शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कापूस भावावर मंदीचे सावट; शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:28 IST

गेल्या वीस दिवसापासून कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असून हा कापसाचा उतरणारा भाव शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढविणारा आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सरकीचे भाव उतरल्याने कापसाच्या भावात सध्या मंदीचे सावट असल्याचे चित्र आहे. सध्या आर्वी बाजारपेठेत कापसाचा भाव पाच हजार चारशेवर स्थिरावला आहे. अजून एक महिना हिच स्थिती राहणार असल्याचे बोलल्या जाते.

ठळक मुद्देपाच हजार चारशे रूपयावर दर स्थिरावला

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : गेल्या वीस दिवसापासून कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असून हा कापसाचा उतरणारा भाव शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढविणारा आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सरकीचे भाव उतरल्याने कापसाच्या भावात सध्या मंदीचे सावट असल्याचे चित्र आहे. सध्या आर्वी बाजारपेठेत कापसाचा भाव पाच हजार चारशेवर स्थिरावला आहे. अजून एक महिना हिच स्थिती राहणार असल्याचे बोलल्या जाते.अपुरा पाऊस व बोंडअळी या कारणामुळे आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना कपाशीचे अपेक्षित उत्पन्न झाले नाही. याचा थेट परिणाम कापूस उत्पादनावर झाला तर तालुक्यातील बहुतांश: शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या धास्तीने कपाशी पीके उपटून चना व गहू पेरणे पसंत केले. यामुळे यावर्षीचा कापूस हंगाम तोट्याचा ठरून जानेवारी महिन्यातच कापसाची उलगंवाडी होणार असल्याचे चित्र आहे. तर कोरडवाहू कपाशी उत्पादकांना यावर्षी मोठा फटका सहन करावा लागला असल्याचे चित्र आहे. आधीच कापसाचे उत्पादन कमी, त्यावर मजूराचा होणारा खर्च अधिक असूनही गेल्या वीस दिवसापासून कापसाच्या भावात सतत घसरण सुरू असून सध्या हा भाव पाच हजार चारशेवर गेल्या एक आठवड्यापासून स्थिरावला आहे. कापसाच्या भावाची होणारी घसरण ही शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी आहे.आधीच उत्पादन कमी व भावही कमी या कात्रीत सध्या शेतकरी सापडला आहे. यात कापूस पिकावा का नाही? या फेºयात सध्या शेतकरी सापडला आहे. सध्या तरी हे कापसाच्या भावाच्या मंदीचे सावट कायम राहणार असल्याचे चित्र आहे. नापिकी व कमी पावसाच्या फटक्याने यावर्षी शेतकऱ्यांच्या हातून खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम आर्थिक फटका देणारे ठरले आहे. बोंडअळी व पावसाचा मोठा ताण हे दोन घटक कापूस उत्पादक शेतकºयांना मोठ्या प्रमाणात मारक ठरले आहे. त्यात एकरी चार ते पाच क्विंटलचा फटका बसल्याचे कापसाचे उत्पादन अर्ध्यावरं आहे. गेल्या तीन वर्षापासून नापिकी व नैसर्गिक संकटाने तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदाची कापसाची स्थिती पाहता दीडपट भाव कधी देणार? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.कापूस शेतकऱ्यांच्या घरातचयावर्षी कापसाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. ओलिताची व्यवस्था असलेल्या भागात एकरी ८ क्ंिक्टल उत्पादन झाले. कापसाचे भाव वाढतील अशी आशा असतांना भाव ५४०० च्या पुढे सरकण्यास तयार नाही. भाव सहा हजारांवर जाईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी अजूनही आपला कापूस बाजारात विकण्यासाठी आणलेला नाही. कापूस घरीच भरून ठेवला आहे. जानेवारीपर्यंत शेतकरी भाव वाढण्याची वाट पाहणार आहे असे चित्र दिसून येत आहे. कापूस बाजारातही आवक मंदावलेली असल्याचे दिसते.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकीचे भाव पडल्याने कापसाच्या भावात मंदी आली आहे. अजून काही दिवस हीच परिस्थिती कामय राहणार आहे.- मोन्टू चांडक, कापूस व्यापारी, आर्वी.