शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

‘अनरजिस्टर्ड’ वाहनांतून कापसाची वाहतूक

By admin | Updated: January 1, 2017 02:04 IST

कापूस वेचनीचा हंगाम जोमात सुरू आहे. शेतकऱ्यांचा कापूस घरी येत असून बहुतांश शेतकरी आपला कापूस

नुकसानाची शक्यता : शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे वर्धा : कापूस वेचनीचा हंगाम जोमात सुरू आहे. शेतकऱ्यांचा कापूस घरी येत असून बहुतांश शेतकरी आपला कापूस मिळेल त्या वाहनांतून कृषी उत्पन्न बाजार समिती, जिनिंग वा अन्य व्यापाऱ्यांकडे घेऊन जातात; पण यात कमी वाहतूक भाडे आकारून ‘अनरजिस्टर्ड’ वाहने कापसाची वाहतूक करीत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याकडे लक्ष देत संबंधित विभागाने लक्ष देत कार्यवाही करणे व शेतकऱ्यांनीही काळजी घेणे गरजेचे झाले आहे. सध्या कापूस वेचनीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पहिली वेचनी आटोपली असून आणखी वेचनीची कामे हाती घेण्यात आली आहेत. वेचलेला कापूस शेतकऱ्यांकडून विक्रीसाठी नेला जात आहे. यात शेतकऱ्यांना वाहतुकीचा मोठा खर्च करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. हा खर्च कसा कमी करता येईल, याचा विचार शेतकरी करीत असतात. नेमका याचाच फायदा घेत मालवाहु वाहन धारक शेतकऱ्यांना कुठलीही वाहने उपलब्ध करून देत त्यांना धोक्यात घालत असल्याचे दिसते. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुठलेही नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्याची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामध्ये नोंदणी करणे अनिवार्य असते. नोंदणी होईस्तोवर या वाहनांना विमा वा अन्य परवाने लागू होत नाहीत. वाहनांचा क्रमांक आणि नोंदणी झाल्याबाबत वाहनाचे आरसी बुक प्राप्त झाल्यानंतर वाहतूक परवाना लागू होतो; पण जिल्ह्यात बहुतांश मालवाहु वाहने वाहतूक परवाना मिळण्यापूर्वीच माल वाहतुकीस प्रारंभ करीत असल्याचे आढळून आले आहे. वाहन खरेदी केल्यानंतर लगेच ते कामी लावले जात असल्याने या प्रकारांत वाढ झाली आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मोठ्या संख्येने मालवाहु वाहनांतून शेतकऱ्यांना कापूस आणला जात आहे. यातील अर्ध्यापेक्षा जास्त वाहने विना क्रमांकाची, नवीन आणि वाहतूक परवाना नसलेली आढळून येतात. ही बाब शेतकऱ्यांसाठीच नुकसानदायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाहतूक परवाना नसलेल्या विना क्रमांकाच्या वाहनांना अपघात झाला तर त्यांना कुठल्याही प्रकारचे विम्याचे संरक्षण मिळत नाही. शिवाय वाहतूक परवाना नसल्याने उलट वाहन धारकांवरच कारवाईची तरतूद असते. यात वाहनात भरलेल्या कापसालाही कुठलेच संरक्षण मिळत नाही. यात वाहन धारकासह शेतकऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे शेतकऱ्यांनी वाहतूक करताना काळजी घेणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी) वाहतूक पोलीस व आरटीओने लक्ष देणे गरजेचे वाहतुकीचा परवाना नसलेल्या वाहनांना कुठल्याही प्रकारच्या सवलती प्राप्त होत नाहीत. परवाना असलेल्या वाहनांनाच वातूक करता येते. असे असले तरी क्रमांक नसलेली आणि परवाना प्राप्त व्हायची असलेल्या वाहनांतूनही मोठ्या प्रमाणात माल वाहून नेला जात असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार कापसाच्या वाहतुकीमध्ये अधिक घडत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्च कमी करायचा असतो आणि वाहनांच्या परवान्याबाबत तितकीसी माहिती नसते. नेमका याचाच फायदा घेत हा प्रकार केला जात असल्याचे दिसते. वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. अपघात झाल्यास भरपाईची शाश्वती नाही कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खासगी व्यापाऱ्यांकडे येत असलेला कापूस क्रमांक प्राप्त नसलेल्या आणि परवाना नसलेल्या वाहनांतून आणला जात असल्याचे दिसून येते. या वाहनांना प्रसंगी अपघात झाला तर त्यातील मालाची भरपाई मिळणे दुरापास्त होते. शेतकऱ्यांची याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे.