शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कापसाच्या भावात ३०० रुपयांची घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:21 IST

गेल्या पंधरवड्यापासून कापसाच्या भावात ३०० रुपयांची प्रति क्विंटल घट झाल्याने शेतकऱ्याने आपला माल बाजारात विकण्यासाठी आणणे कमी केल्याने पर्यायाने जिनिंगवर याचा परिणाम दिसून येत आहे.

ठळक मुद्देकापसाची नोंद नाही : थेट खरेदीमुळे आवक मंदावली

सुरेंद्र डाफ ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : गेल्या पंधरवड्यापासून कापसाच्या भावात ३०० रुपयांची प्रति क्विंटल घट झाल्याने शेतकऱ्याने आपला माल बाजारात विकण्यासाठी आणणे कमी केल्याने पर्यायाने जिनिंगवर याचा परिणाम दिसून येत आहे.गेल्या पंधरवाड्यापासून आर्वी बाजार समितीत मोठ्या प्रमाणात धामणगाव, देवगांव, यवतमाळ, कुºहा, तिवसा व इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कापसाची आवक होती. परंतू गेल्या काही दिवसात कापसाच्या भावात प्रति क्विंटल ३०० रुपयांची घट झाल्याने येत्या पंधरवाड्यात कापसाचे भाव पाडण्याचे कुठलेही संकेत बाजारपेठेत दिसत नसल्याने शेतकºयानी आपला कापूस माल घरात ठेवणे पसंत केले आहे.यावर्षी कपाशी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे यातही कापसाला चांगले भाव मिळण्याचे संकेत आहे. शेतकऱ्यांना मिळाल्याने कापूस निघाल्यानंतर शेतकºयांना ५ हजार ९०० रुपये पर्यंत भाव कापसाला प्रति क्विंटल भाव मिळाला परतु गेल्या १० दिवसांपासून या कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परिणामी सध्या बाजारपेठेत कापसाची आवक मंदावल्याचे चित्र आहे.यातही आर्वीत थेट कापूस खरेदीदाराकडून कापसाची मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी सुरू असून यात बाजार समितीचा मापारी नसल्याने व या खासगी व थेट कापूस खरेदी परवानाधारकांडून होणाºया कापूस खरेदीवर बाजार समितीचे नियंत्रण नसल्याने या थेट खरेदीत कुठल्या व्यापाऱ्याने किती क्विंटल कापूस खरेदी केला याचा ताळमेळ बाजार समितीला नाही याचे अधिकार जिल्हा उपनिबंधकांकडे असल्याने त्यांनी या थेट परवानाधारकांडून होणाऱ्या खरेदीची आवकची नोंद घेण्याची मागणी शेतकऱ्यांत आहे. यात कुठला व्यापारी किती कापूस खरेदी करतो. याची नोंद नाही हे थेट कापूस खरेदीधारक बाजार समितीच्या अंतर्गत घेण्याची व प्रत्येक खासगी थेट कापूस खरेदी केंद्रावर बाजार समितीची काटापट्टी शेतकऱ्यांना द्यावी व बाजार समितीचा मापारी या कापूस खरेदीच्या ठिकाणी नियुक्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टाळली जाईल. आर्वीत थेट कापूस खरेदीचे सहा व्यापाऱ्यांकडे लायसन्स आहे.परवाना पणन महासंघ पुणे यांच्याकडे राहतो व याचे नियंत्रण जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे असते. परंतु या थेट कापूस खरेदीत शासनाने अनुदान घोषित केल्यास बाजार समितीची काटापट्टी आवश्यक आहे.सध्या आर्वीत पणन महासंघाचे थेट परवानाधारक सहा जण आहे. यात किती कापसाची खरेदी झाली याची माहिती बाजार समितीला नाही. त्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधकांकडे असल्याने त्यांना त्यांच्या कापूस खरेदीची नोंद घ्या व बाजार समितीला विश्वासात घ्यावे.विनोद कोटेवार, सचिव, कृ.उ.बा.स. आर्वी.

टॅग्स :cottonकापूस