शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

देशातील कापूस उत्पादकांना २६ हजार कोटींचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 12:31 IST

देशातील कापूस उत्पादकांना तब्बल २६ हजार कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला, अशी खंत शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रातून विजय जावंधिया यांनी व्यक्त केली खंत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव देण्याच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. पण, यावर्षीच्या जागतिक मंदिमुळे मिळालेला कमी दर आणि त्यात कोरोना संकटाची भर पडल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावात कापूस विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे देशातील कापूस उत्पादकांना तब्बल २६ हजार कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला, अशी खंत शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे.

पंतप्रधानांच्या घोषणेनुसार २०१८-१९ मध्ये कापूस उत्पादकांनी ६ हजार २०० ते ६ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विकणे अपेक्षित होते. पण, भारतातील कापूस व सुताची निर्यात घटली आहे. अमेरिकेच्या न्युयॉर्क कापूस बाजारात ८० ते ८५ सेंट प्रतिपाउण्ड रुईचे दर ६० ते ६५ सेंट प्रतिपाउण्डपर्यंत पडले आहेत. भारतीय बाजारातही रुईच्या गाठींचे दर ४२ हजार ते ४५ हजार प्रती खंडीवरून ३४ हजार ते ३६ हजार प्रती खंडीवर आले आहे. २५ मार्चच्या लॉकडाऊनपूर्वी व्यापारी शेतकऱ्यांकडून ५ हजार १०० ते ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी करीत होते. आता व्यापारी केवळ ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी करीत आहेत. आज कापूस उत्पादकांना १ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल कमी दराने कापूस विकण्याची वेळ आली. २०१९-२० मध्ये देशभरात ३ कोटी ५० लाख गाठींचे उत्पादन झाल्याचा अंदाज आहे.

एका गाठीकरिता ५ क्विंटल कापसाची आवश्यकता असते. त्यामुळे कापूस उत्पादकाला एका गाठीमागे ७ हजार ५०० रुपये कमी मिळाले आहेत. देशातील ३ कोटी ५० लाख गाठींच्या उत्पादनाचा विचार केल्यास २६ हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अशातच आता उत्पादन खर्चही वाढल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार तरी कसे? असा प्रश्नही जावंधिया यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस