शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

रोजीच्या ओझ्याने कापूस उत्पादकांची कंबरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:32 IST

जिल्ह्यातील शेतकºयांचे मुख्य पीक म्हणून कापसाची ओळख आहे. शेतकºयांच्या या पांढºया सोन्याबाबत शासन नेहमीच उदासिन असल्याने आज कापूस उत्पादक अडचणीत आला आहे.

ठळक मुद्देकिलोची पद्धत कालबाह्य : शेतमाल निघण्याच्या काळात आलेल्या लाल्यामुळे उत्पादनाची हमी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकºयांचे मुख्य पीक म्हणून कापसाची ओळख आहे. शेतकºयांच्या या पांढºया सोन्याबाबत शासन नेहमीच उदासिन असल्याने आज कापूस उत्पादक अडचणीत आला आहे. दराबाबत शासनाची असलेली उदासिनता व इतर देशांप्रमाणे नसलेल्या अनुदानामुळे कापूस उत्पादक चांगलाच अडचणीत आला. यात आणखी अडचण म्हणून वेचणीचा वाढता खर्च कापूस उत्पादकांची कंबर मोडणारा ठरत आहे. मजुरांनी कापूस वेचणीच्या मजुरीच्या पद्धतीत बदल केला आहे. या प्रकारामुळे कापूस उत्पादकांवर भुर्दंड वाढत आहे. या भुर्दंडापोटी शेतकºयांची कंबर मोडल्याचे दिसत आहे. वाढती मजुरी आणि मिळत असलेला अत्यल्प दर यामुळे शेतातून कापूस काढावा अथवा नाही याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. या मजुरीत पूर्वी वजनाची तर आता रोजीची पद्धत आली आहे. यामुळे शेतकºयाची चांगलीच कंबर मोडली आहे. यातही मजुरांना रोख मजुरी देण्यात येत असल्याने त्याची व्यवस्था शेतकºयांना पहिले करावी लागते. यात यंदा कृषी कर्जाची उचल झाली नसल्याने मजुरीची रक्कम देण्याकरिता शेतकºयांना सावकाराची पायरी चढावी लागल्याचे वास्तव आहे. यामळे यंदाचा खरीप शेतकºयांकरिता तोट्याचा आणि त्रासाचाच असल्याचे दिसून आले आहे.कापूस वेचणी ८ ते १० रुपये किलोगौरव देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (निपाणी) : शेतकºयांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाची आवक बाजारात सुरू झाली आहे. हेच पांढरे सोने शेतातून बाजारात आणताना मात्र शेतकºयाची चांगलीच कंबर मोडत असल्याचे दिसून आले आहे. कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने आठ ते दहा रुपये प्रति किलो प्रमाणे दर द्यावे लागत आहे. यामुळे मजुरांचे सुगीचे दिवस असले तरी शेतकºयांचे मात्र दिवाळे निघाले आहे.वर्धा तालुक्यात जवळपास ६५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. यामुळे शेतकरी आता मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी आणत आहेत. हा कापूस व्यापारी मागेल त्या भावात शेतकºयांना कापूस विकावा लागत आहे. शेतकºयांचा कापूस उभ्या गाडीला भाव देतात व खाली टाकल्यानंतर वेगळा भाव दिल्या जात आहे. यात शेतकºयांना याचा मोठ्या प्रमाणात त्रासही होत आहे. कापूस लागवडीपासून ते वेचणी करून घरात आणेपर्यंत शेतकºयांना पैसा ओतावा लागतो. मात्र बाजारात बेभाव विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक झळ सहन करावी लागत असून शेतकºयांचे दिवाळे निघत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त या भागात शेतकºयांना आधार देण्याची गरज आहे.वेचणीकरिता करावी लागते वेगळीच कसरतकापूस शेतातून घरी आणण्याकरिता शेतकºयांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. मजूर मिळविण्यापासून ते त्यांची वेचलेला कापूस घरी आणत पर्यंत शेतकºयाला मोठी कसरत करावी लागते. यातही कालानुरूप मोठमोठे बदल घडत आहेत. पूर्वी कापूस वेचणाºया महिलेला किलोनुसार मोबदला मिळत होता. यात मजूर महिला जास्तीत जास्त कापूस वेचण्याचा प्रयत्न करीत होती. आता ही पद्धत कालबाह्य झाली आहे. वजनाची पद्धत कालबाह्य झाली असून रोजंदारीची पद्धत आली आहे. या रोजंदारीत एका दिवसात ही महिला त्याच वजनाचा कापूस वेचत आहे. पूर्वी मिळणारा कापसाच्या वजनाचा मोबदला आणि आत मिळणारा रोजीच्या काळात मिळणारा मोबदला वाढला आहे. तेवढाचा कापूस वेचणाºया महिलेला सुमारे १०० रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहे. यात शेतकºयांची मोठी अडचण झाली आहे.