शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

कापूस बाजारात येताच क्विंटलमागे ६०० रुपयांची घट

By admin | Updated: October 30, 2016 00:59 IST

मराठवाड्यात एक महिन्यापूर्वी खासगी व्यापाऱ्यांनी ५ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल भावाने कापूस खरेदीचा मुर्हूत केला.

व्यापाऱ्यांचा प्रताप : शेतकऱ्यांची होतेय मुस्कटदाबीफणिंद्र रघाटाटे  रोहणामराठवाड्यात एक महिन्यापूर्वी खासगी व्यापाऱ्यांनी ५ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल भावाने कापूस खरेदीचा मुर्हूत केला. हा भाव कायम राहील, असा अंदाजही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला; पण विदर्भातील शेतकऱ्यांचा कापूस निघून तो खासगी व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी येताच त्यात ६०० रुपयांची घट करण्यात आली. ४९०० रुपयांप्रमाणे कापूस खरेदी सुरू केली आहे. याउपर आम्ही शासनाच्या हमीभावापेक्षा अधिकच देत आहे, अशी मल्लीनाथी करायला व्यापारी विसरले नाहीत.मराठवाड्यात अल्प प्रमाणात कापूस पिकत असला तरी विदर्भाच्या तुलनेत तेथे कापूस आधीच निघतो. परिणामी, मराठवाड्यात कापसाची खरेदी आधी सुरू होते. एक महिन्यापूर्वी मराठवाड्यात खासगी व्यापाऱ्यांनी ५ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल भावाने कापूस खरेदी केली. त्यावेळी कापसाचा घटता पेरा व उत्पादनातील घटीमुळे हे भाव हंगामाच्या शेवटपर्यंत कायम राहतील, असा अंदाज शासकीय तज्ज्ञ व व्यापाऱ्यांनी व्यक्त केला होता; पण प्रत्यक्षात आता विदर्भातील शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येऊ लागला आहे. शासन हमीभावाने १५ नोव्हेंबरनंतर कापूस खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांसाठी शासकीय खरेदी कुचकामी ठरणार आहे. सोयाबीनच्या उत्पादनात झालेला खर्चही भरून न निघालेल्या शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी नुकताच वेचून आणलेला कापूस विकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. वर्धा, वायगाव व सेलू येथे खासगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी सुरू केली. पहिल्या दिवशी ५ हजार १५१ रुपये भावाने कापूस घेण्यात आला; पण दोन दिवसांत भाव ४ हजार ९०० पर्यंत खाली आणले. किमान काही दिवस तरी मराठवाड्यातील कापूस खरेदीचा भाव विदर्भातील शेतकऱ्यांना मिळेल, ही अपेक्षा मृगजळ ठरली. भाव एवढे कमी का, असे कापूस उत्पादकांनी विचारताच व्यापारी, अहो आम्ही शासनापेक्षा आठाणे अधिकच देत आहे, यात समाधान माना, अशी मल्लीनाथी करतात. यंदा कापसाचा पेरा कमी व लाल्याच्या प्रभावाने उत्पादनात मोठी घट येणार, हे सूर्य प्रकाशाइतके सत्य आहे. आज व्यापारी ज्या कापसाला पाच हजारही भाव द्यायला तयार नाही, त्याच कापसावर व्यापारी प्रक्रिया करवून सरकी व रूईगाठी विकल्यावर त्यांना खर्च वजा सहा हजारांपेक्षा जास्त भाव मिळणार, हे देखील निश्चितच खोटे नाही. म्हणजे उत्पादक उपाशी अन खरेदीदार तुपाशी, हे वास्तव यंदाही प्रत्ययास येणार असल्याचेच दिसते.