शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

देशातील कापूस उत्पादकांना २६ हजार कोटींचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 12:31 IST

देशातील कापूस उत्पादकांना तब्बल २६ हजार कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला, अशी खंत शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रातून विजय जावंधिया यांनी व्यक्त केली खंत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव देण्याच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. पण, यावर्षीच्या जागतिक मंदिमुळे मिळालेला कमी दर आणि त्यात कोरोना संकटाची भर पडल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावात कापूस विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे देशातील कापूस उत्पादकांना तब्बल २६ हजार कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला, अशी खंत शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे.

पंतप्रधानांच्या घोषणेनुसार २०१८-१९ मध्ये कापूस उत्पादकांनी ६ हजार २०० ते ६ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विकणे अपेक्षित होते. पण, भारतातील कापूस व सुताची निर्यात घटली आहे. अमेरिकेच्या न्युयॉर्क कापूस बाजारात ८० ते ८५ सेंट प्रतिपाउण्ड रुईचे दर ६० ते ६५ सेंट प्रतिपाउण्डपर्यंत पडले आहेत. भारतीय बाजारातही रुईच्या गाठींचे दर ४२ हजार ते ४५ हजार प्रती खंडीवरून ३४ हजार ते ३६ हजार प्रती खंडीवर आले आहे. २५ मार्चच्या लॉकडाऊनपूर्वी व्यापारी शेतकऱ्यांकडून ५ हजार १०० ते ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी करीत होते. आता व्यापारी केवळ ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी करीत आहेत. आज कापूस उत्पादकांना १ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल कमी दराने कापूस विकण्याची वेळ आली. २०१९-२० मध्ये देशभरात ३ कोटी ५० लाख गाठींचे उत्पादन झाल्याचा अंदाज आहे.

एका गाठीकरिता ५ क्विंटल कापसाची आवश्यकता असते. त्यामुळे कापूस उत्पादकाला एका गाठीमागे ७ हजार ५०० रुपये कमी मिळाले आहेत. देशातील ३ कोटी ५० लाख गाठींच्या उत्पादनाचा विचार केल्यास २६ हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अशातच आता उत्पादन खर्चही वाढल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार तरी कसे? असा प्रश्नही जावंधिया यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस