली रोपटी

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर: एकीकडे वृक्षारोपणाकरिता महागडे रोपटे खरेदी करुन त्याचे रोपण केले जाते तर दुसरीकडे नैसर्गिकरित्या उगविणाºया विविध फळांच्या झाडांकडे दुर्लक्ष केले जाते. आता अल्लीपूर येथील काही वृक्षमित्रांनी एकत्र येत नैसर्गिकरित्या उगविलेल्या रोपट्यांना जगविण्याचा ध्यास घेतला असून जवळपास १६५ रोपटे ठिकठिकाणाहून गोळा केली आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाने इतरांनाही नवीन शिकवण दिली आहे.जिभेचे चोचले भागविण्यासाठी आपण ऋृतूमानाप्रमाणे आंबा, जांभूळ, बोर, सिताफळ, दाळींब,पपई, पेरु, चिकू व बदाम आदी फळांचा आस्वाद घेतो. त्यानंतर त्या फळांमधील घुया (बिया/कोय) इतरत्र फेकून देतो. त्यामुळे गावातील रस्ता-नाल्याच्या कडेला तसेच खतांच्या ढिगाºयावर त्या घुयांपासून विविध रोपटे नैसर्गिकरित्या उगवितात. त्यांचे योग्य संगोपण होत नसल्याने कालांतराने ते रोपटे जागेवरच वाळून नाहिसे होतात.अशा रोपट्यांना जगविण्यासाठी अल्लीपुरातील वृक्षमित्रांनी धडपड चालविली आहे. त्यांनी गावातील प्रत्येक रस्त्यांनी फेरफटका मारुन खताच्या ढिगाºयावरुन नैसर्गिकरित्या उगविलेले रोपटे गोळा केलेत. पहिल्याच दिवशी त्यांनी १६८ रोपटे गोळा केले असून त्या रोपट्यांना प्लास्टीकच्या पिशवीत माती व खताचे मिश्रण करुन लावले आहे.गावातील प्रत्येक भागात फिरुन नैसर्गिकरित्या उगविलेले रोपटे गोळा करण्याचा उपक्र म सातत्याने राबवून गोळा झालेले रोपटे प्लास्टीकच्या पिशवीत लावून त्यांचे काही दिवस संगोपण केल्यानंतर ते ठिकठिकाणी लावले जाणार आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी वृक्षमित्र व निसर्गमित्र पुरस्कार प्राप्त निलेश धोंगडे यांच्यासह आकाश पडोळे, केतन हिंगे व आशिष राऊत परिश्रम घेत आहे.वर्षभरानंतर करणार रोपणवृक्षमित्रांनी पहिल्याच दिवशी १६८ झाडे गोळा केली आहेत. त्यामध्ये आंब्याचे ६०, जांभळाचे ६६, बदामाचे ४१ आणि पिंपळाच्या एका रोपट्याचा समावेश आहे. ही रोपटे प्लास्टिकच्या पिशवीत एका वर्षापर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यानंतर विविध उपक्रमाच्या माध्यमातून हे रोपटे लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचे रोपण केले जाणार आहे. यामुळे रोपट्यावरील खर्चात बचत होऊन वृक्षसंवर्धनाच्या कार्याला हातभार लागणार आहे.

टॅग्स :Natureनिसर्ग