शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

कापूस भावावर मंदीचे सावट; शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:28 IST

गेल्या वीस दिवसापासून कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असून हा कापसाचा उतरणारा भाव शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढविणारा आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सरकीचे भाव उतरल्याने कापसाच्या भावात सध्या मंदीचे सावट असल्याचे चित्र आहे. सध्या आर्वी बाजारपेठेत कापसाचा भाव पाच हजार चारशेवर स्थिरावला आहे. अजून एक महिना हिच स्थिती राहणार असल्याचे बोलल्या जाते.

ठळक मुद्देपाच हजार चारशे रूपयावर दर स्थिरावला

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : गेल्या वीस दिवसापासून कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असून हा कापसाचा उतरणारा भाव शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढविणारा आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सरकीचे भाव उतरल्याने कापसाच्या भावात सध्या मंदीचे सावट असल्याचे चित्र आहे. सध्या आर्वी बाजारपेठेत कापसाचा भाव पाच हजार चारशेवर स्थिरावला आहे. अजून एक महिना हिच स्थिती राहणार असल्याचे बोलल्या जाते.अपुरा पाऊस व बोंडअळी या कारणामुळे आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना कपाशीचे अपेक्षित उत्पन्न झाले नाही. याचा थेट परिणाम कापूस उत्पादनावर झाला तर तालुक्यातील बहुतांश: शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या धास्तीने कपाशी पीके उपटून चना व गहू पेरणे पसंत केले. यामुळे यावर्षीचा कापूस हंगाम तोट्याचा ठरून जानेवारी महिन्यातच कापसाची उलगंवाडी होणार असल्याचे चित्र आहे. तर कोरडवाहू कपाशी उत्पादकांना यावर्षी मोठा फटका सहन करावा लागला असल्याचे चित्र आहे. आधीच कापसाचे उत्पादन कमी, त्यावर मजूराचा होणारा खर्च अधिक असूनही गेल्या वीस दिवसापासून कापसाच्या भावात सतत घसरण सुरू असून सध्या हा भाव पाच हजार चारशेवर गेल्या एक आठवड्यापासून स्थिरावला आहे. कापसाच्या भावाची होणारी घसरण ही शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी आहे.आधीच उत्पादन कमी व भावही कमी या कात्रीत सध्या शेतकरी सापडला आहे. यात कापूस पिकावा का नाही? या फेºयात सध्या शेतकरी सापडला आहे. सध्या तरी हे कापसाच्या भावाच्या मंदीचे सावट कायम राहणार असल्याचे चित्र आहे. नापिकी व कमी पावसाच्या फटक्याने यावर्षी शेतकऱ्यांच्या हातून खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम आर्थिक फटका देणारे ठरले आहे. बोंडअळी व पावसाचा मोठा ताण हे दोन घटक कापूस उत्पादक शेतकºयांना मोठ्या प्रमाणात मारक ठरले आहे. त्यात एकरी चार ते पाच क्विंटलचा फटका बसल्याचे कापसाचे उत्पादन अर्ध्यावरं आहे. गेल्या तीन वर्षापासून नापिकी व नैसर्गिक संकटाने तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदाची कापसाची स्थिती पाहता दीडपट भाव कधी देणार? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.कापूस शेतकऱ्यांच्या घरातचयावर्षी कापसाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. ओलिताची व्यवस्था असलेल्या भागात एकरी ८ क्ंिक्टल उत्पादन झाले. कापसाचे भाव वाढतील अशी आशा असतांना भाव ५४०० च्या पुढे सरकण्यास तयार नाही. भाव सहा हजारांवर जाईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी अजूनही आपला कापूस बाजारात विकण्यासाठी आणलेला नाही. कापूस घरीच भरून ठेवला आहे. जानेवारीपर्यंत शेतकरी भाव वाढण्याची वाट पाहणार आहे असे चित्र दिसून येत आहे. कापूस बाजारातही आवक मंदावलेली असल्याचे दिसते.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकीचे भाव पडल्याने कापसाच्या भावात मंदी आली आहे. अजून काही दिवस हीच परिस्थिती कामय राहणार आहे.- मोन्टू चांडक, कापूस व्यापारी, आर्वी.