शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

जिल्ह्यात पाच लाख क्विंटल कापसाची खरेदी

By admin | Updated: November 22, 2015 02:13 IST

शेतकऱ्यांकडून त्यांचा कापूस बाजारपेठेत येणे सुरू झाला आहे. गत दोन ते तीन दिवसांपासून कापसाची आवक वाढली आहे.

रूपेश खैरी वर्धा शेतकऱ्यांकडून त्यांचा कापूस बाजारपेठेत येणे सुरू झाला आहे. गत दोन ते तीन दिवसांपासून कापसाची आवक वाढली आहे. यात काही ठिकाणी पणन महासंघाचे व काही ठिकाणी सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाली आहे. जिल्ह्यात शासकीय व व्यापाऱ्यांची मिळून आतापर्यंत एकूण ५ लाख ६ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात एकूण २ लाख ५० हजार हेक्टरवर कापसाची लागवड होणार असल्याचे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात २ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली. लागवड करण्यात आलेल्या क्षेत्रातून एकूण सुमारे १० लाख क्विंटल कपाशीचे उत्पादन होईल असे भाकीत कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यापैकी निम्मा कापूस बाजारपेठेत आल्याचे चित्र आहे. अजून निम्मा कापूस शेतकऱ्यांच्या शेतातच आहे. जिल्ह्यात असलेल्या सात बाजार समितीतून जिल्ह्यात कापसाची खरेदी सुरू आहे. बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या या बाजारपेठेत खासगी व्यापाऱ्यांसह शासकीय यंत्रणेच्या प्रतिनिधीकडून कापसाची खरेदी सुरू आहे. देवळी, समुद्रपूर व सिंदी बाजार समितीच्या आवारात सीसीआयचे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रांवरून कापसाची खरेदी सुरू आहे. या तीन केंद्रवार एकूण ११ हजार ६३७ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. तर आर्वी बाजार समितीच्या खरांगणा व तळेगाव केंद्रावर तर कानगाव येथील केंद्रावर पणन महासंघाचे केंद्र सुरू झाले आहे. या केंद्राकडे मात्र शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे दिसून आले आहे. बाजारपेठेत कापसाची आवक वाढली असल्याने व्यापाऱ्यांकडून भाव पाडले जात आहे. यात शेतकऱ्यांची लूट होत आहे. शेतकऱ्यांना निदान हमीभाव मिळावा याकरिता सीसीआयचे केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे. जिल्ह्यात गत हंगामात सात ठिकाणी सीसीआच्यावतीने कापूस खरेदी सुरू झाली होती. यंदा त्यांच्याकडून पाचच ठिकाणी कापूस खरेदी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. देवळी, कांढळी व सिंदी येथे केंद्र सुरू झाले आहे. शिवाय वर्धा व हिंगणघाट येथे केंद्र प्रस्तावित असल्याची माहिती सीसीआयच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात जाम व रोहणा केंद्राकरिता संबंधित बाजार समितीतून मागणी आली नसल्याने तेथील केंद्र बंद राहणार असल्याची माहिती आहे.