शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

देशातील कापूस उत्पादकांना २६ हजार कोटींचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 12:31 IST

देशातील कापूस उत्पादकांना तब्बल २६ हजार कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला, अशी खंत शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रातून विजय जावंधिया यांनी व्यक्त केली खंत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव देण्याच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. पण, यावर्षीच्या जागतिक मंदिमुळे मिळालेला कमी दर आणि त्यात कोरोना संकटाची भर पडल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावात कापूस विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे देशातील कापूस उत्पादकांना तब्बल २६ हजार कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला, अशी खंत शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे.

पंतप्रधानांच्या घोषणेनुसार २०१८-१९ मध्ये कापूस उत्पादकांनी ६ हजार २०० ते ६ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विकणे अपेक्षित होते. पण, भारतातील कापूस व सुताची निर्यात घटली आहे. अमेरिकेच्या न्युयॉर्क कापूस बाजारात ८० ते ८५ सेंट प्रतिपाउण्ड रुईचे दर ६० ते ६५ सेंट प्रतिपाउण्डपर्यंत पडले आहेत. भारतीय बाजारातही रुईच्या गाठींचे दर ४२ हजार ते ४५ हजार प्रती खंडीवरून ३४ हजार ते ३६ हजार प्रती खंडीवर आले आहे. २५ मार्चच्या लॉकडाऊनपूर्वी व्यापारी शेतकऱ्यांकडून ५ हजार १०० ते ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी करीत होते. आता व्यापारी केवळ ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी करीत आहेत. आज कापूस उत्पादकांना १ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल कमी दराने कापूस विकण्याची वेळ आली. २०१९-२० मध्ये देशभरात ३ कोटी ५० लाख गाठींचे उत्पादन झाल्याचा अंदाज आहे.

एका गाठीकरिता ५ क्विंटल कापसाची आवश्यकता असते. त्यामुळे कापूस उत्पादकाला एका गाठीमागे ७ हजार ५०० रुपये कमी मिळाले आहेत. देशातील ३ कोटी ५० लाख गाठींच्या उत्पादनाचा विचार केल्यास २६ हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अशातच आता उत्पादन खर्चही वाढल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार तरी कसे? असा प्रश्नही जावंधिया यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस