शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

जिल्ह्यात पाच लाख क्विंटल कापसाची खरेदी

By admin | Updated: November 22, 2015 02:13 IST

शेतकऱ्यांकडून त्यांचा कापूस बाजारपेठेत येणे सुरू झाला आहे. गत दोन ते तीन दिवसांपासून कापसाची आवक वाढली आहे.

रूपेश खैरी वर्धा शेतकऱ्यांकडून त्यांचा कापूस बाजारपेठेत येणे सुरू झाला आहे. गत दोन ते तीन दिवसांपासून कापसाची आवक वाढली आहे. यात काही ठिकाणी पणन महासंघाचे व काही ठिकाणी सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाली आहे. जिल्ह्यात शासकीय व व्यापाऱ्यांची मिळून आतापर्यंत एकूण ५ लाख ६ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात एकूण २ लाख ५० हजार हेक्टरवर कापसाची लागवड होणार असल्याचे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात २ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली. लागवड करण्यात आलेल्या क्षेत्रातून एकूण सुमारे १० लाख क्विंटल कपाशीचे उत्पादन होईल असे भाकीत कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यापैकी निम्मा कापूस बाजारपेठेत आल्याचे चित्र आहे. अजून निम्मा कापूस शेतकऱ्यांच्या शेतातच आहे. जिल्ह्यात असलेल्या सात बाजार समितीतून जिल्ह्यात कापसाची खरेदी सुरू आहे. बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या या बाजारपेठेत खासगी व्यापाऱ्यांसह शासकीय यंत्रणेच्या प्रतिनिधीकडून कापसाची खरेदी सुरू आहे. देवळी, समुद्रपूर व सिंदी बाजार समितीच्या आवारात सीसीआयचे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रांवरून कापसाची खरेदी सुरू आहे. या तीन केंद्रवार एकूण ११ हजार ६३७ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. तर आर्वी बाजार समितीच्या खरांगणा व तळेगाव केंद्रावर तर कानगाव येथील केंद्रावर पणन महासंघाचे केंद्र सुरू झाले आहे. या केंद्राकडे मात्र शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे दिसून आले आहे. बाजारपेठेत कापसाची आवक वाढली असल्याने व्यापाऱ्यांकडून भाव पाडले जात आहे. यात शेतकऱ्यांची लूट होत आहे. शेतकऱ्यांना निदान हमीभाव मिळावा याकरिता सीसीआयचे केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे. जिल्ह्यात गत हंगामात सात ठिकाणी सीसीआच्यावतीने कापूस खरेदी सुरू झाली होती. यंदा त्यांच्याकडून पाचच ठिकाणी कापूस खरेदी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. देवळी, कांढळी व सिंदी येथे केंद्र सुरू झाले आहे. शिवाय वर्धा व हिंगणघाट येथे केंद्र प्रस्तावित असल्याची माहिती सीसीआयच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात जाम व रोहणा केंद्राकरिता संबंधित बाजार समितीतून मागणी आली नसल्याने तेथील केंद्र बंद राहणार असल्याची माहिती आहे.