शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

३० हजार ५०० हेक्टरमध्ये होणार कपाशीची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 05:00 IST

चालू आठवड्यात देवळी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने रविवारी सायंकाळी तर गुरुवारी दोन दिवस जोरदार हजेरी लावली. रोहिणी नक्षत्रात बरसलेल्या पूर्व मौसमी पावसाने बळीराजा सुखावल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी शिवारात लगबग वाढली आहे. ऊन-सावल्यांच्या खेळात आभाळाच्या छताखाली बळीराजा दिवस उजाडल्यापासून मावळेपर्यंत घाम गाळताना दिसत आहे.

ठळक मुद्देसोयाबीनच्या क्षेत्रात घट; तुरीची पेरा वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : रोहिणी नक्षत्राच्या पावसानंतर शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला आहे. अनेक संकटांची टांगती तलवार डोक्यावर घेऊन शेतकरी पुन्हा नव्या जोमाने तयारीला लागला आहे. देवळी तालुक्यात सुमारे ५८  हजार ३० हेक्टर खरिपाचे लागवड क्षेत्र आहे. त्यापैकी या हंगामात ३० हजार ५००  हेक्‍टरमधे कापूस लागवड केली जाणार आहे. तर १८  हजार  २५०  हेक्टर सोयाबीन आणि ९ हजार  २५०  हेक्‍टरमध्ये तूर लागवड तर उर्वरित क्षेत्रात इतर पीक लागवडीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.चालू आठवड्यात देवळी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने रविवारी सायंकाळी तर गुरुवारी दोन दिवस जोरदार हजेरी लावली. रोहिणी नक्षत्रात बरसलेल्या पूर्व मौसमी पावसाने बळीराजा सुखावल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी शिवारात लगबग वाढली आहे. ऊन-सावल्यांच्या खेळात आभाळाच्या छताखाली बळीराजा दिवस उजाडल्यापासून मावळेपर्यंत घाम गाळताना दिसत आहे.मृग नक्षत्र आणि शेतकरी हे खरीप हंगामाचे समीकरण बनले आहे. मृगापासून खरीप हंगामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. येणाऱ्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र ठरते. परंतु, गेल्या काही वर्षापासून कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडतोच. त्याचबरोबर अवकाळीचे अरिष्ट आणि सरकारची वक्रदृष्टी शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे. दरवर्षी येणारा हंगाम शेतकऱ्यांची उमेद जागवतो खरी, परंतु त्याचबरोबर अनेक प्रश्नांची मालिका सोबत घेऊन येतो. शेतकऱ्यांमागचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपत नाही. कोरोनाने तर दीड वर्ष झाली बळीराजाला जगणे कठीण करून ठेवले आहे. शेतात पिकले तरी बाजारपेठेची चिंता काही पाठ सोडत नाही. मागील वर्षी सोयाबीन पीक अतिवृष्टीने नेस्तनाबूत केले. कपाशीला बोंडसड व बोंडअळीने खाल्ले. तर लाॅकडाऊनमुळे आता अनेकांनी उभ्या पिकात ट्रॅक्टर घातले, नांगर चालविला. दरम्यान आर्थिक कोंडीत सापडलेला बळीराजा विविध संकटांची टांगती तलवार डोक्यावर घेऊन  यंदा चांगला पाऊस होईल आणि उत्पादन भरभरून येईल या आशेने खरिपाच्या तयारीला लागले असून पेरणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 

गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकावर  विविध  रोगांचे आक्रमण झाले होते. परिणामी, तालुक्यातील सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट आली. यंदाच्या खरीप हंगामात कपाशीच्या लागवड क्षेत्रात काही प्रमाणात वाढ होईल तर सोयाबीन क्षेत्रात घट येण्याची शक्यता आहे. तर तुरीच्या क्षेत्रात वाढ निश्चित आहे.- अश्विनी कुंभार, तालुका कृषी अधिकारी देवळी. 

 

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती