शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

कचरा कंटेनरमध्ये दारूच्या बाटल्यांचाच खच

By admin | Updated: June 19, 2016 01:49 IST

पालिकेद्वारे शहरात सर्वत्र कचरा साठविण्यासाठी कचरा कंटेनर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनाही सोयीचे झाले आहे.

वर्धा : पालिकेद्वारे शहरात सर्वत्र कचरा साठविण्यासाठी कचरा कंटेनर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनाही सोयीचे झाले आहे. पण रामनगरातील हनुमान मंदिराच्या मागे असलेल्या जैन मंदिर परिसरातील कचरा कंटेनर पूर्णत: दारूच्या बाटल्यांनीच भरून राहात असल्याचे वास्तव समोर येत आहे.जिल्ह्यात दारूबंदी असतानाही येथेच सर्वात जास्त दारू मिळणे हे एखाद्या आश्चर्याशिवाय कमी नाही. त्यातही अगदी सहजपणे वर्धेत दारू उपलब्ध होत असल्याचे वास्तव आहे. या काही वर्षात वर्धा शहरातील रामनगर भागात दारूचे पाट वाहात आहेत. बिअर बारला बंदी असल्याने येथील काही घरांमध्येच होम बार सुरू झाले आहे. या घरांमध्येच बारसारखी सर्व सुविधा पुरविण्यात येत असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. दिवसभर गोळा झालेल्या दारूच्या बाटल्या रात्रीला जैन मंदिराजवळ असलेल्या कचरा कंटेनरमध्ये टाकल्या जातात. दररोज हा प्रकार सुरू असल्याने आज या कंटेनरमध्ये केवळ दारूच्या बाटल्याच निदर्शनास पडतात. विशेष म्हणजे येथून हाकेच्या अंतरावर रामनगर पोलीस ठाणे आहे. असे असतानाही अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने याला पोलिसांची मूकसंमती तर नाही ना असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. त्यामुळे हा प्रकार थांबवावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.(शहर प्रतिनिधी)