शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

रोजीच्या ओझ्याने कापूस उत्पादकांची कंबरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:32 IST

जिल्ह्यातील शेतकºयांचे मुख्य पीक म्हणून कापसाची ओळख आहे. शेतकºयांच्या या पांढºया सोन्याबाबत शासन नेहमीच उदासिन असल्याने आज कापूस उत्पादक अडचणीत आला आहे.

ठळक मुद्देकिलोची पद्धत कालबाह्य : शेतमाल निघण्याच्या काळात आलेल्या लाल्यामुळे उत्पादनाची हमी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकºयांचे मुख्य पीक म्हणून कापसाची ओळख आहे. शेतकºयांच्या या पांढºया सोन्याबाबत शासन नेहमीच उदासिन असल्याने आज कापूस उत्पादक अडचणीत आला आहे. दराबाबत शासनाची असलेली उदासिनता व इतर देशांप्रमाणे नसलेल्या अनुदानामुळे कापूस उत्पादक चांगलाच अडचणीत आला. यात आणखी अडचण म्हणून वेचणीचा वाढता खर्च कापूस उत्पादकांची कंबर मोडणारा ठरत आहे. मजुरांनी कापूस वेचणीच्या मजुरीच्या पद्धतीत बदल केला आहे. या प्रकारामुळे कापूस उत्पादकांवर भुर्दंड वाढत आहे. या भुर्दंडापोटी शेतकºयांची कंबर मोडल्याचे दिसत आहे. वाढती मजुरी आणि मिळत असलेला अत्यल्प दर यामुळे शेतातून कापूस काढावा अथवा नाही याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. या मजुरीत पूर्वी वजनाची तर आता रोजीची पद्धत आली आहे. यामुळे शेतकºयाची चांगलीच कंबर मोडली आहे. यातही मजुरांना रोख मजुरी देण्यात येत असल्याने त्याची व्यवस्था शेतकºयांना पहिले करावी लागते. यात यंदा कृषी कर्जाची उचल झाली नसल्याने मजुरीची रक्कम देण्याकरिता शेतकºयांना सावकाराची पायरी चढावी लागल्याचे वास्तव आहे. यामळे यंदाचा खरीप शेतकºयांकरिता तोट्याचा आणि त्रासाचाच असल्याचे दिसून आले आहे.कापूस वेचणी ८ ते १० रुपये किलोगौरव देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (निपाणी) : शेतकºयांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाची आवक बाजारात सुरू झाली आहे. हेच पांढरे सोने शेतातून बाजारात आणताना मात्र शेतकºयाची चांगलीच कंबर मोडत असल्याचे दिसून आले आहे. कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने आठ ते दहा रुपये प्रति किलो प्रमाणे दर द्यावे लागत आहे. यामुळे मजुरांचे सुगीचे दिवस असले तरी शेतकºयांचे मात्र दिवाळे निघाले आहे.वर्धा तालुक्यात जवळपास ६५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. यामुळे शेतकरी आता मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी आणत आहेत. हा कापूस व्यापारी मागेल त्या भावात शेतकºयांना कापूस विकावा लागत आहे. शेतकºयांचा कापूस उभ्या गाडीला भाव देतात व खाली टाकल्यानंतर वेगळा भाव दिल्या जात आहे. यात शेतकºयांना याचा मोठ्या प्रमाणात त्रासही होत आहे. कापूस लागवडीपासून ते वेचणी करून घरात आणेपर्यंत शेतकºयांना पैसा ओतावा लागतो. मात्र बाजारात बेभाव विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक झळ सहन करावी लागत असून शेतकºयांचे दिवाळे निघत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त या भागात शेतकºयांना आधार देण्याची गरज आहे.वेचणीकरिता करावी लागते वेगळीच कसरतकापूस शेतातून घरी आणण्याकरिता शेतकºयांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. मजूर मिळविण्यापासून ते त्यांची वेचलेला कापूस घरी आणत पर्यंत शेतकºयाला मोठी कसरत करावी लागते. यातही कालानुरूप मोठमोठे बदल घडत आहेत. पूर्वी कापूस वेचणाºया महिलेला किलोनुसार मोबदला मिळत होता. यात मजूर महिला जास्तीत जास्त कापूस वेचण्याचा प्रयत्न करीत होती. आता ही पद्धत कालबाह्य झाली आहे. वजनाची पद्धत कालबाह्य झाली असून रोजंदारीची पद्धत आली आहे. या रोजंदारीत एका दिवसात ही महिला त्याच वजनाचा कापूस वेचत आहे. पूर्वी मिळणारा कापसाच्या वजनाचा मोबदला आणि आत मिळणारा रोजीच्या काळात मिळणारा मोबदला वाढला आहे. तेवढाचा कापूस वेचणाºया महिलेला सुमारे १०० रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहे. यात शेतकºयांची मोठी अडचण झाली आहे.