शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

सेलू तालुक्यातील कापूस जातोय आर्वीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 04:00 IST

महिनाभरापासून कापूस विकण्याचा बेतात असलेल्या शेतकऱ्यांना सेलू बाजार समितीच्या माध्यमातून दिलासा मिळण्याची शक्यता होती. यासाठी बाजार समितीने पुढाकार घेत व्यापाऱ्यांची सभाही बोलावली. मात्र, या सभेत व्यापाऱ्यांनी नकारघंटा देत निवेदन देऊन चेंडू जिल्हाधिकारी यांच्याकडे वळविण्यात व्यापाऱ्यांना यश आले. इतर ठिकाणी कापूस खरेदी सुरू झाली.

ठळक मुद्देकापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची भटकंती : कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : कापसाची उलंगवाडी झाली आणि कापूस विक्रीस नेण्याच्या बेतात शेतकरी असताना कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. सेलू येथील बाजारपेठेत कापूस खरेदी सुरू झाली नसल्याने आता कापूस विक्रीसाठी भटकंती करत बाजारपेठ शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.महिनाभरापासून कापूस विकण्याचा बेतात असलेल्या शेतकऱ्यांना सेलू बाजार समितीच्या माध्यमातून दिलासा मिळण्याची शक्यता होती. यासाठी बाजार समितीने पुढाकार घेत व्यापाऱ्यांची सभाही बोलावली. मात्र, या सभेत व्यापाऱ्यांनी नकारघंटा देत निवेदन देऊन चेंडू जिल्हाधिकारी यांच्याकडे वळविण्यात व्यापाऱ्यांना यश आले. इतर ठिकाणी कापूस खरेदी सुरू झाली.त्यामुळे आर्थिकदृष्ट्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांपुढे घरात असलेला कापूस विक्री करणे, हा एकमेव पर्याय आहे. आता शेतकºयांनी घरात असलेला कापूस गाड्या भरून तालुक्यातील बाजारपेठेत नाही तर दुसऱ्या बाजारपेठेत का होईना म्हणून विक्रीस काढला आहे.सेलू तालुक्यातील कापूस पाच वर्षांपूर्वी आर्वीच्या दिशेने जात होता. बाजार समितीने हा कापूस सेलू बाजारपेठेतच विकला जावा म्हणून उपाययोजना केल्या होत्या.आता पुन्हा शेतकऱ्याला जवळचे सोडून दूरच्याचा हात पकडण्याची वेळ आली आहे. शासनाची कापूस खरेदी बंद आहे. अशातच व्यापाºयांनी हात वर केले आहे. तालुक्यातील जवळपास ८०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी महिनाभरापूर्वी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली होती. खरिपाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांपुढे आता मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.सेलूची बाजारपेठ सुरू करासेलू ही कापसाची मोठी बाजारपेठ आहे. लांब धाग्याचा कापूस पिकविणाऱ्या तालुक्यात सेलूचा समावेश होतो. येथील कापूस खरेदी बंद राहावी, या बाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.बाजार समितीचा बुडतोय सेससेलू तालुक्याला लागूनच आर्वी तालुका आहे. येथे कापूस खरेदी केंद्रे सुरू झाली. त्यामुळे खरांगणा ते आर्वी येथे असलेल्या जिनिंगमध्ये या परिसरातील कापूस आता विक्रीला जाताना दिसत आहे. यामुळे सेलू बाजार समितीला मिळणाऱ्या सेसला मुकावे लागणार आहे.शेतकरी संघटनेचे आगळेवेगळे कापूस कैफीयत आंदोलनचिकणी (जामणी) : २० एप्रिल पासून कापूस खरेदी सुरू करण्यात आली; मात्र एका दिवशी २० गाड्या घेतल्या जात आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण झाले. सीसीआय केवळ एफएक्यू ग्रेडचा कापूस घेत आहे. नॉन एफएक्यू कापूस घेत नसल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. शासनाने शेतकऱ्यांचा पूर्णच कापूस घ्यावा, याकरीता शेतकरी संघटना ३० एप्रिलला आगळेवेगळे कापूस कैफीयत आंदोलन करीत असल्याची माहिती शेतकरी संघटना युवा आघाडीचे राज्याध्यक्ष सतीश दाणी यांनी लोकमतला दिली. आंदोलन प्रत्येकाने आपापल्या घरूनच करायचे असून यामध्ये केवळ संबंधित प्रतिनिधींना मेसेज अथवा संपर्क करावा, असे ते म्हणाले.

टॅग्स :cottonकापूस