शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

कापसाला हमीभाव मिळवून द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 06:00 IST

केंद्र सरकारने कापसाचा हमीभाव ५ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे. परंतु देशात मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचा कापूस ४ हजार ते ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा १ हजार रुपये कमी दर मिळत असल्याने आर्थिक फटका बसत आहे. जगामध्ये कापसात मंदी असल्यामुळे यावर्षी २० लाख कापूस गाठी खरेदी करण्याचा निर्णय सीसीआयने घेतला आहे.

ठळक मुद्देप्रशांत इंगळे तिगावकर : शासनाकडे निवेदनातून केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सीसीआय मार्फत १ कोटी कापूस गाठींची खरेदी करुन शेतकऱ्यांच्या कापसाला हमीभाव मिळवून द्यावा. तसेच कापसाचा ओलावा १२ टक्क्यांऐवजी आर्द्रताची मर्यादा १५ टक्के करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी मुल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर यांनी शासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.केंद्र सरकारने कापसाचा हमीभाव ५ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे. परंतु देशात मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचा कापूस ४ हजार ते ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा १ हजार रुपये कमी दर मिळत असल्याने आर्थिक फटका बसत आहे. जगामध्ये कापसात मंदी असल्यामुळे यावर्षी २० लाख कापूस गाठी खरेदी करण्याचा निर्णय सीसीआयने घेतला आहे. त्याऐवजी सीसीआयने १ कोटी कापूस गाठी खरेदी करण्याची घोषणा करावी. त्यामुळे खुल्या मार्केटमध्ये कापसाचे भाव हमीभावाप्रमाणे राहील. सीसीआयच्या खरेदी केंद्रावर कापसातील ओलाव्याचे प्रमाणे १२ टक्क्यांपर्यंतच धरले जाते. यावर्षी भौगोलिक स्थिती लक्षात घेता कापसाच्या आर्द्रतेचे प्रमाण १५ टक्के करण्यात यावे. ज्यामुळे शेतकºयांचा कापूस मोठ्या प्रमाणावर सीसीआय केंद्रावर खरेदी केली जाईल. यावर्षी देशामध्ये ३३० लाख कापूस गाठीचे उत्पन्न होईल. देशाअंतर्गत कापसाची गरज लक्षात घेता कापसाची निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढवावी लागेल व कापसाच्या आयातीवर पूर्णपणे बंदी घालावी. त्याशिवाय शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार नाही, असेही निवेदनात नमूद केले आहे.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस