शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

‘अनरजिस्टर्ड’ वाहनांतून कापसाची वाहतूक

By admin | Updated: January 1, 2017 02:04 IST

कापूस वेचनीचा हंगाम जोमात सुरू आहे. शेतकऱ्यांचा कापूस घरी येत असून बहुतांश शेतकरी आपला कापूस

नुकसानाची शक्यता : शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे वर्धा : कापूस वेचनीचा हंगाम जोमात सुरू आहे. शेतकऱ्यांचा कापूस घरी येत असून बहुतांश शेतकरी आपला कापूस मिळेल त्या वाहनांतून कृषी उत्पन्न बाजार समिती, जिनिंग वा अन्य व्यापाऱ्यांकडे घेऊन जातात; पण यात कमी वाहतूक भाडे आकारून ‘अनरजिस्टर्ड’ वाहने कापसाची वाहतूक करीत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याकडे लक्ष देत संबंधित विभागाने लक्ष देत कार्यवाही करणे व शेतकऱ्यांनीही काळजी घेणे गरजेचे झाले आहे. सध्या कापूस वेचनीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पहिली वेचनी आटोपली असून आणखी वेचनीची कामे हाती घेण्यात आली आहेत. वेचलेला कापूस शेतकऱ्यांकडून विक्रीसाठी नेला जात आहे. यात शेतकऱ्यांना वाहतुकीचा मोठा खर्च करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. हा खर्च कसा कमी करता येईल, याचा विचार शेतकरी करीत असतात. नेमका याचाच फायदा घेत मालवाहु वाहन धारक शेतकऱ्यांना कुठलीही वाहने उपलब्ध करून देत त्यांना धोक्यात घालत असल्याचे दिसते. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुठलेही नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्याची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामध्ये नोंदणी करणे अनिवार्य असते. नोंदणी होईस्तोवर या वाहनांना विमा वा अन्य परवाने लागू होत नाहीत. वाहनांचा क्रमांक आणि नोंदणी झाल्याबाबत वाहनाचे आरसी बुक प्राप्त झाल्यानंतर वाहतूक परवाना लागू होतो; पण जिल्ह्यात बहुतांश मालवाहु वाहने वाहतूक परवाना मिळण्यापूर्वीच माल वाहतुकीस प्रारंभ करीत असल्याचे आढळून आले आहे. वाहन खरेदी केल्यानंतर लगेच ते कामी लावले जात असल्याने या प्रकारांत वाढ झाली आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मोठ्या संख्येने मालवाहु वाहनांतून शेतकऱ्यांना कापूस आणला जात आहे. यातील अर्ध्यापेक्षा जास्त वाहने विना क्रमांकाची, नवीन आणि वाहतूक परवाना नसलेली आढळून येतात. ही बाब शेतकऱ्यांसाठीच नुकसानदायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाहतूक परवाना नसलेल्या विना क्रमांकाच्या वाहनांना अपघात झाला तर त्यांना कुठल्याही प्रकारचे विम्याचे संरक्षण मिळत नाही. शिवाय वाहतूक परवाना नसल्याने उलट वाहन धारकांवरच कारवाईची तरतूद असते. यात वाहनात भरलेल्या कापसालाही कुठलेच संरक्षण मिळत नाही. यात वाहन धारकासह शेतकऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे शेतकऱ्यांनी वाहतूक करताना काळजी घेणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी) वाहतूक पोलीस व आरटीओने लक्ष देणे गरजेचे वाहतुकीचा परवाना नसलेल्या वाहनांना कुठल्याही प्रकारच्या सवलती प्राप्त होत नाहीत. परवाना असलेल्या वाहनांनाच वातूक करता येते. असे असले तरी क्रमांक नसलेली आणि परवाना प्राप्त व्हायची असलेल्या वाहनांतूनही मोठ्या प्रमाणात माल वाहून नेला जात असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार कापसाच्या वाहतुकीमध्ये अधिक घडत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्च कमी करायचा असतो आणि वाहनांच्या परवान्याबाबत तितकीसी माहिती नसते. नेमका याचाच फायदा घेत हा प्रकार केला जात असल्याचे दिसते. वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. अपघात झाल्यास भरपाईची शाश्वती नाही कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खासगी व्यापाऱ्यांकडे येत असलेला कापूस क्रमांक प्राप्त नसलेल्या आणि परवाना नसलेल्या वाहनांतून आणला जात असल्याचे दिसून येते. या वाहनांना प्रसंगी अपघात झाला तर त्यातील मालाची भरपाई मिळणे दुरापास्त होते. शेतकऱ्यांची याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे.