शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

कापूस उत्पादकांची आठ कोटींनी लूट

By admin | Updated: February 15, 2015 01:47 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर सीसीआयची कापूस खरेदी बंद आहे़ सदर यार्ड काळ्या यादीत टाकल्याची माहिती आहे.

आर्वी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर सीसीआयची कापूस खरेदी बंद आहे़ सदर यार्ड काळ्या यादीत टाकल्याची माहिती आहे. यामुळे स्पर्धा निर्माण झाली असून व्यापाऱ्यांनी शासकीय हमीभावापेक्षा कमी दरात कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची सुमारे आठ कोटी रुपयांनी लूट केल्याचे उघड झाले़ यामुळे सीसीआयची खरेदी त्वरित सुरू करावी, अशी मागणी प्रहार युवा संघटना व शेतकऱ्यांनी केली आहे़शासनाने कापसाचे हमीभाव प्रतीक्विंटल ४०५० रुपये ठरविला आहे़ कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया त्याच दराने कापसाची खरेदी करीत आहे; पण येथे सीसीआयची खरेदी नाही. परिणामी, संघटित असलेले व्यापारी याचा फायदा घेत असल्याचे दिसते़ केवळ ३८०० ते ३८५० रुपये दराने कापसाची खरेदी करीत आहेत़ शिवाय दीड टक्क्याने बटावसुद्धा कापत आहेत़ यात क्विंटलमागे ३०० रुपये कापूस उत्पादकांची आर्थिक लूट व्यापाऱ्यांद्वारे होत आहे. शेतकरी कापूस पिकविण्यासाठी राबत असला तरी त्याला क्विंटलमागे ३०० रुपये वाचत नाहीत; पण व्यापारी घरबसल्या क्विंटलमागे ३०० रुपये कमवित आहे़ ही कापूस उत्पादकांची थट्टा म्हणावी लागेल़ कापूस खरेदी सुरू झाल्यापासून आर्वी यार्डवर सुमारे २ लाख ५० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. ३०० रुपये क्विंटलप्रमाणे हिशेब केल्यास ७ कोटी ५० लाख रुपयांवर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट केल्याची निदर्शनास येते़ कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडियाचे अधिकारी आणि व्यापारी यांच्यातील आर्थिक संबंधांमुळे ही लूट सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सुरू असलेली आर्थिक लूट थांबविण्यासाठी त्वरित सीसीआयची कापूस खरेदी सुरू करावी, अशी मागणी प्रहार संघटनेद्वारे करण्यात आली आहे़ अन्यथा प्रहार संघटनेच्यावतीने आंदोलन उभारण्यात येईल, इशारा जिल्हाप्रमुख बाळा जगताप यांनी दिला आहे़ याबाबत तहसीलदारांना निवेदनही सादर करण्यात आले आहे़ शिष्टमंडळात प्रशांत खंडाळ, सुधीर जाचक, धीरज सारसर, प्रशांत रामटेके, राहुल गोठाणे, राजू आगरकर, धीरज गीरडकर, अंकुश गोटेफोटे, विशाल पुनसे, सूरज इरपाचे, माणिक निमकर, सुनील देशमुख, महेश खोडके, बाल्या राऊत, संतोष गौळकर, सैय्यद जुनेद यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.(तालुका प्रतिनिधी)व्यापाऱ्यांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदीशासनाने कापसाचा हमीभाव ४०५० रुपये क्विंटल जाहीर केला़ सीसीआय त्याच दराने कापसाची खरेदी करीत आहे; पण येथील सीसीआयची खरेदी बंद आहे़ यामुळे व्यापारी शेतकऱ्यांची लूट करीत आहे़ केवळ ३८०० ते ३८५० रुपये दराने कापूस खरेदी करीत असून ३०० रुपये बटाव कपात होत आहे़ यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे़ हमीभावापेक्षा अधिक दर मिळणे अपेक्षित असताना अल्प किमतीत पांढरे सोने विकावे लागत आहे़