शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

कापूस भावावर मंदीचे सावट; शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:28 IST

गेल्या वीस दिवसापासून कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असून हा कापसाचा उतरणारा भाव शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढविणारा आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सरकीचे भाव उतरल्याने कापसाच्या भावात सध्या मंदीचे सावट असल्याचे चित्र आहे. सध्या आर्वी बाजारपेठेत कापसाचा भाव पाच हजार चारशेवर स्थिरावला आहे. अजून एक महिना हिच स्थिती राहणार असल्याचे बोलल्या जाते.

ठळक मुद्देपाच हजार चारशे रूपयावर दर स्थिरावला

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : गेल्या वीस दिवसापासून कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असून हा कापसाचा उतरणारा भाव शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढविणारा आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सरकीचे भाव उतरल्याने कापसाच्या भावात सध्या मंदीचे सावट असल्याचे चित्र आहे. सध्या आर्वी बाजारपेठेत कापसाचा भाव पाच हजार चारशेवर स्थिरावला आहे. अजून एक महिना हिच स्थिती राहणार असल्याचे बोलल्या जाते.अपुरा पाऊस व बोंडअळी या कारणामुळे आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना कपाशीचे अपेक्षित उत्पन्न झाले नाही. याचा थेट परिणाम कापूस उत्पादनावर झाला तर तालुक्यातील बहुतांश: शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या धास्तीने कपाशी पीके उपटून चना व गहू पेरणे पसंत केले. यामुळे यावर्षीचा कापूस हंगाम तोट्याचा ठरून जानेवारी महिन्यातच कापसाची उलगंवाडी होणार असल्याचे चित्र आहे. तर कोरडवाहू कपाशी उत्पादकांना यावर्षी मोठा फटका सहन करावा लागला असल्याचे चित्र आहे. आधीच कापसाचे उत्पादन कमी, त्यावर मजूराचा होणारा खर्च अधिक असूनही गेल्या वीस दिवसापासून कापसाच्या भावात सतत घसरण सुरू असून सध्या हा भाव पाच हजार चारशेवर गेल्या एक आठवड्यापासून स्थिरावला आहे. कापसाच्या भावाची होणारी घसरण ही शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी आहे.आधीच उत्पादन कमी व भावही कमी या कात्रीत सध्या शेतकरी सापडला आहे. यात कापूस पिकावा का नाही? या फेºयात सध्या शेतकरी सापडला आहे. सध्या तरी हे कापसाच्या भावाच्या मंदीचे सावट कायम राहणार असल्याचे चित्र आहे. नापिकी व कमी पावसाच्या फटक्याने यावर्षी शेतकऱ्यांच्या हातून खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम आर्थिक फटका देणारे ठरले आहे. बोंडअळी व पावसाचा मोठा ताण हे दोन घटक कापूस उत्पादक शेतकºयांना मोठ्या प्रमाणात मारक ठरले आहे. त्यात एकरी चार ते पाच क्विंटलचा फटका बसल्याचे कापसाचे उत्पादन अर्ध्यावरं आहे. गेल्या तीन वर्षापासून नापिकी व नैसर्गिक संकटाने तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदाची कापसाची स्थिती पाहता दीडपट भाव कधी देणार? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.कापूस शेतकऱ्यांच्या घरातचयावर्षी कापसाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. ओलिताची व्यवस्था असलेल्या भागात एकरी ८ क्ंिक्टल उत्पादन झाले. कापसाचे भाव वाढतील अशी आशा असतांना भाव ५४०० च्या पुढे सरकण्यास तयार नाही. भाव सहा हजारांवर जाईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी अजूनही आपला कापूस बाजारात विकण्यासाठी आणलेला नाही. कापूस घरीच भरून ठेवला आहे. जानेवारीपर्यंत शेतकरी भाव वाढण्याची वाट पाहणार आहे असे चित्र दिसून येत आहे. कापूस बाजारातही आवक मंदावलेली असल्याचे दिसते.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकीचे भाव पडल्याने कापसाच्या भावात मंदी आली आहे. अजून काही दिवस हीच परिस्थिती कामय राहणार आहे.- मोन्टू चांडक, कापूस व्यापारी, आर्वी.