शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

रोजीच्या ओझ्याने कापूस उत्पादकांची कंबरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:32 IST

जिल्ह्यातील शेतकºयांचे मुख्य पीक म्हणून कापसाची ओळख आहे. शेतकºयांच्या या पांढºया सोन्याबाबत शासन नेहमीच उदासिन असल्याने आज कापूस उत्पादक अडचणीत आला आहे.

ठळक मुद्देकिलोची पद्धत कालबाह्य : शेतमाल निघण्याच्या काळात आलेल्या लाल्यामुळे उत्पादनाची हमी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकºयांचे मुख्य पीक म्हणून कापसाची ओळख आहे. शेतकºयांच्या या पांढºया सोन्याबाबत शासन नेहमीच उदासिन असल्याने आज कापूस उत्पादक अडचणीत आला आहे. दराबाबत शासनाची असलेली उदासिनता व इतर देशांप्रमाणे नसलेल्या अनुदानामुळे कापूस उत्पादक चांगलाच अडचणीत आला. यात आणखी अडचण म्हणून वेचणीचा वाढता खर्च कापूस उत्पादकांची कंबर मोडणारा ठरत आहे. मजुरांनी कापूस वेचणीच्या मजुरीच्या पद्धतीत बदल केला आहे. या प्रकारामुळे कापूस उत्पादकांवर भुर्दंड वाढत आहे. या भुर्दंडापोटी शेतकºयांची कंबर मोडल्याचे दिसत आहे. वाढती मजुरी आणि मिळत असलेला अत्यल्प दर यामुळे शेतातून कापूस काढावा अथवा नाही याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. या मजुरीत पूर्वी वजनाची तर आता रोजीची पद्धत आली आहे. यामुळे शेतकºयाची चांगलीच कंबर मोडली आहे. यातही मजुरांना रोख मजुरी देण्यात येत असल्याने त्याची व्यवस्था शेतकºयांना पहिले करावी लागते. यात यंदा कृषी कर्जाची उचल झाली नसल्याने मजुरीची रक्कम देण्याकरिता शेतकºयांना सावकाराची पायरी चढावी लागल्याचे वास्तव आहे. यामळे यंदाचा खरीप शेतकºयांकरिता तोट्याचा आणि त्रासाचाच असल्याचे दिसून आले आहे.कापूस वेचणी ८ ते १० रुपये किलोगौरव देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (निपाणी) : शेतकºयांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाची आवक बाजारात सुरू झाली आहे. हेच पांढरे सोने शेतातून बाजारात आणताना मात्र शेतकºयाची चांगलीच कंबर मोडत असल्याचे दिसून आले आहे. कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने आठ ते दहा रुपये प्रति किलो प्रमाणे दर द्यावे लागत आहे. यामुळे मजुरांचे सुगीचे दिवस असले तरी शेतकºयांचे मात्र दिवाळे निघाले आहे.वर्धा तालुक्यात जवळपास ६५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. यामुळे शेतकरी आता मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी आणत आहेत. हा कापूस व्यापारी मागेल त्या भावात शेतकºयांना कापूस विकावा लागत आहे. शेतकºयांचा कापूस उभ्या गाडीला भाव देतात व खाली टाकल्यानंतर वेगळा भाव दिल्या जात आहे. यात शेतकºयांना याचा मोठ्या प्रमाणात त्रासही होत आहे. कापूस लागवडीपासून ते वेचणी करून घरात आणेपर्यंत शेतकºयांना पैसा ओतावा लागतो. मात्र बाजारात बेभाव विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक झळ सहन करावी लागत असून शेतकºयांचे दिवाळे निघत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त या भागात शेतकºयांना आधार देण्याची गरज आहे.वेचणीकरिता करावी लागते वेगळीच कसरतकापूस शेतातून घरी आणण्याकरिता शेतकºयांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. मजूर मिळविण्यापासून ते त्यांची वेचलेला कापूस घरी आणत पर्यंत शेतकºयाला मोठी कसरत करावी लागते. यातही कालानुरूप मोठमोठे बदल घडत आहेत. पूर्वी कापूस वेचणाºया महिलेला किलोनुसार मोबदला मिळत होता. यात मजूर महिला जास्तीत जास्त कापूस वेचण्याचा प्रयत्न करीत होती. आता ही पद्धत कालबाह्य झाली आहे. वजनाची पद्धत कालबाह्य झाली असून रोजंदारीची पद्धत आली आहे. या रोजंदारीत एका दिवसात ही महिला त्याच वजनाचा कापूस वेचत आहे. पूर्वी मिळणारा कापसाच्या वजनाचा मोबदला आणि आत मिळणारा रोजीच्या काळात मिळणारा मोबदला वाढला आहे. तेवढाचा कापूस वेचणाºया महिलेला सुमारे १०० रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहे. यात शेतकºयांची मोठी अडचण झाली आहे.