शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

लाल्यामुळे कपाशीचे उत्पादनही घटणार!

By admin | Updated: November 20, 2014 22:57 IST

यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटणाराच ठरत आहे़ उशीरा झालेल्या पेरणीमुळे सोयाबीन पिकाचा उतारा अत्यल्प आला़ आता लाल्याच्या आक्रमणामुळे कपाशीचे पिकही धोक्यात आले आहे़

समुद्रपूर : यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटणाराच ठरत आहे़ उशीरा झालेल्या पेरणीमुळे सोयाबीन पिकाचा उतारा अत्यल्प आला़ आता लाल्याच्या आक्रमणामुळे कपाशीचे पिकही धोक्यात आले आहे़ सोयाबीन नाही व आता कपाशीचे उत्पादनही कमी होणार असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे़सध्या कपाशीवर लाल्या रोगाने आक्रमण केले आहे़ यामुळे कपाशीचा उतारा २ ते ३ क्विंटलवर आला आहे़ एक एकर कापसाला लागणारा किमान खर्च नांगरणी १००० रुपये, फन्नाट ५०० रुपये, बियाणे १८६० रुपये, खते ५५२० व इतर ४ हजार ६६० असा एकूण खर्च दर एकरी १३ हजार २४० रुपये येतो़ एकरी ३ क्विंटल कापूस झाल्यानंतर शेतकऱ्यांना चार हजार रुपये क्विंटल भावाने तो विकावा लागतो़ यात शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळतात़ शेतकऱ्यांना कपाशीमध्येही १२४० रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचे दिसते़ या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडत आहे़ सोयाबीनबाबतही हाच प्रकार घडत आहे़ एका एकराला लावडीकरिता नांगरणी १००० रुपये, फवारणी ५०० रुपये, बियाणे १९०० रुपये, खते १००० रुपये, फवारणी १२०० रुपये, सवंगणी १००० रुपये, काढणी खर्च ४०० रुपये असा एकूण सोयाबीनचा खर्च सात हजार रुपये येतो़ एकरी सोयाबीनचे उत्पादन २ क्विंटल होत आहे़ हे सोयाबीन शेतकऱ्यांना ३ हजार रुपये दराने विकून केवळ ६ हजार रुपये प्राप्त होत आहेत़ यामुळे यातही एक हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे़ अन्य पिकांची स्थितीही अशीच आहे़ यामुळे शेती करावी की नको, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत़ अशा स्थितीत शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)