शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

लाल्यामुळे कपाशीचे उत्पादनही घटणार!

By admin | Updated: November 20, 2014 22:57 IST

यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटणाराच ठरत आहे़ उशीरा झालेल्या पेरणीमुळे सोयाबीन पिकाचा उतारा अत्यल्प आला़ आता लाल्याच्या आक्रमणामुळे कपाशीचे पिकही धोक्यात आले आहे़

समुद्रपूर : यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटणाराच ठरत आहे़ उशीरा झालेल्या पेरणीमुळे सोयाबीन पिकाचा उतारा अत्यल्प आला़ आता लाल्याच्या आक्रमणामुळे कपाशीचे पिकही धोक्यात आले आहे़ सोयाबीन नाही व आता कपाशीचे उत्पादनही कमी होणार असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे़सध्या कपाशीवर लाल्या रोगाने आक्रमण केले आहे़ यामुळे कपाशीचा उतारा २ ते ३ क्विंटलवर आला आहे़ एक एकर कापसाला लागणारा किमान खर्च नांगरणी १००० रुपये, फन्नाट ५०० रुपये, बियाणे १८६० रुपये, खते ५५२० व इतर ४ हजार ६६० असा एकूण खर्च दर एकरी १३ हजार २४० रुपये येतो़ एकरी ३ क्विंटल कापूस झाल्यानंतर शेतकऱ्यांना चार हजार रुपये क्विंटल भावाने तो विकावा लागतो़ यात शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळतात़ शेतकऱ्यांना कपाशीमध्येही १२४० रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचे दिसते़ या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडत आहे़ सोयाबीनबाबतही हाच प्रकार घडत आहे़ एका एकराला लावडीकरिता नांगरणी १००० रुपये, फवारणी ५०० रुपये, बियाणे १९०० रुपये, खते १००० रुपये, फवारणी १२०० रुपये, सवंगणी १००० रुपये, काढणी खर्च ४०० रुपये असा एकूण सोयाबीनचा खर्च सात हजार रुपये येतो़ एकरी सोयाबीनचे उत्पादन २ क्विंटल होत आहे़ हे सोयाबीन शेतकऱ्यांना ३ हजार रुपये दराने विकून केवळ ६ हजार रुपये प्राप्त होत आहेत़ यामुळे यातही एक हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे़ अन्य पिकांची स्थितीही अशीच आहे़ यामुळे शेती करावी की नको, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत़ अशा स्थितीत शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)