शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

कापसाला योग्य हमीभाव मिळावा

By admin | Updated: November 11, 2014 22:46 IST

जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने दिली. पण आता त्याला हरताळ फासू लागले आहेत. केंद्र सरकारने कापसाला फक्त चार हजार पन्नास हमी भाव जाहीर केला आहे.

वर्धा : जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने दिली. पण आता त्याला हरताळ फासू लागले आहेत. केंद्र सरकारने कापसाला फक्त चार हजार पन्नास हमी भाव जाहीर केला आहे. तो हमी भाव मिळावा म्हणून शासन हमी भावाने पणन व नाफेडच्या मार्फत कापूस खरेदी करत असे. परंतु नव्या सरकारने महाराष्ट्र शासन नाफेड कडून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणार नसल्याने जाहीर केले आहे. त्यामुळे कापसाला सहा हजार हमी भाव जाहीर करावा व शासनाची हमी केंद्रे तत्काळ सुरू करावी अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात मोदी सरकार आणा, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्च व त्यावर पन्नास टक्के जास्त नफा देवून शेती मालाला भाव देऊ, असे जाहीर सांगितले होते. पण आता राज्यात आणि केंद्रातही भाजपचे सरकार असतानाही शेतकऱ्यांच्या कापसाला सहा हजार भाव का दिल्या जात नाही. निवडणुकी पूर्वी दिलेली आश्वासने ही शेतकऱ्यांची फसवणूक करणारी होती व शेतकऱ्यांचे या नेत्यांचे या पूर्वीचे शेतकरी प्रेम बेगडी होते का असा सवाल या निवेदनातून करण्यात आलेला आहे.शेतकरी आज दुष्काळाच्या फेऱ्यात अडकला आहे. शेतीसाठी वीज मिळत नाही. त्यावर कोणी बोलत नाही. हमी भावापेक्षाही कमी तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशेच्या दरम्यान खाजगी व्यापारी कापूस खरेदी करत आहे. हमी भाव टिकावा म्हणून या पूर्वी शासन खाजगी व्यापाऱ्यांच्या जोडीने पणन व नाफेडच्या मार्फत कापूस खरेदी करत होती. पण या नव्या सरकारने मात्र शेतकऱ्यांचा कापूस हमी भावात पणन किंवा नाफेडच्या मार्फत खरेदी केल्या जाणार नाही, असे धोरण जाहीर करून शेतकऱ्यांना चांगलेच तोंडधशी पाडले आहे. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या हवाली करून, त्यांना मनमानी करण्यासाठी रान मोकळे केलेले आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून विदर्भात अशामुळे शेतकरी आत्महत्या सत्र पुन्हा नव्याने सुरू झाल्याचे दिसते. असे असतानाही दरवर्षी कापसाला सहा हजार रूपयांसाठी हमखास आंदोलन करणारे भाजपाचे नेते मात्र कुठे दिसत नाही. आता शेतकऱ्यांनीच आपल्या न्याय्य अधिकारासाठी कापूस भाव आंदोलनात उतरावे, असे आवाहन करण्यात आले. शेतकऱ्यांना सोबत घेऊन, भाजप नेत्यांच्या, आमदार, खासदार मंत्र्यांच्या घरासमोर बँडबाजा वाजवून या अन्यायाचा विरोध करेल असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांना जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्यामार्फत पाठविलेल्या निवेदनातून संघटनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी शिष्टमंडळात समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर देशमुख, जिल्हा संघटक विनय डहाके, अनिरूद्ध गवई, संजय मस्के, सुधीर पांगुळ, मनोहर गायकवाड, संदीप किटे, निळकंठ राऊत, नामदेव गुजरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)