शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

कापसाचा भाव ५ हजार ५५० राहण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 15:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : यंदा महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे कापसाचे उत्पादन २५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता ...

ठळक मुद्देराज्यात अधिक केंद्र उघडावे१ कोटी कापूस गाठी खरेदीसाठी सीसीआयवर दबाव वाढवावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदा महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे कापसाचे उत्पादन २५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. मात्र, देशातील कापसाचे उत्पादन लक्षात घेऊन यावेळी सीसीआयने १ कोटी गाठी खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम केल्यास कापसाचा ५ हजार ५५० रुपये हमीभाव टिकून राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारवर आतापासूनच दबाव वाढवावा लागणार आहे, अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. केंद्र सरकारने कापसाचा हमीभाव ५ हजार ५५० रूपये निश्चित केला आहे. देशातील बाजारपेठ व जागतिक बाजारपेठेतील कल पाहता कापूस यावर्षी या हमीभावाच्या आसपास स्थिर होईल, अशी शक्यता आहे. सीसीआयने दहा लाख गाठी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, सीसीआयने १ कोटी गाठी खरेदी कराव्यात, १०० दशलक्ष गाठी सीसीआयने खरेदी करण्याचे नियोजन करावे, अशी मागणीही इंगळे यांनी केली आहे. महाराष्ट्रात कापसाचे उत्पादन २५ टक्के कमी होणार आहे. यामागे काही जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी तर काही जिल्ह्यात कमी झालेला पाऊस हे महत्त्वाचे कारण आहे. परंतु, देशातील इतर राज्यात कापूस उत्पादन होत असल्यामुळे ३३० दशलक्ष कापूस गाठींचे उत्पादन देशात होईल. यावर्षी ३० लाख कापूस गाठी आयात झालेल्या आहेत. देशांतर्गत गरज २७५ दशलक्ष गाठींपर्यंत वाढलेली आहे. त्यामुळे आयातीवर संपूर्ण बंदी घालावी यासाठी राज्यसरकारने आत्ताच केंद्र सरकारवर दबाव आणून केंद्राअंतर्गत येणाऱ्या सीसीआयचे राज्यातील नेटवर्क (कापूस खरेदी केंद्र) वाढवावे व १०० दशलक्ष गाठी खरेदीचे उद्दिष्ट ठेवावे, तेव्हाच राज्यातील शेतकऱ्याला ५ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल कापसाला भाव मिळेल, असेही इंगळे यांनी सांगितले. यावर्षी कापसाचे भाव कमी होतील, अशी भीती उत्पादकांमध्ये आहे. त्यामुळे याबाबत आताच राज्यसरकारने पावले उचलून केंद्राकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहून विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती इंगळे यांनी दिली आहे.

गडकरींची जबाबदारी वाढणारकेंद्र सरकारच्या शेतमाल आयात निर्यात टास्कफोर्स (मंत्रीगट) अध्यक्ष केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आहेत. राज्यात उत्पन्न होणाऱ्या कापसामध्ये ७० टक्के कापूस एकट्या विदर्भाचा आहे. विदर्भातील नगदी पीक असलेल्या कापसाच्या भावावर येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. त्यामुळे आयात निर्यातीबाबत केंद्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे गडकरी यांच्यावर मोठी जबाबदारी यावेळी राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्याला चांगला भाव मिळण्यासाठी कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) चे अधिक कापूस खरेदी केंद्र विदर्भात सुरू होणे आवश्यक आहे. यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा आताच सुरू करण्याची गरज आहे.- प्रशांत इंगळे तिगावकर, सदस्यराज्य कृषी मूल्य आयोग, वर्धा.

टॅग्स :agricultureशेती