शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
5
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
6
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
7
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
8
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
9
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
10
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
11
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
12
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
13
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
14
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
15
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
16
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

नैसर्गिकरीत्या उगविलेल्या रोपट्यांना जगविण्याचा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:14 IST

जिभेचे चोचले भागविण्यासाठी आपण ऋृतूमानाप्रमाणे आंबा, जांभूळ, बोर, सिताफळ, दाळींब,पपई, पेरु, चिकू व बदाम आदी फळांचा आस्वाद घेतो. त्यानंतर त्या फळांमधील घुया (बिया/कोय) इतरत्र फेकून देतो. त्यामुळे गावातील रस्ता-नाल्याच्या कडेला तसेच खतांच्या ढिगाºयावर त्या घुयांपासून विविध रोपटे नैसर्गिकरित्या उगवितात.

ठळक मुद्देवृक्षमित्रांचा अनोखा उपक्रम : खतांच्या ढिगाऱ्यावरुन गोळा केली रोपटी

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर: एकीकडे वृक्षारोपणाकरिता महागडे रोपटे खरेदी करुन त्याचे रोपण केले जाते तर दुसरीकडे नैसर्गिकरित्या उगविणाºया विविध फळांच्या झाडांकडे दुर्लक्ष केले जाते. आता अल्लीपूर येथील काही वृक्षमित्रांनी एकत्र येत नैसर्गिकरित्या उगविलेल्या रोपट्यांना जगविण्याचा ध्यास घेतला असून जवळपास १६५ रोपटे ठिकठिकाणाहून गोळा केली आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाने इतरांनाही नवीन शिकवण दिली आहे.जिभेचे चोचले भागविण्यासाठी आपण ऋृतूमानाप्रमाणे आंबा, जांभूळ, बोर, सिताफळ, दाळींब,पपई, पेरु, चिकू व बदाम आदी फळांचा आस्वाद घेतो. त्यानंतर त्या फळांमधील घुया (बिया/कोय) इतरत्र फेकून देतो. त्यामुळे गावातील रस्ता-नाल्याच्या कडेला तसेच खतांच्या ढिगाºयावर त्या घुयांपासून विविध रोपटे नैसर्गिकरित्या उगवितात. त्यांचे योग्य संगोपण होत नसल्याने कालांतराने ते रोपटे जागेवरच वाळून नाहिसे होतात.अशा रोपट्यांना जगविण्यासाठी अल्लीपुरातील वृक्षमित्रांनी धडपड चालविली आहे. त्यांनी गावातील प्रत्येक रस्त्यांनी फेरफटका मारुन खताच्या ढिगाºयावरुन नैसर्गिकरित्या उगविलेले रोपटे गोळा केलेत. पहिल्याच दिवशी त्यांनी १६८ रोपटे गोळा केले असून त्या रोपट्यांना प्लास्टीकच्या पिशवीत माती व खताचे मिश्रण करुन लावले आहे.गावातील प्रत्येक भागात फिरुन नैसर्गिकरित्या उगविलेले रोपटे गोळा करण्याचा उपक्र म सातत्याने राबवून गोळा झालेले रोपटे प्लास्टीकच्या पिशवीत लावून त्यांचे काही दिवस संगोपण केल्यानंतर ते ठिकठिकाणी लावले जाणार आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी वृक्षमित्र व निसर्गमित्र पुरस्कार प्राप्त निलेश धोंगडे यांच्यासह आकाश पडोळे, केतन हिंगे व आशिष राऊत परिश्रम घेत आहे.वर्षभरानंतर करणार रोपणवृक्षमित्रांनी पहिल्याच दिवशी १६८ झाडे गोळा केली आहेत. त्यामध्ये आंब्याचे ६०, जांभळाचे ६६, बदामाचे ४१ आणि पिंपळाच्या एका रोपट्याचा समावेश आहे. ही रोपटे प्लास्टिकच्या पिशवीत एका वर्षापर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यानंतर विविध उपक्रमाच्या माध्यमातून हे रोपटे लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचे रोपण केले जाणार आहे. यामुळे रोपट्यावरील खर्चात बचत होऊन वृक्षसंवर्धनाच्या कार्याला हातभार लागणार आहे.

टॅग्स :Natureनिसर्ग