शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाच लाख क्विंटल कापसाची खरेदी

By admin | Updated: November 22, 2015 02:13 IST

शेतकऱ्यांकडून त्यांचा कापूस बाजारपेठेत येणे सुरू झाला आहे. गत दोन ते तीन दिवसांपासून कापसाची आवक वाढली आहे.

रूपेश खैरी वर्धा शेतकऱ्यांकडून त्यांचा कापूस बाजारपेठेत येणे सुरू झाला आहे. गत दोन ते तीन दिवसांपासून कापसाची आवक वाढली आहे. यात काही ठिकाणी पणन महासंघाचे व काही ठिकाणी सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाली आहे. जिल्ह्यात शासकीय व व्यापाऱ्यांची मिळून आतापर्यंत एकूण ५ लाख ६ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात एकूण २ लाख ५० हजार हेक्टरवर कापसाची लागवड होणार असल्याचे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात २ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली. लागवड करण्यात आलेल्या क्षेत्रातून एकूण सुमारे १० लाख क्विंटल कपाशीचे उत्पादन होईल असे भाकीत कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यापैकी निम्मा कापूस बाजारपेठेत आल्याचे चित्र आहे. अजून निम्मा कापूस शेतकऱ्यांच्या शेतातच आहे. जिल्ह्यात असलेल्या सात बाजार समितीतून जिल्ह्यात कापसाची खरेदी सुरू आहे. बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या या बाजारपेठेत खासगी व्यापाऱ्यांसह शासकीय यंत्रणेच्या प्रतिनिधीकडून कापसाची खरेदी सुरू आहे. देवळी, समुद्रपूर व सिंदी बाजार समितीच्या आवारात सीसीआयचे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रांवरून कापसाची खरेदी सुरू आहे. या तीन केंद्रवार एकूण ११ हजार ६३७ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. तर आर्वी बाजार समितीच्या खरांगणा व तळेगाव केंद्रावर तर कानगाव येथील केंद्रावर पणन महासंघाचे केंद्र सुरू झाले आहे. या केंद्राकडे मात्र शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे दिसून आले आहे. बाजारपेठेत कापसाची आवक वाढली असल्याने व्यापाऱ्यांकडून भाव पाडले जात आहे. यात शेतकऱ्यांची लूट होत आहे. शेतकऱ्यांना निदान हमीभाव मिळावा याकरिता सीसीआयचे केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे. जिल्ह्यात गत हंगामात सात ठिकाणी सीसीआच्यावतीने कापूस खरेदी सुरू झाली होती. यंदा त्यांच्याकडून पाचच ठिकाणी कापूस खरेदी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. देवळी, कांढळी व सिंदी येथे केंद्र सुरू झाले आहे. शिवाय वर्धा व हिंगणघाट येथे केंद्र प्रस्तावित असल्याची माहिती सीसीआयच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात जाम व रोहणा केंद्राकरिता संबंधित बाजार समितीतून मागणी आली नसल्याने तेथील केंद्र बंद राहणार असल्याची माहिती आहे.